शहरं
Join us  
Trending Stories
1
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
2
'ते' खासदार कोण? महिला डॉक्टरने दोन पीएंची पोलिसांकडे केलेली लेखी तक्रार; आतेभावाचा मोठा खुलासा
3
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
4
Honda vs Suzuki: होन्डा अ‍ॅक्टिव्हा आणि सुझुकी अ‍ॅक्सेसमध्ये चुरस; कोण आहे 'स्मार्ट फीचर्स'चा खरा किंग? वाचा
5
खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार?
6
चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपा कार्यकर्त्यांना तंबी; "सर्वांचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर..."
7
मुलगा की मुलगी? नवजात अर्भकांच्या अदलाबदलीवरून दोन कुटुंबांमध्ये हॉस्पिटलमध्येच वाद
8
हेअर फॉलचा वैताग! लसूण की कांद्याचा रस... काळ्याभोर लांब, जाड केसांसाठी सर्वात बेस्ट काय?
9
भारतीय नौदल चीन, पाकिस्तान, तुर्कीला धक्का देणार! तीन पावले उचलली
10
लग्नानंतर तापसी पन्नूने सोडला देश? डेन्मार्कला शिफ्ट झाल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचं स्पष्टीकरण
11
Numerology: ५, १४, २३ तारखेला जन्मलेल्या मुलींवर असतो बुधाचा प्रभाव; अत्यंत बुद्धिमान असतो स्वभाव!
12
विराट कोहली दोनदा शून्यावर बाद; सुनील गावसकरांनी मांडलं सडेतोड मत, म्हणाले- दोन सामन्यात...
13
VIDEO: देसी महिलेचा धुमाकूळ! 'हुस्न तेरा तौबा' गाण्यावर इतका विचित्र डान्स कधीच पाहिला नसेल
14
मोजतानाही लागेल धाप! IPO येण्याआधीचं Jio कंपनीचं मूल्यांकन बाप रे बाप...!
15
Railway: रेल्वे ट्रॅकजवळ रील बनवणाऱ्यांची आता खैर नाही; प्रशासनानं उचललं कठोर पाऊल!
16
मुख्यमंत्री फडणवीस अन् मनोज जरांगे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर येणार? चर्चांना उधाण...
17
Shraddha Walker : "श्रद्धा वालकरवर अजूनही अंत्यसंस्कार झालेच नाहीत"; आफताबने ३ वर्षांपूर्वी केलेली निर्घृण हत्या
18
Satara Crime: महिला डॉक्टरवर अत्याचार करणारा पीएसआय गोपाल बदने फरार; महिला आयोगाने घेतली दखल
19
Social Media Earning: इन्स्टाग्राम आणि युट्यूबवरून कसे कमवता येतात पैसे? तुम्हीही बनू शकता लखपती! जाणून घ्या
20
सुजात आंबेडकरांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरमधील RSS कार्यालयावर वंचितचा जनआक्रोश मोर्चा

एकाही योजनेचा फायदा नाही, सरकारला मराठवाड्याचा विसर पडलाय का?

By नंदकिशोर पाटील | Updated: August 13, 2024 18:58 IST

गतवर्षी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त घेतलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी ४५ हजार कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देण्यात आली होती. या पॅकेजच्या घोषणेला ११ महिने झाले आहेत. अध्यादेश काढण्यापलीकडे काहीही झालेले नाही!

गेल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाने विदर्भावर जलसिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून निधीचा अक्षरश: वर्षाव केला. ज्यामध्ये नळगंगा-वैनगंगा नदीजोड प्रकल्पाचा समावेश आहे. या प्रकल्पाची अंदाजे किंमत ८७ हजार कोटी रुपये आहे. या योजनेतून सुमारे साडेतीन लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार असून, त्याचा फायदा मराठवाड्याला होईल, असा दावा सरकारने केला आहे. मात्र, ही योजना मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या बुलडाणा जिल्ह्यापुरतीच आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव जिल्ह्यांसाठी देखील एका योजनेला सरकारने शनिवारी मंजुरी दिली. वास्तविक, मराठवाड्याला आज २६० टीएमसी पाण्याची गरज आहे. हे पाणी इतर भागांतून स्थलांतरित करावे लागणार आहे. मात्र, वर उल्लेख केलेल्या एकाही योजनेचा फायदा मराठवाड्याला होण्याची शक्यता नाही.

४५ हजार कोटींच्या पॅकेज काय झाले?गतवर्षी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त घेतलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसाठी ४५ हजार कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देण्यात आली होती. या पॅकेजच्या घोषणेला ११ महिने झाले आहेत. अध्यादेश काढण्यापलीकडे काहीही झालेले नाही! आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या निर्णयाच्या फायलींवरील धूळ झटकण्याचे काम सुरू आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्यात वळविण्यासाठी सुमारे १४ हजार कोटींची घोषणा करण्यात आली होती; मात्र हा निधी नाशिक जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांवर खर्च करण्यात आल्याची माहिती आहे.

मंत्रिमंडळ बैठक होणार का?मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी विभागीय मुख्यालय असलेल्या छत्रपती संभाजीनगरात मंत्रिमंडळाची एक बैठक होणे अपेक्षित असते; मात्र गतवर्षीचा अपवाद वगळता मागील आठ वर्षे या बैठकीला मुहूर्त मिळालेला नव्हता. यंदा देखील अशी बैठक घेण्यासंदर्भात काही हालचाल दिसत नाही. राज्य पुनर्रचनेनंतर विनाअट महाराष्ट्रात सामील झालेल्या मराठवाड्याची राज्यकर्त्यांकडून नेहमीच उपेक्षा केली जाते, अशी इथली जनभावना आहे. ‘सरकार आपल्या दारी’ हा उपक्रम चांगला आहे; पण या प्रदेशात सरकारचे अस्तित्व जाणवत नाही. मंजूर केलेल्या योजनांची अंमलबजावणी तातडीने होत नाही. निधीअभावी अनेक सिंचन प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहेत. जिल्हास्तरीय रस्त्यांची अक्षरश: चाळण झालेली आहे. जिल्हा परिषदांच्या निजामकालीन शाळांच्या इमारती मोडकळीस आलेल्या आहेत. सरकार एकीकडे डिजिटल शिक्षणावर भर देत असताना अनेक शाळांना वीज नाही. कसे दिवे लावणार? जालना जिल्ह्यातील २२१ शाळांमध्ये संगणक आहे; पण वीज नाही. ७६ शाळांमध्ये स्वच्छतागृह नाही, तर २३ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही. इतर जिल्ह्यांत देखील हीच परिस्थिती आहे.

पाणी आहे; पण वीज नाही!मराठवाड्यातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटात पिचला जात आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट अशा नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वेळेवर अनुदान मिळत नाही. पीकविम्याच्या नावाखाली तुटपुंजी रक्कम खात्यावर जमा केली जाते. तरी देखील इथला शेतकरी अहोरात्र कष्ट करून पोटभर धान्य पिकवतो. हंगामी पाण्यावर फळभाज्या घेऊन गुजराण करतो. ज्यांच्याकडे पाणी आहे ते उसाच्या माध्यमातून चार पैसे कमावतात; पण विजेअभावी पाणी देता येत नाही. ‘मागेल त्याला वीज’ ही योजना कागदावरच आहे. मराठवाड्याला रोहित्र-जनित्रांची, सबस्टेशन्सची गरज आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची घोषणा सरकारने केली आहे; पण वीज आहे कुठे?

‘टोयोटा’ची आनंदवार्तावाहननिर्मिती क्षेत्रातील आघाडीच्या टोयाेटा-किर्लोस्कर कंपनीने छत्रपती संभाजीनगरात प्रकल्प उभारण्याची घोषणा केली. सरकारने या कंपनीशी सामंजस्य करार देखील केला. ‘टोयोटा’मुळे या प्रदेशातील औद्योगिकीकरणाला मोठी चालना मिळणार आहे. रोजगार उपलब्ध होतील, पूरक उद्योगांना पाठबळ मिळेल. नव्वदच्या दशकात आलेल्या ‘बजाज’नंतर सर्वांत मोठी कंपनी इथे आपला प्लांट उभारणार असल्याने उद्योगजगतात उत्साह आहे. मराठवाड्यासाठी ही आनंदवार्ता आहे. हा प्रकल्प इतर राज्यांत जाऊ दिला नाही, याबद्दल सरकार अभिनंदनास पात्र आहे. 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाWaterपाणीState Governmentराज्य सरकारIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प