शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

‘एक देश- अनेक चुनाव’ लोकशाहीला पोषकच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 20:03 IST

एक देश- एक नागरी कायदा, एक देश- एक करप्रणाली, एक देश- एक धर्म, एक देश- एक समाज, एक देश- एक भाषा अशाप्रकारची भाषा राष्ट्रीय एकात्मतेशी विशेष संबंध असलेलीच असते असे काही नाही.

- प्रभाकर तिंबले एक देश- एक नागरी कायदा, एक देश- एक करप्रणाली, एक देश- एक धर्म, एक देश- एक समाज, एक देश- एक भाषा अशाप्रकारची भाषा राष्ट्रीय एकात्मतेशी विशेष संबंध असलेलीच असते असे काही नाही. मात्र, बहुविध समाजांच्या, संस्कृतींच्या आणि भाषांच्या मिलाफात ती अडथळे निर्माण करत असते.त्यात आता एकसाथ निवडणुका घेण्याचा प्रस्ताव समोर आलाय. म्हणजे आपले लोकसभेसाठीचे आणि विधानसभेसाठीचे प्रतिनिधी एकसाथ निवडायचे. हाच नियम जर तळागाळापर्यंत न्यायचा असेल तर जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही सोबतच घ्याव्या लागतील. अर्थात सध्याचा प्रस्ताव लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुका एकसाथ घेण्यापुरता मर्यादित आहे.१९९९ साली निवडणुकीसंबंधी सुधारणांचे सुतोवाच करताना न्या. बी. पी. जीवन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील कायदा आयोगाने एकसाथ निवडणुका घेण्याची शिफारस केली.या वादाला नवसंजीवनी दिली ती २०१५ साली, जेव्हा संसदेच्या स्थायी समितीने एकाच बरोबर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका घेण्याच्या प्रस्तावाची चिकित्सा करण्याचे ठरविले. २०१७ साली भारतीय कायदा आयोग आणि निती आयोगाने संयुक्तरीत्या आयोजित केलेल्या विधी दिनाच्या समारोप सोहळ्याचा मुहूर्त साधत पंतप्रधान मरेंद्र मोदी यांनी ‘एक देश- एक निवडणूक’चा नारा दिला.निवडणूककालीन आचारसंहितेमुळे सार्वजनिक स्वरूपाच्या कार्यक्रमांना फटका बसतो आणि प्रशासनही हतबल होते, असा युक्तिवाद यामागे आहे. एप्रिल २०१८मध्ये हा विषय सरकारने कायदा आयोगाकडे सुपुर्द केला. आयोगाने अवघ्या चार महिन्यांत आपला अहवाल देताना एकसाथ निवडणुकांचे प्रच्छन्न समर्थन केले.भारतासारख्या खंडप्राय देशातल्या निवडणुका हा प्रचंड खर्चिक मामला असून त्यापायी सार्वजनिक संसाधनांना अडकवले जाते हे मान्य करावेच लागेल. प्रशासकीय यंत्रणेला तसेच सुरक्षा यंत्रणांना निवडणुकांच्या दावणीला बांधले जात असल्यामुळे सर्वसामान्य प्रशासकीय व्यवहारांवरही या काळात संक्रांत येते.याच दरम्यान जातीय आणि धार्मिक ताणेबाणे अधिक टोकदार झालेले दिसतात. पण विविध प्रवृत्ती आणि प्रकृतीचे राजकीय पक्ष, जाती, धर्म, संस्कृती, आर्थिक निकष, क्षेत्रीय अस्मिता यांच्या आधारे विभागलेल्या हितसंबंधियांच्या भारतीय लोकशाहीच्या संवर्धनार्थ हे मोल देणे अपरिहार्य आहे, हेही तितकेच खरे.निवडणुका हे लोकशाहीचे मोल तर आहेच, पण त्याचबरोबर ते लोकतंत्राने बहाल केलेले बक्षीसही आहे. सांसदीय लोकशाहीच्या सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाचे ते इंजिनच होय. निवडणुकांमुळे विकास कुंठीत होतो आणि प्रशासकीय व्यवहारात अडथळे येतात असे म्हणणे चुकीचेच आहे. एकसाथ निवडणुकांच्या आग्रहाला अशा प्रकारचे चुकीचे अधिष्ठान देणे अयोग्य आहे. अशा प्रकारच्या सुधारणांनी लोकशाहीचे काय भले होईल यावरून त्यांची प्रत ठरविणे योग्य ठरेल.

एकसाथ निवडणुका घ्यायच्या झाल्या तर अनेक संवैधानिक तरतुदींत दुरुस्त्या कराव्या लागतील. घटनेचे कलम ८३/१७२ दुरुस्त करत लोकसभा आणि सर्व विधानसभांचा कार्यकाल एकसाथ संपवावा लागेल. सभागृहाचे विसर्जन करण्याचा राष्ट्रपती आणि राज्यपालांचा अधिकार रद्द अथवा संकुचित करावा लागेल. कलम ३५६ मध्ये समाविष्ट आपत्कालीन प्रावधानांचे पुनर्लेखन करावे लागेल. शिवाय संसदीय लोकशाहीच्या संकल्पनेत मंत्रिमंडळाचे सभागृहाप्रती असलेले सामूहिक उत्तरदायित्व अनुस्युत आहे. यानुसार एका सरकारवर अविश्वासाचा ठराव आला तर त्यानंतर सत्तेवर आलेल्या सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजूर करून घ्यायचा असतो.ठरावीक कालमर्यादेची सक्ती आली की मग सांसदीय उत्तरदायित्वाचा सवालच उठणार नाही. शिवाय संविधानात दुरुस्त्या करायच्या असतील तर संसदेच्या दोन्ही सभागृहांची दोन तृतीयांश बहुमताची संमती आणि किमान अर्ध्या विधानसभांची मान्यता लागेल.याचाच अर्थ विस्तृत राजकीय सहमतीशिवाय हे शक्यच नाही. केवळ प्रशासकीय कामकाजात व्यत्यय हेच जर या मागचे कारण असेल तर निवडणूक आयोगाशी चर्चा करून त्यावरला तोडगा काढणे शक्य आहे.

टॅग्स :democracyलोकशाहीElectionनिवडणूक