शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

माणसाच्या श्वासासाठीची चळवळ

By गजानन दिवाण | Published: February 13, 2020 5:03 AM

जशी समज येत गेली तसे कधी विकासाच्या नावाखाली, तर कधी अन्य कुठल्या कारणासाठी आम्ही याच झाडांवर कुºहाड चालविली.

झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात, हे प्राथमिक धडे सर्वांनीच गिरवले. जशी समज येत गेली तसे कधी विकासाच्या नावाखाली, तर कधी अन्य कुठल्या कारणासाठी आम्ही याच झाडांवर कुºहाड चालविली. रुग्णालयात आॅक्सिजन लावल्यानंतर क्षणाक्षणाला वाढणारे बिल प्रत्येकाला माहीत असले तरी ‘ऑक्सिजन’ची खरी किंमत आम्ही ओळखलेलीच नाही. तसे नसते तर खुलेआम झाडांची कत्तल केली गेली नसती. यावर बोलण्याचीही सोय नाही. विकास हवा की पर्यावरण म्हणत हे विकासवादी पर्यावरणवाद्यांची तोंडे बंद करण्यासाठी सरसावतात. एकीकडे ३३ हजार कोटी झाडे लावण्याचा इव्हेंट साजरा करायचा आणि त्याच वेळी रस्त्यांच्या विस्तारीकरणासाठी पूर्णवाढ झालेली हजारो झाडे तोडायची, हा कुठला न्याय? अशा इव्हेंटप्रिय जगात मराठवाड्यासारख्या कायम दुष्काळ सहन करणाऱ्या भागात आशेचा एक किरण दिसत आहे. सह्याद्री देवराईचे निर्माते अभिनेते सयाजी शिंदे १३ आणि १४ फेब्रुवारी असे दोन दिवस वृक्षसंवर्धनाचा जागर करणार आहेत.

वृक्षसंवर्धनाचा जागर करण्यासाठी राज्यात मराठवाड्यासारखे दुसरे ठिकाण नसावे. वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका याच परिसराने सहन केला. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ मराठवाड्याच्या पाचवीला पूजलेला आहे. म्हणूनच सयाजी शिंदे यांनी बीडजवळील पालवनच्या उजाड माळरानावर हे वृक्षसंमेलन आयोजित केले आहे. चार वर्षांपूर्वी म्हणजे २०१६ साली पालवन येथे अगदी बोडका असलेला डोंगर सयाजी शिंदे यांनी निवडला. प्रारंभी ३५ एकरांवरच वृक्ष लागवड केली. आज २०७ एकरांवर एक लाख ६७ हजार झाडे लावली असून अगदी बोडका असलेला हा डोंगर आता हिरवा शालू नेसून नटला आहे. बोडक्या डोंगराचे नटलेले हे रूप सर्वांसमोर आणण्यासाठी सयाजी शिंदे यांनी बीडजवळील याच डोंगरावर हे वृक्षसंमेलन आयोजित केले आहे. ‘३३ कोटी’ वृक्षारोपणाच्या इव्हेंटनंतर असे ठिकठिकाणी जंगल दाखवता आले तर त्याचे यश समजू शकले असते; पण मागच्याच वर्षीच्या खड्ड्यात पुन्हा-पुन्हा झाड लावले तर केवळ कागदांवरील झाडांची संख्या वाढते. म्हणूनच सयाजी यांनी केलेले हे काम वृक्षारोपणाचे इव्हेंट करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे.

भारतीय वनांची सद्य:स्थिती दर्शविणारा ‘इंडियाज स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट’ अलीकडेच समोर आला. त्यात महाराष्ट्र देशात सहाव्या स्थानाहून ११व्या स्थानावर फेकले गेले आहे. २०१७च्या अहवालानुसार राज्यात ८,७३६ चौ.कि.मी. घनदाट २०,६५२ चौ.कि.मी. मध्यम दाट व २१,२९१ चौ.कि.मी. विरळ जंगल होते. या तिन्ही प्रकारांत आता घट झाली. राज्यात केवळ विरळ जंगल वाढले आहे. महाराष्ट्रामध्ये जे ‘अत्यंत घनदाट’ व ‘सर्वसाधारण दाट’ जंगल ७ डोंगराळ जिल्हे व १२ आदिवासीबहुल जिल्ह्यांमध्ये आहे. या आदिवासी जिल्ह्यांमध्येच घनदाट, मध्यम दाट व विरळ या तिन्ही जंगल प्रकारात घट नोंदविण्यात आली आहे. मग राज्यात २०१९ साली ३३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. ही झाडे गेली कुठे? यातली किती झाडे जगली? राज्य शासनाच्या वृक्षलागवडीच्या या इव्हेंटवर सयाजी यांनी टीका करताच मोठा गोंधळ उडाला. एका खड्ड्यात किती झाडे लावणार, हा त्यांचा सवाल चर्चेत खूप राहिला. तो गांभीर्याने कोणीच घेतला नाही. आम्हाला वृक्षारोपण करण्याची मोठी हौस जडली आहे. वेगवेगळ्या निमित्ताने ही हौस आम्ही भागवतो आणि सोशल मीडियातून व्हायरल करतो. लावलेली ही झाडे जगवायची कोणी? वृक्षारोपण महत्त्वाचे आहेच, त्याचे संवर्धनही तेवढेच महत्त्वाचे आहे.

जगाची लोकसंख्या १.६ अब्जांनी वाढली आहे. एवढ्या संख्येने असलेल्या लोकांचे पोट भरण्यासाठी आम्ही निसर्ग अक्षरश: ओरबाडून खात आहोत. परिणामी, हरितगृह वायूंचे उत्सर्जन ४८ टक्क्यांनी वाढले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीनुसार, गेल्या १० वर्षांत पृथ्वीच्या तापमानात झालेल्या वाढीपैकी ८५ टक्के तापमानवाढ एकट्या कार्बन डायआॅक्साइडमुळे झाली आहे. अधिकाधिक वाहनांचा आणि विजेचा वापर हे यामागचे मूळ कारण. यातून कार्बन डायआॅक्साईडची निर्मिती करीत आम्ही तापमानवाढीला हातभार लावत असतो. ही तापमानवाढ रोखण्यासाठी व पर्यावरणाच्या संतुलनासाठी एकूण भूभागापैकी ३३ टक्के क्षेत्र हरित आच्छादनाखाली म्हणजेच वनांखाली असणे आवश्यक आहे. मात्र, तसे होत नाही. वृक्षलागवडीचे इव्हेंट वाढले असले तरी गेल्या २५ वर्षांत ३०० दशलक्ष हेक्टर क्षेत्रावरील वने तोडण्यात आली, हे भयंकर वास्तव नाकारून कसे चालेल?

भारतामध्ये १९८० ते २००५ या कालावधीत १ लाख, ६४ हजार ६१० हेक्टर जंगलांचे खाणींमध्ये रूपांतर झाले आहे. खाणीसाठी रूपांतरित झालेल्या वनजमिनीपैकी निम्म्याहून अधिक जमिनीवर आज कोळशाच्या खाणी आहेत. हा देशाचा विकास समजायचा, की पर्यावरणाचा ºहास? अशा चिंताजनक स्थितीतून आम्ही जात असताना अभिनेते सयाजी शिंदे यांनी हाती घेतलेले हे काम असामान्य आहे. हा सयाजी यांचा पडद्यावरचा अभिनय नाही. पर्यावरणाला हातभार लावण्यासाठी अभिनेत्याने हाती घेतलेली ही श्वासासाठीची लढाई आहे. या लढाईत त्यांना साथ कोण देणार?- गजानन दिवाण उपवृत्तसंपादक, लोकमत, औरंगाबाद

टॅग्स :Green Planetग्रीन प्लॅनेटenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषण