शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

आता हिंदी गळ्यालाही घोळवावा लागेल 'ळ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 02:57 IST

या पार्श्वभूमीवर भाषा अभ्यासक प्रकाश निर्मळ यांचे प्रयत्न फार मोलाचे आहेत. निर्मळ यांच्या पाठपुराव्यामुळं आता मराठीतल्या ‘ळ’चा समावेश हिंदी वर्णमालेत झाला आहे.

सुकृत करंदीकर

मराठी संस्कृतोद‌्भव आहे का यावरून वाद घालण्याची गरज खरं तर अठराव्या शतकातच राजारामशास्री भागवत यांनी मोडीत काढली. सुमारे दोन हजार वर्षांचा इतिहास असलेली मराठी पूर्ववैदिक भाषा असल्याचं एव्हाना भाषा तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.  भाषा प्रवाही असते. कालौघात संस्कृत, कन्नड, तेलुगूसारख्या अनेक भारतीय भाषांमधले शब्द मराठीत रुळले. बहामनी काळापासून म्हणजे चौदाव्या ते सतराव्या शतकापर्यंतची तीनशे वर्षं महाराष्ट्राच्या सत्ताधीशांची भाषा फारसी होती. या फारसीचं आक्रमण प्रचंडच आहे. इमारत, जागा, जिल्हा, तालुका, जमीन, हवा, गुलाब, गरीब, पैसा असे अक्षरशः शेकडो फारसी शब्द मराठीत ठाण मांडून बसले आहेत. आता या शब्दांचं मूळ मराठी नाही यावर कोण विश्वास ठेवेल? मराठीचं नशीब थोर म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आलं. शिवरायांनी मातृभाषेचं महत्त्व जाणलं आणि राज्याभिषेकानंतर रघुनाथपंत हणमंते या पंडितावर ‘राज्यव्यवहार कोश’ निर्माण करण्याची जबाबदारी सोपवली. त्यामुळं तीनशे वर्षांचं फारसीचं आक्रमण थोपवण्यात मराठीला काहीअंशी यश मिळालं. पुढं इंग्रजी सत्ता आली. या इंग्रजीनं मराठीला चांगलंच ग्रहण लावलं. आता मराठीचा आग्रह धरणं हा गुन्हा वाटावा, इतका इंग्रजीचा थाट आहे. रवींद्रनाथ टागोरांनी ‘आमार शोनार बांगला’ म्हटलं की हृदय उचंबळतात; पण ‘जय महाराष्ट्र’ म्हटलं की मग ‘प्रादेशिक’, ‘संकुचित’ म्हणून हिणवलं जातं. या तथाकथित बुद्धिवाद्यांची ही भोंगळ मांडणी दुर्लक्ष करावी अशीच ! समृद्धीच्या बाबतीत अनेक भाषांच्या तुलनेत मराठी अधिक रसाळ, मधाळ, रसरशीत, टवटवीत, खटकेबाज आणि सौष्ठवपूर्ण असल्याची खूणगाठ मनी बांधावी. दरिद्री असलेच तर मराठीचा आग्रह न धरणारे तुम्ही-आम्ही !!

या पार्श्वभूमीवर भाषा अभ्यासक प्रकाश निर्मळ यांचे प्रयत्न फार मोलाचे आहेत. निर्मळ यांच्या पाठपुराव्यामुळं आता मराठीतल्या ‘ळ’चा समावेश हिंदी वर्णमालेत झाला आहे. ‘ळ’ चा ‘ल’ असा चुकीचा वापर हिंदी पट्ट्यात कोणी केला तर केंद्र सरकारच्या हिंदी आणि राजभाषा विभागाकडे तक्रार करण्याची निर्मळ यांची मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. ‘‘ळ’’ हे व्यंजन द्रविड भाषांमध्ये आहे. मराठीतही आहे. खरं तर हिंदीवगळता चौदा भारतीय भाषांमध्ये आहेच. त्यामुळं मराठीतले काळे, टिळ‌क, गोपाळ, बाळासाहेब फक्त हिंदीत गेले की ‘काले’, ‘तिलक’, ‘गोपाल’, ‘बालासाहेब’ होतात. हे चुकीचे उच्चार आता थांबतील, अशी आशा करूया. 

हिंदीची लिपीदेखील मराठीप्रमाणेच देवनागरी. एकूण १२ स्वर, ३४ व्यंजनं अशा ४६ अक्षरांची ही देवनागरी लिपी. तरीही हिंदी वर्णमालेत एवढी वर्षं ‘ळ’ नव्हता. पण त्यातही मराठी थोडी वेगळीच. ‘चाळा’मधला ‘च’ वेगळा आणि ‘चहा’तला ‘च’ निराळा. ‘जागा’ आणि ‘जग’ यातला ‘ज’ वेगळा.  मराठी माणसांप्रमाणेच मराठी भाषाही तशी अवघडच. ‘मराठी भाषा ही मुमुर्षु आहे’, असा संताप ब्रिटिश राजवटीतच सन १९२६मध्ये इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी व्यक्त केला होता. ‘मुमुर्षु’ म्हणजे मरणासन्न, मरणाची इच्छा धरणारी. राजवाडे कर्ते विचारवंत होते, नुसतेच बोलके नव्हे. ‘मराठीखेरीज दुसऱ्या भाषांतून लिहिणार नाही’, असा पण त्यांनी केला आणि आयुष्यभर कटाक्षाने तो पाळलाही. त्यांना दुसरी भाषाच येत नव्हती, असं मात्र मुळीच नव्हतं. फ्रेंच, रशियन या भाषा मुळातून वाचण्याइतकं ज्ञान राजवाडेंना होतं. गेल्या शतकाच्या प्रारंभी झालेले रानडे, गोखले, टिळक, आगरकर, डॉ. आंबेडकर, सावरकर यासारख्या कितीतरी प्रज्ञावंतांचं  इंग्रजी, संस्कृत, फारसी अशा अनेक भाषांवर प्रभुत्त्व होतं. ते ब्रिटिशांच्या भुवया उंचावतील अशा फर्ड्या इंग्रजीत बोलत. पण मराठीतही ही मंडळी तितकीच बलदंड होती.

राजवाडे म्हणाले तसं मराठी मुमुर्षु नाही, हे गेल्या शंभर वर्षात दिसलं आहे. पण ती वर्धिष्णू व्हायची तर ‘ऑक्सफर्ड’प्रमाणं दरवर्षी त्यात नव्या शब्दांची भर घातली पाहिजे. कालसुसंगत शब्दांची निर्मिती केली पाहिजे. निर्मळ यांनी ‘ळ’ला हिंदीच्या दरबारात जागा मिळवून दिली. पण ळ, ण या व्यंजनांनी सुरू होणारा शब्दही मराठीत नाहीच. ळ आणि णने सुरू होणारे शब्द मायमराठीत प्रसवण्याचं, रुजवण्याचं आव्हान कोणी स्वीकारील का? ‘ळ’च्या निमित्तानं एवढा गळा तर काढलाच पाहिजे.

(लेखक लोकमत पुणे आवृत्तीचे सहसंपादक, आहेत)

टॅग्स :Mumbaiमुंबईmarathiमराठी