शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

माझं माहेर खान्देशचं, सासर विदर्भातलं; बाबूजींनी ही दोन्ही नाती सांभाळली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2022 11:12 IST

राजकारणामध्ये प्रवाहासोबत वाहत जाणारे अनेक नेते, कार्यकर्ते असतात. पण, राजकारणातली तत्त्वनिष्ठा आणि विचार ठाम असलेले मोजके नेतेच प्रवाहाविरुद्ध पोहत किनारा गाठतात, अशा नेत्यांमध्ये मी जवाहरलालजी दर्डा यांचा उल्लेख आवर्जून करीन.

प्रतिभाताई पाटील, माजी राष्ट्रपती -

जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांचे आणि आमचे अगदी जिव्हाळ्याचे, कौटुंबिक  संबंध होते. माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनात त्यांचे मला मोलाचे मार्गदर्शन लाभले. इंदिरा काँग्रेस संकटात असताना आम्ही एकनिष्ठेने पक्षासाठी काम केले. आम्ही विरोधी पक्षात एकत्र काम करत असताना आमचे तेव्हाचे असलेले विरोधी पक्षनेते काँग्रेस पक्ष सोडून गेले होते. तेव्हा ‘मी विधानसभेतील विरोधी पक्षनेता व्हावे’ यासाठी बाबूजींनी मला आग्रह केला. त्यांच्या आग्रहाने मला ती जबाबदारी स्वीकारावी लागली आणि मी निष्ठेने पार पाडली. बाबूजींची पक्षाबद्दल असणारी निष्ठा अतुलनीय होती. त्यावेळी इंदिरा काँग्रेसची महाराष्ट्रातील परिस्थिती म्हणावी तेवढी चांगली नव्हती. आम्ही काही लोकच पक्षाचे निष्ठेने काम करत होतो. त्यातही काही इतर पक्षांतून प्रलोभने दाखवून पक्ष दुबळा करण्याचा प्रयत्न केला जात होता. बाबूजींनाही याबाबत खूप प्रलोभने दाखवण्यात आली होती; पण ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले. दिल्लीतही त्यांना आदराची वागणूक मिळत असे. 

राजकारणामध्ये प्रवाहासोबत वाहत जाणारे अनेक नेते, कार्यकर्ते असतात. पण, राजकारणातली तत्त्वनिष्ठा आणि विचार ठाम असलेले मोजके नेतेच प्रवाहाविरुद्ध पोहत किनारा गाठतात, अशा नेत्यांमध्ये मी जवाहरलालजी दर्डा यांचा उल्लेख आवर्जून करीन. इंदिरा गांधी यांच्या संकटकाळामध्ये बाबूजी विदर्भात इंदिराजींच्या सोबत खंबीरपणे उभे राहिले.  इंदिराजींसाठी संपूर्ण विदर्भ त्यांनी अक्षरश: घुसळून काढला. ‘लोकमत’मधून  इंदिराजींचा आणि काँग्रेसचा विचार घराघरांत  पोहोचवला, त्यामुळे महाराष्ट्रात नवा राजकीय इतिहास निर्माण करण्याचे श्रेय जवाहरलाल दर्डा यांना आहे. राजकारणात किती निर्लेप राहता येते, हेही त्यांनी दाखवून दिले. राजकीय विरोधाचे त्यांनी द्वेषात रूपांतर केले नाही, त्यामुळे त्यांच्याभोवती सदैव मित्र जमा झाले. शत्रूचे मित्रत्वात रूपांतर करण्याची एक विलक्षण हातोटी त्यांच्याजवळ होती. 

बाबूजी आणि माझा स्नेह ‘सासर आणि माहेर’ अशा दोन्ही ठिकाणी आला. माझं माहेर खान्देशचं. जळगावातून त्यांनी १९७७ साली ‘लोकमत’चे प्रकाशन सुरू केलं. माझं सासर विदर्भातील अमरावतीचं. बाबूजींची  राजकीय, सामाजिक आणि पत्रकारितेतील सगळी कारकिर्द विदर्भातूनच सुरू झाली. त्यामुळे त्यांचं आणि माझं नातं बहीण-भावाचंच होतं. 

ते अकाली गेले याचं दु:ख मला कायम वाटतं. बाबूजी गेले तेव्हा एक आधारवड हरपल्याचीच आम्हा सर्वांची भावना होती. त्यांच्या पवित्र स्मृतींना  अभिवादन आणि भावपूर्ण आदरांजली.

टॅग्स :Jawaharlal Dardaजवाहरलाल दर्डाPratibha Devisingh Patilप्रतिभा देवीसिंग पाटीलcongressकाँग्रेस