शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

नितीन गडकरी तुम्ही बोललात; पण हातचे राखून का बोललात?

By सुधीर महाजन | Updated: January 13, 2020 18:55 IST

एखादा राजकीय नेता रस्ते बांधणाऱ्या कंत्राटदाराला आपल्या घरी चहा प्यायला बोलवत नाही आणि असा समज करून घ्यावा एवढी दुधखुळी जनताही नाही.

- सुधीर महाजन 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलले; पण त्यांनी अर्धसत्य कथन केले. खरं म्हणजे त्यांनी कोणताही आडपडदा न ठेवता, कोणाची भिडभाड न बाळगता थेट सांगायला पाहिजे होते. हातचे राखून सांगण्यात काहीच उपयोग नाही. काल औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात त्यांनी रस्त्याची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची अडचण व्यक्त केली. मराठवाड्यात लोकप्रतिनिधींचा त्रास या कंत्राटदारांना आहे. ते त्यांना घरी बोलावतात, असे ते म्हणाले. एखादा राजकीय नेता रस्ते बांधणाऱ्या कंत्राटदाराला आपल्या घरी चहा प्यायला बोलवत नाही आणि असा समज करून घ्यावा एवढी दुधखुळी जनताही नाही. कंत्राटदारांना आमदार, खासदारांची कामे करावी लागतात, ही कामे कोणती हे सर्वज्ञात आहे. माझ्या मतदारसंघात चांगले काम कर, दर्जा टिकव, असे कोणी सांगत नाही. तो मलिक अंबर, शिवाजी महाराजांचा काळ होता. चारशे वर्षांपूर्वी औरंगाबाद शहरात बांधलेले दरवाजे आजही भक्कम आहेत आणि महाराजांच्या नावावर उठता बसता पोळी भाजून घेणारे आपणच आणि त्यांच्या किल्ल्यांची नासधूस करणारेही आपणच.

गडकरी हातचे राखून बोलले. कंत्राटदारांकडे टक्केवारी मागणाऱ्या लोकप्रतिनिधींची नावेच त्यांनी जाहीरपणे सांगायला पाहिजे होती. म्हणजे नेमके कोणत्या पक्षाचे लोकप्रतिनिधी साधनशुचितेचे पालन करतात, हे समजले असते. लोकप्रतिनिधींच्या अशा व्यवहाराची जनतेत चर्चा होत नाही, असे गडकरींना वाटते काय? उलट असे व्यवहार झाले की, टक्केवारीची चर्चा फार उघडपणे होते. त्यामुळे कोणत्या कामात कोणत्या लोकप्रतिनिधीने ‘हात मारला’ याविषयी लोक फार उघडपणे बोलतात. रेशीमबागेच्या संस्कार वर्गातून बाहेर पडलेले लोकप्रतिनिधी साळसूद आहेत, असा समज असेल तर तो गैरसमज समजावा. आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत गडकरींच्या पक्षाच्या एका मंत्र्याला उमेदवारी नाकारली. ती देण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले, तरी श्रेष्ठींनी कोणाचेही ऐकले नाही. त्या मंत्र्यांची कामगिरीही चांगली होती, तरी पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली. याच्या सुरस कथा जगजाहीर झाल्या. त्या पक्षानेही याचा खुलासा केला नाही. साळसूदपणाचा आव आणणारे एक मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी टक्कोवरीसाठीच प्रसिद्ध असताना गडकरी ‘आग सोमेश्वरी आणि बंब रामेश्वरी’ असा पवित्रा का घेतात.

अजिंठा रस्त्याचे काम पूर्ण न झाल्याचे दु:ख त्यांना आहे; पण हे काम वेळेत का पूर्ण होऊ शकले नाही याचा शोध घेतला तर झारीतील शुक्राचार्यांचा सहज शोध लागेल. या कंत्राटदारांना केवळ लोकप्रतिनिधींचाच त्रास नाही तर सत्ताधारी पक्षांचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, कार्यकर्ते अशा बाजारबुगग्यांचाही तेवढाच त्रास आहे. ही गोष्ट गडकरीसाहेबांना माहीत नसेल तर असे कसे म्हणता येईल. अशा गोष्टी राजकारणाच्या शाळेत बिगारीच्या वर्गातच शिकून घ्याव्या लागतात.

लोकप्रतिनिधी केवळ टक्केवारीच पदरात पाडून घेत नाहीत, तर त्यांच्या मतदारसंघातील बहुतेक कामे ते आपल्याच बगलबच्यांकडून करून घेताना दिसतात; परंतु ही कामे दुसऱ्या कंत्राटदारांच्या नावे स्वत: करून घेतात. या गोष्टीही उघड आहेत. खरे तर गडकरींनी ही खदखद का व्यक्त केली. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कंत्राटदारही मजबुरीने का होईना सत्ताधारी लोकप्रतिनिधींना प्रसन्न होतात. मग गडकरींचा नेमका रोख कोणावर होता, अशी एक नवीच चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू व्हावी म्हणून गडकरी हातचे राखून तर बोलले नाही ?

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाAurangabadऔरंगाबादfundsनिधी