शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

तुकाराम मुंढेंचा मंत्रालय मुक्काम तरी सुखकर ठरो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 10:46 IST

अधिकारी व लोकप्रतिनिधींमध्ये बिनसण्याच्या कारणांत जुळवून घेता न येण्याचा मुद्दा नेहमी चर्चेत येत असतो. या जुळवून घेण्याला अनेक संदर्भ चिकटलेले असतात....

- किरण अग्रवाल, निवासी संपादक

अधिकारी व लोकप्रतिनिधींमध्ये बिनसण्याच्या कारणांत जुळवून घेता न येण्याचा मुद्दा नेहमी चर्चेत येत असतो. या जुळवून घेण्याला अनेक संदर्भ चिकटलेले असतात, जे अधिकतर नियमबाह्य कामांसाठीच्या ‘मिलिजुली’चे संकेत देणारे असतात. तसल्या जुळणीचे समर्थन कुणालाही करता येऊ नये; परंतु परस्परांचा आब राखत उभयतांमध्ये सामोपचार-समन्वय असण्याच्या अपेक्षेबाबत कुणाचेही दुमत असू नये. नाशिक महापालिकेतील सत्ताधारी व आयुक्त तुकाराम मुंढे या दोघांमध्येही त्याचीच उणीव राहिली. त्यामुळेच ज्या कामांसाठी मुंढे यांना नाशकात पाठविण्यात आले होते, ते दृष्टिपथात येण्यापूर्वीच अवघ्या नऊ महिन्यांत त्यांची उचलबांगडी करण्याची वेळ शासनावर आली.

शिस्तप्रिय व कर्तव्यकठोर अधिकारी असा लौकिक असलेल्या तुकाराम मुंढे यांची नाशिक महापालिकेत आयुक्त म्हणून पाठवणूक करण्यात आली होती तेव्हा नाशिककरांच्या अपेक्षा उंचावून गेल्या होत्या. कारण पालिकेतील कारभाऱ्यांच्या अनागोंदीचा व प्रशासनाच्या बेपर्वाईचा इतिहास समोर होता. मुंढे यांनी आल्या आल्या त्यादृष्टीने कामही सुरू केले होते. प्रशासनातील सुस्ती तर त्यामुळे उडालीच, शिवाय पालिकेला आर्थिक शिस्त लागू पाहत होती. अनावश्यक कामांवरील उधळपट्टी रोखताना पाणीपुरवठा व मलवाहिकांसंबंधीच्या मूलभूत कामांकडे मुंढे यांनी लक्ष पुरवले होते. परंतु एकीकडे असे आशावादी चित्र असताना दुसरीकडे अशाही परिस्थितीत लोकप्रतिनिधींशी जो समन्वय राखला जाणे अपेक्षित असते, ते घडून न आल्याने मुंढे यांची नाशकातील कारकिर्दही अल्पकालीनच ठरली.

महत्त्वाचे म्हणजे, नाशिककरांनी यंदा महापालिकेची सत्ता एकहातीपणे भाजपाच्या हाती सोपविली ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाखातीर. नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी प्रचारातील शेवटच्या सभेत केली आणि गणिते बदलली. त्यामुळे धडाकेबाज निर्णय घेत केंद्राच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या माध्यमातून नाशिकचा चेहरामोहरा बदलवून या शहरातील ‘कमळा’ची पाळेमुळे घट्ट करण्याच्या हेतूने खरे तर मुख्यमंत्र्यांनी मुंढे यांना नाशकात धाडल्याचे बोलले गेले होते. मुंढे यांनी त्याही दिशेने पावले टाकत काही कामे मार्गी लावलीत; पण पूर्णत्वास गेलेल्या प्रकल्पांची लोकार्पणे करताना लोकप्रतिनिधींना डावलण्याची भूमिका त्यांनी घेतल्याने संघर्ष गहिरा होऊन गेला. लोकप्रतिनिधी व प्रशासन या दोन्ही चाकांच्या सोबतीने चालणे थांबून एकमेकांना आडवे जाण्याची प्रक्रिया त्यातून घडून आली. जुळवून घेण्याची अपेक्षाच नव्हती, पण किमान सामोपचारही ठेवला न गेल्याने त्याची धग मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली व अखेर स्मार्ट सिटीच्या उद्दिष्टपूर्तीपूर्वीच मुंढे यांना नाशकातून हलविणे त्यांना भाग पडले.

मुंढे यांच्याबाबत असे वारंवार का व्हावे, हा यातील मूळ प्रश्न आहे. कर्तव्यकठोरता कुणालाही मानवत नाही हे खरेच; परंतु लोकांनी निवडून पाठविलेल्या प्रतिनिधींचा सन्मान राखण्यात ही कठोरता का आड यावी? लोकप्रतिनिधींचा आब राखूनही शिस्त साकारता येतेच की, पण स्वप्रतिमेच्या प्रेमात पडलेल्यांकडून त्याचे भान बाळगले जात नाही. गडबड होते ती तिथेच. मुंढे यांच्याबाबत नेहमी वादग्रस्तता ओढवते तीही त्यातूनच. त्यामुळे नाशिक महापालिकेच्या दारी दिवाळीनंतर फटाके फोडण्यात आले असले तरी, मुंढे आता मंत्रालयात गेल्याने त्यांचा तेथील मुक्काम तरी सुखकर ठरो एवढीच अपेक्षा.

 

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेMantralayaमंत्रालय