शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

सहलीच्या आयचा घो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 07:46 IST

खरं तर दरवर्षी शाळेमध्ये मुलांना दोन-चार गोष्टींचेच आकर्षण असते. दिवाळी सुट्टी, खेळाचा तास, मे महिन्याची सुट्टी, स्रेह संमेलन आणि सहल. गेल्या काही वर्षांत सहलीवर मात्र बरीच बंधने आली आहेत. ही सहल नक्की विद्यार्थ्यांसाठी असते की, शिक्षकांसाठी?

- विनायक पात्रुडकर

खरं तर दरवर्षी शाळेमध्ये मुलांना दोन-चार गोष्टींचेच आकर्षण असते. दिवाळी सुट्टी, खेळाचा तास, मे महिन्याची सुट्टी, स्रेह संमेलन आणि सहल. गेल्या काही वर्षांत सहलीवर मात्र बरीच बंधने आली आहेत. ही सहल नक्की विद्यार्थ्यांसाठी असते की, शिक्षकांसाठी? हा प्रश्न तर अनेकांना पडलेला असतो. यंदा सहल नक्की कुठे न्यायची यावर स्टाफरूममध्ये घमासान असते. प्राथमिक आणि माध्यमिक गटाची विभागणी करून त्यांना नेताना शिक्षकांची दमछाक होते. तरीही दरवर्षी सहलीचा उत्साह ओसंडून वहात असतो. मुंबईसारख्या महानगरात विद्यार्थ्यांना सहलीला कोठे न्यायचे, असा प्रश्न पडतोच. या सहलीतून आनंदासोबत प्रबोधन व्हावे, असा हेतू असतोच. गेल्या काही वर्षांत ठिकठिकाणी उभ्या राहिलेल्या मॉलमध्ये मुलांना नेले जाते. तिथल्या खेळण्याच्या विभागात मुलांचे दोन चार तास निघून जातात. मॉलचेही बॅ्रंण्डींग होते. पूर्वी साधारणपणे धरण क्षेत्रात सहलीचे नियोजन व्हायचे किंवा अलिकडे रिसॉर्टवरही सहल काढल्या जातात. या सहलीतून नेमके कोणते प्रबोधन केले जाते, हा संशोधनाचा विषय आहे. विद्यार्थ्यांनाही त्यातून काही अपेक्षा नसते, ना पालकांना चिंता असते. त्यामुळे सहल हा भाग सुट्टीचाच गृहित धरला जातो. 

आता मात्र शिक्षण विभागाने या सहलीकडे गांर्भीयाने पहायचे ठरविले आहे. सहल कशा असाव्यात याचे परिपत्रकच विभागाने जारी केले आहे. तसे या परिपत्रकाचे स्वागत करायला हवे. कारण या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे बौध्दीक ज्ञान वाढेल अशा ठिकाणीच सहलींचे नियोजन करणे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना बंधनकारक आहे. महत्त्वाचे म्हणजे सहलीमध्ये काय दोष निघाल्यास स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांची परवानगी न घेताच मुख्याधापकावर कारवाई होणार आहे. शाळा प्रमुख म्हणून ही जबाबदारी निश्चित झाल्याने यापुढे किमान सहल तरी सुरक्षित होईल, अशी आशा बाळगायला हवी. मुळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेचीच असते. उच्च न्यायालयानेही तसा निकाल दिला आहे. शाळा आपली जबाबदारी कधीच झटकू शकत नाही. गेल्यावर्षी अलिबाग येथे सहल दुर्घटनेप्रकरणी संबंधित शाळा शिक्षकांवर गुन्हा नोंदवण्यात आला. या दुर्घटनेला आपण जबाबदार नाही, अशी भूमिका शिक्षकांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जात घेतली होती. याआधी सायन येथील महापालिकेच्या शाळेत शिकणा-या विद्यार्थ्याच्या डोळ्याला दुखापत झाली होती. हे प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत पोहोचले होते. न्यायालयाने पीडित मुलाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या या निकालानेही शाळेची जबाबदारी निश्चित केली होती. तसेच शाळा सहलींचे नियोजन व्हायला हवे, असेही न्यायालयाने वारंवार प्रशासनाला बजावले होते. त्याकडे सरास दुर्लक्ष करण्यात आले.

परिणामी सहलीत विद्यार्थ्यांचा बळी जाण्याच्या घटना घडत राहिल्या. मुळात सहलीचा उद्देश हा विद्यार्थ्यांचे बौद्धिक ज्ञान वाढवणे असाच असायला हवा. मात्र हा उद्देश बाजूला ठेवून विरंगुळा करण्यासाठी सहलीचे नियोजन सुरू झाले. समुद्र किंवा धबधब्याजवळ सहल नेणे हे सोयीचे आणि नित्याचे झाले. मात्र त्याचे दुष्परिणामही दिसू लागले. त्यामुळे उशिरा का होईना प्रशासनाने सहलीला निर्बंध घातले. आता या निर्बंधांची अंमलबजावणी कशी होणार हेही महत्त्वाचे आहे. लाल फितीत सर्व नियम अडकून राहतात ही आपली परंपरा आहे. ही परंपरा या परिपत्रकासाठीही कायम राहिली तर सहलींचे नियोजन विरंगुळा करण्यासाठीच होईल. त्यातून काही बौद्धीक साधता येणार नाही. विद्यार्थ्यांची सुरक्षाही रामभरोसे असेल. तेव्हा किमान या परिपत्रकाला अनुसरूनच शाळा व कनिष्ठ महाविद्यालये सहलींचे नियोजन करतील, एवढी अपेक्षा तूर्त ठेवायला हवी.

 

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षकEducationशिक्षण