शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

दुष्काळासाठी शाश्वत उपाययोजनांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 06:15 IST

शहरांना जसे दुष्काळाच्या अनेक अप्रत्यक्ष परिणामांना सामोरे जावे लागते;

सारंग पांडे

दुष्काळावरील अनेक उपाययोजना होऊनही दुष्काळ काही हटत नाही. ग्रामीण भागात पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी आणि रोजगार या समस्या दुष्काळामुळे तीव्र बनतात. तर शहरी भागात पाणी प्रश्न प्रामुख्याने तीव्र बनतो. अर्थात, शहरी भागात अप्रत्यक्ष परिणाम अनेक होत असतात. बाजारपेठ ओस पडते, शेतमालाचे भाव वाढतात, बेरोजगारांचे तांडे ग्रामीण भागांतून शहरांत येऊ लागतात. त्यामुळे मूलभूत सोईसुविधांवर ताण येतो. कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतात. पण, तरीही दुष्काळ म्हटले, की तो ग्रामीण भागाचाच प्रश्न वाटतो. त्याची चर्चा आणि उपाययोजना त्याभोवतीच फिरत राहते.

शहरांना जसे दुष्काळाच्या अनेक अप्रत्यक्ष परिणामांना सामोरे जावे लागते; तसेच दुष्काळ निर्माण होण्याला वाढती शहरेही तेवढीच कारणीभूत आहेत. अनेक पर्यावरणीय समस्या आणि नैसर्गिक संसाधनांच्या असमान आणि अशाश्वत वापराला शहरे जबाबदार आहेत.दुष्काळासंदर्भात अनेक तज्ज्ञ आणि अभ्यासक म्हणतात की, खरा दुष्काळ नियोजनाचा आणि नैसर्गिक संसाधनांच्या विवेकी वापराचा आहे. चुकीची आणि सवंग राजकीय धोरणेपण तेवढीच जबाबदार आहेत. महाराष्ट्रात दुष्काळावर मात करण्याचा यशस्वी प्रयत्न अनेक गावांनी केला. त्यातून एक मॉडेल समोर आले. परंतु, ते सरकारी धोरणात येऊन त्याच्या प्रामाणिक अंमलबजावणीत इच्छाशक्तीचा दुष्काळच राहिला आहे. दुष्काळावरील उपाययोजना करताना कोणतेही एकच मॉडेल किंवा सुटा सुटा विचार चालणार नाही. विभिन्न नैसर्गिक परिस्थिती, हवामान आणि सामाजिक व आर्थिक पार्श्वभूमी विचारात घेऊन योजना आखाव्या लागतील. त्यात गाव हा घटक आणि लोक केंद्रस्थानी असायला हवेत.

दुष्काळाची कारणे - दुष्काळाची कारणे यावर चर्चा करताना नेहमी दोन प्रकारची कारणे पुढे येतात. ती म्हणजे नैसर्गिक आणि मानवनिर्मित.नैसर्गिक कारणे : पावसाची अनियमितता - भारतामध्ये पावसाच्या नोंदी साधारणत: १९०१ पासून मिळतात. त्यातून हा निष्कर्ष निघतो की, दरवर्षी सारखा पाऊस पडत नाही. सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडतो, तेव्हा पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होते. जेव्हा सरासरीच्या २६ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडतो, तेव्हा दुष्काळ मानला जातो. दर आठ-दहा वर्षांनी पाऊस सरासरीपेक्षा खूप कमी पडल्याच्या नोंदी आहेत.हवामानातले बदल - तापमानात झालेली वाढ आणि त्यामुळे हवामानात झालेला बदल यामुळे पावसाचा अनियमितपणा आणि असमतोलपणा वाढला आहे, असं अनेक अभ्यासक सांगत आहेत. पूर्वी दुष्काळाची परिस्थिती दर दहा वर्षांनी उद्भवते, असं मानलं जायचं. परंतु, अलीकडच्या काळात दुष्काळी परिस्थितीची वारंवारिता वाढली आहे.मानवनिर्मित कारणे : नैसर्गिक साधनांचा ºहास - प्रचंड जंगलतोड, खानी, औद्योगिक प्रकल्प यांमुळे निसर्गावर अतिक्रमण होत आहे. महाकाय धरण प्रकल्प, बागायती शेतीत होणारा पाण्याचा अतिरेकी वापर, मोकाट गुरेचराई या गोष्टीही नैसर्गिक साधनांना धोक्यात आणतात.प्रदूषण - वाढतं औद्योगिकीकरण, शहरीकरण आणि रासायनिक शेतीमुळे हवा, पाणी आणि माती दूषित होत आहे. एवढंच नव्हेतर, पृथ्वीभोवती असलेल्या ओझोन वायूच्या आवरणालाही धोका निर्माण होत आहे, हे शास्त्रज्ञांनी लक्षात आणून दिलं आहे. त्यामुळं, हवामानबदल आणखी वेगाने होत आहे. पावसाची अनियमितता वाढत आहे.

दुष्काळ उपाययोजना :दुष्काळ उपाययोजनांचा विचार दोन पातळ्यांवर करावा लागेल. कायमस्वरूपी (शाश्वत) करावयाच्या उपाययोजना आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत किंवा दिलासा म्हणून करावयाच्या उपाययोजना.आपत्कालीन परिस्थितीत दिलासा : पिण्याचे पाणी, रोजगार, रेशन, चारा, कर्जफेड सवलत, शैक्षणिक फी माफी, वीज बिल माफी, नुकसानभरपाई आणि पीक विमा. या दुष्काळी परिस्थितीत तात्पुरता दिलासा देणाऱ्या उपाययोजना आहेत.काही पर्याय -१. दुष्काळात चारा म्हणून उसाचे पाचट, वाढे हे राखून ठेवावेत. साखर कारखान्यांना आगाऊ तशा सूचना देऊन ठेवणे आवश्यक असते.२. पश्चिम घाट व इतर ठिकाणी भरपूर गवताळ कुरणे आहेत. सरकारने वनविभागाच्या मदतीने रोजगार हमीमधून स्थानिक आदिवासींना रोजगार देऊन हे गवत कापून वाहतूक करून आणणं शक्य आहे.३. चारा प्रक्रिया न करता तसाच दिल्यास तो पुरेसं पोषण करीत नाही आणि बराचसा वाया जातो. म्हणून मूरघास तयार करण्यासारखे उपाय करता येतील.दुष्काळाचे समाजकारण, अर्थकारण आणि राजकारण वेगवेगळ्या व्यवस्था वेगळ्या पद्धतीने करत आहेत. दुष्काळाचा प्रश्न मात्र पुढे पळत आहे आणि उपाययोजना मागून धावत आहेत. लोक नेहमीच हवालदिल आहेत. म्हणून दुष्काळाच्या प्रश्नावरसर्वंकष पद्धतीने विचार होण्यासाठी ही मांडणी केलेली आहे.

( लेखक लोकपंचायत संचालक, आहेत )

टॅग्स :droughtदुष्काळMarathwadaमराठवाडा