शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

अंधेर नगरी चौपट राजा

By सुधीर महाजन | Updated: January 21, 2020 13:22 IST

कंत्राटाच्या कामावरून शिवसेना आमदार व शिवसैनिकांत हाणामारी

- सुधीर महाजन

‘बोला फुलाला गाठ पडणे’ ही म्हण आठवण्याचे कारण म्हणजे कंत्राटी कामावरून शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि प. विभाग संघटक सुशील खेडकर यांच्यावर गुन्हे दाखल झाले. गेल्याच आठवड्यात केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यावर बोलले होते. मराठवाड्यात कंत्राटदारांना लोकप्रतिनिधींकडून त्रास होतो, अशी तक्रार एका अर्थाने केली होती. त्यांचे हे बोल आजच्या राजकारणाचा बदललेला ‘पोत’ अधिक ठळकपणे स्पष्ट करतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे, तर राजकारण हे समाजकारण राहिले नसून ते कंत्राटकारण झाले आहे.

गडकरींच्या या बोलाची लगेचच प्रचीती येईल, असे वाटले नव्हते; पण औरंगाबाद महापालिकेतील राजकारणाच्या कंत्राटीकरणाची लक्तरे आमदार शिरसाटांनीच उघडी केली. पक्षांतर्गत हाणामाऱ्या चव्हाट्यावर आल्या. गडकरींच्या वक्तव्यानंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी हे संकेताचे वारे भाजपकडे वळवण्याचा प्रयत्न केला होता; पण आपल्या पायाखाली काय जळते याचे त्यांना भान नव्हते. कालच्या हाणामारीनंतर त्यांनाही आच लागली असावी. महापालिकेच्या ११५ वॉर्डांत एकही वॉर्ड असा नाही की, तेथील कामांमध्ये नगरसेवकांचे आर्थिक हितसंबंध नाहीत. फरक एवढाच की कागदोपत्री त्याचा पुरावा नाही. कोणी भावाच्या नावाने, तर कोणी बगलबच्चांच्या नावावर कंत्राट घेतो. पूर्वी खुल्या निविदा प्रक्रियेत हेराफेरी सहज करता यायची, कारण सगळी यंत्रणा कच्छपी लावलेली असायची. आता ई-टेंडरिंग आल्यानंतरही फारसा फरक पडलेला नाही. यात संकेतस्थळ हॅक करणे, ब्लॉक करणे, टेंडर काढणाऱ्या विभागाकडून चोरून माहिती मिळवणे, असे प्रकार चालतात.  बहुतांश कंत्राटदार अप्रत्यक्षपणे नगरसेवक असल्यामुळे यंत्रणाही झुकते आणि तो जर सत्ताधारी असेल तर सर्व यंत्रणा, नियम तो खिशात घालतो.

एवढे अडथळे पार करूनही बाहेरच्या कंत्राटदाराने कंत्राट मिळविलेच तर त्याच्या कामात पदोपदी अडथळे उभे करण्याचे हातखंडे करण्यात सगळी मंडळी माहीर आहेत. आता कामाचे अंदाजपत्रक कसे ठरते, असा प्रश्न असेल तर तसे काही ठरत नाही. सगळेच अंदाजेच चालते. अंदाजपत्रक तयार केले जात नाही आणि नियम-अटीचे पालन करून काम झाले का, हे तपासण्यासाठी यंत्रणाच नाही. वॉर्डामध्ये खरेच काम झाले का, हे तपासण्यासाठी महानगरपालिकेकडे यंत्रणा नाही. ‘अंधेर नगरी चौपट राजा, टका सेर भाजी टका सेर खाजा,’ असा हा कारभार वर्षानुवर्षे चालू आहे. पूर्वी पालिकेत डांबरीकरण, मलनि:सारणाची कामे करणारी तज्ज्ञ अशी कंत्राटदार मंडळी होती. अशी कामे करण्याची खासियत होती; पण आता कोणीही कोणते काम करतो, अनुभव असो, नसो काही फरक पडत नाही.

कंत्राटदारीद्वारे पैसा मिळवण्याचा राजमार्ग म्हणजे राजकारण हे आता रूढ झाले आहे. सगळेच सहभागी असल्याने कामाची उपयुक्तता, दर्जा याबाबत कधीच ओरड होत नाही. परवा जी हाणामारी झाली ती सगळी याच प्रकारातून. येथेही ई-टेंडरची माहिती पुरवली गेल्याचा दाट संशय आहे. सेनेचा आमदार आणि संघटक यांच्यातच कंत्राटावरून जाहीर हाणामारी होणे ही शिवसेनेची संस्कृती नाही. सत्ताधारी आमदारावर गुन्हा दाखल होणे ही बाबही गंभीर आहे; पण शिवसेनाही शिरसाटांच्या मागे नाही, हे यातून स्पष्ट झाले.नितीन गडकरींनी मराठवाड्यातील अशा २२ लोकप्रतिनिधींची नावे सीबीआयला कळविली असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. समजा तसे केलेच असेल, तर आमदार शिरसाटांची हाणामारी हा पुरावा होऊ शकतो, असाही तर्क लढविला जात आहे. या घटनेने एकच झाले. विकासासाठी महापालिकेकडे आस लावून भोळ्या जनतेला खाबूगिरीचे वास्तव कळले. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीShiv Senaशिवसेनाfundsनिधी