शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नद्यांच्या शुद्धीकरणासाठी नव्या जलधोरणाची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2019 05:21 IST

आपल्या देशातील नद्या स्वच्छ करण्याचे काम पर्यावरण मंत्रालयाकडून जलसंसाधन मंत्रालयाकडे रालोआच्या काळात सोपविण्यात आले.

- डॉ. भारत झुनझुनवालाआपल्या देशातील नद्या स्वच्छ करण्याचे काम पर्यावरण मंत्रालयाकडून जलसंसाधन मंत्रालयाकडे रालोआच्या काळात सोपविण्यात आले. त्या मंत्रालयाचे पुढे जलशक्ती मंत्रालय असे नामकरण करण्यात आले. गेल्या पाच वर्षांत गंगेच्या स्वच्छतेच्या बाबतीत या मंत्रालयाने केलेल्या कामाचे मूल्यांकन करणे शक्य आहे. गंगा खोरे व्यवस्थापन योजनेने केलेल्या शिफारशींच्या संदर्भात हे मूल्यांकन करता येईल.आयआयटीने सुचविले होते की उद्योगांकडून गंगा नदीत जे घाण पाणी सोडण्यात येते ते पूर्णपणे थांबविण्यात यावे. उद्योगांकडून वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे शुद्धीकरण करून त्याचा फेरवापर करण्याची योजना उद्योगांनी तयार करावी, असे सुचविण्यात आले होते. त्यासाठी कायदा करून पाण्याचा फेरवापर करणे बंधनकारक करावे अशी आयआयटी कॉन्सोर्टीयमची शिफारस होती. तसेच नगर परिषदांनी सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांच्या त्यांच्या शहरातील सांडपाण्याचे शुद्ध केलेले पाणी शेतीसाठी वापरण्याचीही शिफारस केली होती. पण त्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात आली नाही. तथापि सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करण्याच्या बाबतीत बरीच प्रगती झाली आहे. यापूर्वी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्प उभारणीसाठी केंद्र सरकार आर्थिक साह्य देत होते. नगर परिषदांनी हा निधी घेऊन प्रकल्पही उभारले. मात्र निधीअभावी नगर परिषदा प्रकल्प चालविण्याची टाळाटाळ करू लागल्या. त्यामुळे जलशक्ती मंत्रालयाने नवीन योजना तयार करून खासगी सहभागातून सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प चालविण्यास सांगितले. त्यात ४० टक्के रक्कम खासगी संस्था देणार होती व उर्वरित ६० टक्के रक्कम केंद्राकडून टप्प्याटप्प्याने दिली जाणार होती.सर्वप्रथम उद्योगसमूहांना त्यांच्या उद्योगातील टाकाऊ पाणी नदीत सोडण्यास प्रतिबंध घालण्यात आला. उद्योगांची मंडळाकडून पाहणी होत असताना सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्प काही तासांपुरते सुरू ठेवायचे आणि नंतर वर्षभर प्रक्रिया न केलेले सांडपाणी नदीत सोडून द्यायचे, असा प्रकार उद्योगांनी चालविला होता. उद्योगांच्या या कामात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची छुपी मदत मिळायची. हे थांबविण्यासाठी एकच उपाय होता व तो म्हणजेच नद्यांमध्ये सांडपाणी सोडण्यावर बंदी आणण्याचा. त्यासाठी कायदा करण्याची गरज आहे.असा कायदा करण्यात आल्यावर सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारणे उद्योगांना बंधनकारक केले तर त्यांच्या उत्पादन खर्चात त्यामुळे वाढ होणार आहे. पण अशा कायद्याची गरज प्रतिपादन करण्याचे धाडस जलशक्ती मंत्रालयाकडे नाही. तसेच प्रक्रिया केलेले सांडपाणीसुद्धा नगर परिषदांकडून नद्यांतून सोडले जाणारच आहे. पण प्रक्रिया न केलेले पाणी नदीत सोडले जात नाही, असे प्रमाणपत्र अधिकाºयांना द्यावे लागणार आहे. हे प्रमाणपत्र देताना होणारा भ्रष्टाचार थांबविणे कठीण आहे. त्यासाठी दुसरा मार्ग पुनर्प्रक्रिया केलेले सांडपाणी शेतीसाठी वापरणे बंधनकारक करावे लागेल. त्यामुळे सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात आली होती याची खात्री पटवणे सोपे जाईल.माहीतगार सूत्रांकडून मला सांगण्यात आले आहे की, हरिद्वार येथील जगजीतपूर सांडपाणी पुनर्वापर प्रकल्पातील प्रक्रिया केलेले सांडपाणी काही काळ शेतीसाठी वापरले जात होते. पण पुढे शेतकºयांनी ते पाणी शेतीसाठी घेणे बंद केले. कारण प्रक्रिया न करताच ते पाणी शेतकºयांना देण्यात येऊ लागले होते! पुनर्प्रक्रिया केलेले सांडपाणी शेतकºयांनी वापरायला सुरुवात केली तर सांडपाण्यावर प्रक्रिया करणे उद्योगांसाठी बंधनकारक करणे लाभदायक ठरू शकेल. जलशक्ती मंत्रालयाला या सुलभ धोरणाची अंमलबजावणी करणेही शक्य झाले नाही. दरम्यान, मंत्रालयाने या प्रकल्पासाठी सबसिडी देण्याऐवजी हायब्रिड अन्युईटी मॉडेलचा स्वीकार केला.पर्यावरण मंत्रालयापेक्षा जलशक्ती मंत्रालयाचे काम चांगले आहे. त्यामुळेच सर्व नद्यांची स्वच्छता करण्याचे काम पर्यावरण मंत्रालयाकडून काढून घेऊन ते जलशक्ती मंत्रालयाकडे सोपविण्यात आले हे चांगलेच झाले. पण जलशक्ती मंत्रालयाचे कामही सोपे नाही. उद्योगातून कोणतेही सांडपाणी किंवा टाकाऊ पाणी नद्यांमध्ये सोडले जाणार नाही याची खात्री करण्याची जबाबदारी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या जलशक्ती मंत्रालयाला पार पाडावी लागणार आहे. सांडपाणी विसर्गाची शून्य पातळी गाठली गेल्यानंतरच खºया अर्थाने नद्यांचे शुद्धीकरण करण्याचे काम पूर्ण होणार आहे. नव्या मंत्रालयाकडून ते काम केले जाईल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषणGovernmentसरकार