शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

निर्मलाताई, आम्हा प्राप्तिकरदात्यांचे एवढे ऐकाल का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2023 07:53 IST

प्राप्तिकर आकारणीचे दर जाचक नव्हे तर माफक असणे आवश्यक असते! महागाई वाढली आहे, तुम्ही आमच्या खिशात चार जास्तीचे पैसे राहू द्याल का?

प्राप्तिकर आकारणीचे दर जाचक नव्हे तर माफक असणे आवश्यक असते! महागाई वाढली आहे, तुम्ही आमच्या खिशात चार जास्तीचे पैसे राहू द्याल का? 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी २०२३-२४ सालासाठीचा अर्थसंकल्प संसदेला सादर करतील. यावेळी प्राप्तिकरदात्यांच्या त्यांच्याकडून काही माफक अपेक्षा आहेत. प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत वाढ करावी, नवीन सुरू केलेली वजावटविरहित प्राप्तिकर आकारणीची पद्धत रद्द करून त्याऐवजी वजावटसहित जुनी करप्रणाली चालू ठेवावी, प्राप्तिकर आकारणीच्या टप्प्यात (slab) अनुकूल व सुसंगत बदल करावेत, तसेच प्राप्तिकराची आकारणी माफक दराने करावी. या त्यांपैकी काही अपेक्षा!

वाढत्या महागाईमुळे प्राप्तिकरदात्यांच्या वास्तव उत्पन्नात होणारी घट लक्षात घेऊन त्याआधारे प्राप्तिकरमुक्त उत्पन्नात वाढ करणे व अशी वाढ करतांना प्राप्तिकर आकारणीच्या टप्प्यात व दरात त्याप्रमाणे अनुकूल व सुसंगत बदल करणे आवश्यक असते. प्राप्तिकर आकारणीचे दर हे जाचक नव्हे तर माफक असणे आवश्यक असतात. परंतु, सरकार तसे बदल करीत नाही. हा करदात्यांचा नेहमीचाच अनुभव आहे. प्राप्तिकर आकारणीच्या जुन्या पद्धतीमध्ये पाच लाख रुपयांपेक्षा जास्त ते दहा लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के तर दहा लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर ३० टक्के अशा जाचक दराने प्राप्तिकर आकारला जातो, हे त्याचे उदाहरण!

प्रत्यक्ष कर संहितेची छाननी करणाऱ्या  संसदीय संमतीने ९ मार्च २०१२ रोजी संसदेला सादर केलेल्या अहवालात प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा तीन लाख रुपये करण्याची व प्राप्तिकर आकारणीच्या टप्प्यांमध्ये बदल करून ३ ते १० लाख रुपयांवर १० टक्के, १० ते २० लाख रुपयांवर २० टक्के आणि २० लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कमेवर ३० टक्के दराने प्राप्तिकर आकारणी करण्याच्या शिफारशी केल्या होत्या. ऑगस्ट २००९ मध्ये तत्कालीन अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या प्रत्यक्ष करसंहितेबाबतच्या मसुद्यांमध्ये १० ते २५ लाख रुपयांपर्यंत २० टक्के तर २५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर ३० टक्के दराने प्राप्तिकर आकारण्याची तरतूद केली होती. प्रत्यक्ष करविषयक समितीने १९ ऑगस्ट, २०१९ रोजी सरकारला सादर केलेल्या अहवालात पाच ते १० लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के, १० ते २० लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के, २० लाख ते दोन कोटी रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर ३० टक्के व दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर ३५ टक्के दराने प्राप्तिकर आकारणी करण्याची शिफारस केली होती. परंतु, सरकारने कोणत्याही समित्यांच्या शिफारशींची अंमलबजावणी केली नाही.

सरकारने लागू केलेल्या सातस्तरीय (टप्पे) नवीन वैकल्पिक प्राप्तिकर आकारणीच्या पद्धतीतही प्रत्येक अडीच लाख रुपयांच्या टप्प्यामागे पाच– पाच टक्के अशी दरामध्ये वाढ केलेली आहे. प्राप्तिकर आकारणीच्या नवीन पद्धतीत काही प्रमाणात दर जरी कमी केलेले असले तरी विविध समित्यांनी सूचविलेल्या दरांपेक्षा ते दर खूपच जास्त असून प्राप्तिकर आकारणीच्या टप्प्यात केलेल्या वाढीमुळे प्राप्तिकरदात्यांना प्रत्यक्षात मिळणारा फायदा मर्यादित करण्यात आलेला आहे. सदरची करप्रणाली स्वीकारणाऱ्या प्राप्तिकरदात्यांना  मिळणाऱ्या ७० वजावटींचा त्याग करावा लागतो. त्यामुळे प्राप्तिकराच्या कमी दरामुळे होणाऱ्या मर्यादित फायद्यांपेक्षा विविध वजावटी मिळत नसल्यामुळे होणारे नुकसान फारच जास्त आहे. त्यामुळे बहुतांश प्राप्तिकरदात्यांनी नवी प्रणाली नाकारलेली आहे.

‘एक देश, एक कर’असा सातत्याने उद्घोष करून ‘वस्तू व सेवा कर कायदा’ लागू करणाऱ्या सरकारने प्राप्तिकराबाबत वजावटसहित व वजावटविरहित अशा दोन पद्धतींतून एका पद्धतीचा स्वीकार करण्याची सक्ती करणे प्राप्तिकर आकारण्याच्या मूलभूत सिद्धांताच्या पूर्णत: विरुद्ध आहे. महागाईत झालेली वाढ लक्षात घेऊन प्राप्तिकरमुक्त उत्पनाची मर्यादा आठ लाख रुपये करणे, तसेच आठ ते १५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के, १५ लाख रुपयांपेक्षा जास्त ते २५ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर २० टक्के तर २५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर ३० टक्के दराने प्राप्तिकर आकारणे योग्य होईल.- ॲड. कांतीलाल तातेड, अर्थशास्त्राचे अभ्यासक    

टॅग्स :Nirmala Sitaramanनिर्मला सीतारामन