शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्री महोदय, कोकण महाराष्ट्रात येत नाही का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 07:12 IST

मुंबई - गोवा चारपदरी रस्त्याची पहिली कुदळ डिसेंबर २०११ मध्ये मारली गेली. दहा वर्षे उलटली तरीही या रस्त्याचे काम अजून पूर्ण होत नाही, याचा अर्थ काय? 

शरद कदम - सामाजिक कार्यकर्ते -कोकणात रेल्वे आली, सिंधुदुर्गात विमानतळ झाले. आता प्रतीक्षा रत्नागिरी विमानतळाची आणि मुंबई - गोवा चारपदरी रस्ता पूर्णत्वाला जाण्याची!      या रस्त्याची जुलै २०२१ पर्यंतची  स्थिती काय? कुठपर्यंत काम झाले आहे? आणखी किती वर्षे या कामाला लागणार? खड्डे आणि अपघात यातून सुखरूप असा प्रवास कधी सुरू होणार? - यासारखे असंख्य प्रश्न कोकणातील लोकांच्या मनात आहेत. चौपदरी रस्त्याचे काम सुरू होण्यापूर्वी या मुंबई-गोवा महामार्गावर दररोज एक-दोन अपघात होऊन यामध्ये काहींनी जीव गमावला, काही जण गंभीर जखमी होऊन अपंग झाले तर काहींची कुटुंबे  उद्ध्वस्त झाली.   डिसेंबर २०११ मध्ये या चारपदरी रस्त्याच्या कामाची  पहिली कुदळ मारली गेली. पुढे काय झाले?- या प्रश्नाचे उत्तर संतापजनक आहे.  ना कोकणच्या लोकांना विकासाच्या कामात रस, ना इथल्या लोकप्रतिनिधींना! कोकणी माणूस जाता-येता सरकारला दोष देत, काय करायला पाहिजे हे गाडीत बसलेल्या आजूबाजूच्या माणसाला सांगत गावी येईल. मग, गावात आल्यावर गावकी आणि भावकीमध्ये गुंतला की या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करेल. पण, आता संबंधित यंत्रणेला प्रश्न विचारीत राहिले पाहिजे.     पळस्पे ते इंदापूर या ८४ किलोमीटरच्या कामाला सुरुवात होऊन दहापेक्षा जास्त वर्षे झाली आहेत. काँग्रेसच्या राजवटीत या कामाला सुरुवात झाली. त्यानंतर युतीचे शासन सत्तेवर आले; आणि आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. पण,  इतक्या वर्षांत हा रस्ताही पूर्ण होऊ शकला नाही. जून २०२२ पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल, असे शासनाने माननीय उच्च न्यायालयात सांगितले  असताना खरेच हा मार्ग या वेळेत  पूर्ण होईल का, याची शंका येते.   पहिल्या टप्प्याच्या या रस्त्याच्या कामाचा वेग जर दरवर्षी फक्त ९ ते १० किलोमीटर एवढाच असेल तर आणि दहा वर्षांनंतरही पळस्पे ते इंदापूर हे ८४ किलोमीटरचे अंतर पूर्ण होत नसेल तर या सरकारवर विश्वास कसा ठेवायचा?   मुंबई ते गोवा या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या  कामाला सुरुवात झाल्यानंतर मुंबई ते कोल्हापूर, मुंबई ते सोलापूर, मुंबई ते धुळे आणि औरंगाबाद हे चारपदरी मार्ग सुरूही झाले. मग, कोकणच्या वाट्याला ही उपेक्षा का?   इंदापूर ते हातखंबा, पालीपर्यंत काम ज्या गतीने सुरू आहे ते पाहिल्यानंतर कोकणच्या माणसाच्या सहनशीलतेला सलाम करावासा वाटतो. कशेडी घाट उतरल्यानंतर  खवटीपासून भरणा नाका, खेड रेल्वे स्टेशन इथला अपवाद सोडला तर आवाशी फाटापर्यंत रस्ता खरंच सुंदर आणि देखणा झाला आहे. लोटेपासून मात्र परशुराम घाट, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, हातखंबापर्यंत आनंदीआनंद आहे. आरवली ते लांजा या टप्प्यातील काम तर किती तरी दिवस बंदच होते. आता कुठे या कामाला सुरुवात झालेली दिसते आहे. पनवेलपासून सावंतवाडीपर्यंतच्या टप्प्यातले सर्वपक्षीय  आमदार, खासदार कोकणातल्या या रस्त्याच्या प्रश्नावर कधी  एकत्र येणार? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन केंद्रीय रस्ते मंत्र्यांना कोकणातील जनतेची फिर्याद कधी ऐकवणार? ही राजकीय इच्छाशक्ती कोणताच  राजकीय नेता आणि पक्ष यांच्याकडे नसल्यामुळेच १० वर्षांहून अधिक काळ या रस्त्याचे काम कूर्मगतीने सुरू आहे.    पळस्पे ते झाराप हा चारपदरी मार्ग सरकारनेच न्यायालयाला  दिलेल्या जून २०२२ पर्यंत पूर्ण झाला पाहिजे. सागरी महामार्ग, जल वाहतूक, रत्नागिरीचे विमानतळ आणि रामवाडीपासून सावंतवाडीपर्यंतची सर्व एस.टी. स्थानके नव्याने बांधली पाहिजेत. राष्ट्रीय महामार्गाची ही दुरवस्था तर कोकणातले अंतर्गत  रस्ते हा तर चीड आणणारा प्रश्न आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी राज्य आणि केंद्र सरकारकडे आग्रह धरला पाहिजे. कोकणची माणसं साधी भोळी... हे गाण्यात जरी ठीक असले तरी त्यांचा फार अंत बघू नका. मुकी बिचारी कुणीही हाका अशी त्यांची अवस्था करू नका, एवढीच विनंती. 

 

टॅग्स :State Governmentराज्य सरकारMumbaiमुंबईUddhav Thackerayउद्धव ठाकरेGovernmentसरकार