शहरं
Join us  
Trending Stories
1
लातूर: ट्रॅव्हल्स बसचा उदगीरकडे जाताना पहाटेच्या वेळी अपघात, दोन ठार, ३४ जण जखमी
2
शाहबाज म्हणे, भारतानेच सीझफायरसाठी फोन केलेला; तुर्की, अझरबैजानच्या राष्ट्राध्यक्षांसमोर शेखी मिरविली
3
Stock Markets Today: मंथली एक्सपायरीवर निफ्टीत तेजी, सेन्सेक्समध्ये ४०० अंकांची वाढ; IT Stocks सुस्साट
4
बिहार-नेपाळ सीमेवर खळबळ! नो मॅन्स लँडचे व्हिडीओ काढताना दोन चिनी तरुणांना अटक
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या डॉजमधून मस्क यांची अचानक एक्झिट; राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार पद सोडले...
6
भयंकर! १३ वर्षांचा मुलगा वेदनेने तडफडत राहिला, उपचाराअभावी हार्ट अटॅकने झाला मृत्यू
7
FD, NSC, SCSS, RD की SIP... ५ वर्षात कोणती स्कीम देईल किती रिटर्न; कुठे होऊ शकते सर्वाधिक कमाई?
8
"हे असले बुरसटलेले पुरुषी विचार...", हगवणेंच्या वकिलांकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय, मराठी अभिनेता भडकला
9
'बॉर्डर २' संदर्भात मोठी अपडेट आली समोर, सिनेमात दिसणार सनी देओलचा हा आयकॉनिक सीन
10
राशीभविष्य, २९ मे २०२५: भावंडांकडून प्रेम व सहकार्य मिळेल, व्यापारात लाभ, मिळकतीत वाढ होईल!
11
रतन टाटांच्या आवडत्या व्यक्तीचा 'या' कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, जाणून घ्या कारण
12
Operation Sindoor : शाब्बास पोरा! सीमेवर गोळीबार, जवानांसाठी मुलाचा पुढाकार; 'ऑपरेशन सिंदूर'मधला 'छोटा हिरो'
13
अवैधपणे १८ महिन्यांचे मूल दत्तक घेतले; लातूरमधील उदगीर येथे आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल
14
नाला गोवंडी, मानखुर्दचा ‘काला माल’ विक्रोळीचा; पुरोहितकडे मुंबईतील १६ ते १७ वाॅर्ड?
15
वर्सोवा-विरार सागरी मार्गाबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची विशेष मागणी
16
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
17
शाहांचा सहकार स्ट्राइक, विकास सोसायट्यांकडून १०,९१४ व्यवसाय सुरू
18
ओरखडे कसे डिलीट होतील? विद्यार्थिनीचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न कशासाठी
19
परदेशी पळून जाल तर सीबीआयचे ‘सिल्व्हर नोटीस’ अस्त्र लागेल मागे
20
वैष्णवी प्रकरण : नवऱ्याने बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे छळ होत नाही

कोरोना पुन्हा येणार? - भीती नको, काळजी मात्र हवी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 08:33 IST

थायलंड, हाॅंगकाॅंग, सिंगापूरपाठोपाठ भारतातही कोरोना लाटेच्या स्वरूपात पुन्हा परतून येणार का? आता पसरत असलेल्या कोरोनाचे नेमके स्वरूप काय आहे?

डॉ. अमोल अन्नदातेआरोग्य व सामाजिक प्रश्नांचे विश्लेषक

सध्या थायलंड, हाॅंगकाॅंग व सिंगापूरमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. भारतातही गेल्या पंधरवड्यात महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकमध्ये कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळले आहेत. सध्या देशात ३०० ॲक्टिव्ह रुग्ण असल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती असली, तरी हा आकडा जास्तच असणार. मुंबईमध्ये मे महिन्यात १६ रुग्णांना गंभीर कोरोना संसर्ग होऊन त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. १४० कोटी लोकसंख्येच्या देशात हा आकडा नगण्य वाटत असला, तरी कोरोना परत मोठ्या प्रमाणावर लाटेच्या स्वरूपात येणार का? आता पसरत असलेल्या कोरोनाचे नेमके स्वरूप काय आहे? हे प्रश्न प्रत्येकाला पडत आहेत. 

कोरोनाची साथ ओसरल्यानंतर तो पूर्णपणे गेलेला नाही. कोरोनाचे सौम्य व क्वचित गंभीर रुग्ण साथ ओसरल्यानंतरही आढळून येतातच. २०२२ साली देशभर ‘ओमिक्रॉन’ या सौम्य कोरोनाची साथ  आपण अनुभवली. सध्या पसरत असलेला कोरोना हा ओमिक्रॉनमध्ये जनुकीय रूपांतर होऊन ‘जेएन १’ या नावाने ओळखला जाणारा कोरोना व्हायरस आहे. यामुळे सौम्य स्वरूपाचा कोरोना होत असला, तरी हा ओमिक्रॉन पहिल्या, दुसऱ्या लाटेतील कोरोनापेक्षा जलद गतीने पसरणारा व ३० पट अधिक वेगाने संसर्गित होणारा व्हायरस आहे. 

सहसा उन्हाळा संपताना व पावसाळा सुरू होतानाचा सध्याचा काळ हा ‘जेएन १’ पसरण्यासाठी अनुकूल आहे. राज्यात अनेक ठिकाणी झालेला अवकाळी पाऊस कोरोना पसरण्यासाठी अधिक पोषक ठरू शकतो. सौम्य आजार असला, तरी ६० पेक्षा जास्त वय, गरोदर स्त्रिया, कुठलाही आजार असलेले सर्व वयोगटातील लोक यांनी अधिक काळजी घेणे अपेक्षित आहे.

पहिल्या व दुसऱ्या लाटेत तसेच नंतरच्या ओमिक्रॉनच्या साथीत भारतातील जवळपास प्रत्येकाला कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेला आहे. तसेच ६७ टक्के लोकांनी कोरोना लसीचे किमान दोन डोस घेतलेले आहेत. म्हणून ‘जेएन १’ या सध्याच्या प्रजातीविरुद्ध भारतीयांमध्ये चांगली प्रतिकारशक्ती तयार झालेली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने गंभीर रुग्ण येण्याची शक्यता कमी आहे. पण सौम्य केसेसची संख्या वाढू शकते. केसेस सौम्य असल्या तरी प्रतिकारशक्ती कमी असलेल्या काही रुग्णांवर गंभीर परिणाम झाल्यास पुरेशी तयारी हवी. सौम्य आजार झाला तरी कोरोनामुळे किमान दोन आठवडे कार्यक्षमतेवर परिणाम होतो. म्हणून तो टाळण्यासाठीच्या उपाययोजना आत्तापासून करायला हव्यात. फ्लूची लस काही प्रमाणात कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती निर्माण करते. त्यामुळे साध्या सर्दी, खोकल्यापासूनही संरक्षण मिळू शकेल. कोरोनाच्या गंभीर आजारात बॅक्टेरियल न्यूमोनियाची लागण होऊन रुग्ण अधिक गंभीर होतात. त्यासाठी न्युमोकोकल लस घेणे हिताचे ठरू शकेल. कोरोना लस अजूनही देशातील ३३ टक्के लोकांनी घेतलेली नाही. ज्यांनी घेतली त्याचा सध्या पसरत असलेल्या ‘जेएन १’ प्रजातीविरोधात फारसा उपयोग होणार नाही. म्हणून लस न घेतलेल्यांनी आधीची लस घेतल्याने काही उपयोग होणार नाही. जशी सर्दी, खोकल्यासाठी दरवर्षी फ्लूची त्या वर्षासाठीची नवी लस येते, तशीच आता कोरोना लसही दर दोन वर्षांनी तरी विकसित करावी लागणार आहे. कारण जनुकीय रूपांतर (म्युटेशन) होऊन कोरोना विविध स्वरूपात येतच राहणार आहे.

कोरोना किंवा कुठल्याही साथीत खरी समस्या तेव्हाच येते जेव्हा एकावेळेला मोठ्या संख्येने गंभीर रुग्ण येतात व रुग्णांना खाटा उपलब्ध होत नाहीत. याची शक्यता नगण्य असली, तरी असे झालेच तर त्यासाठी आपण तयार आहोत का? याची पडताळणी करून पाहायला हवी. महाराष्ट्राकडे कोरोनाच्या दोन लाटांचा अनुभव आहे. त्यादृष्टीने रुग्णालये सज्ज केली तर त्याचा उपयोग इतर आजारांच्या उपचारांसाठीही होईल.

रुग्णांची संख्या वाढली तर मास्कचा वापर करण्याची वेळ येऊ शकते. अनेकांना कोरोनामुळे लॉकडाऊनचीही भीती सतावते आहे. ‘जेएन १’मुळे लॉकडाऊन करण्याइतपत परिस्थिती नक्कीच बिघडणार नाही. पण त्यासाठी आधीच्या कोरोना लाटांतून धडे घेऊन उपाययोजना मात्र आवश्यक आहेत.dramolaannadate@gmail.com 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस