शहरं
Join us  
Trending Stories
1
कोट्यवधींची गुंतवणूक, १६ लाखांहून अधिक रोजगारनिर्मिती; मुंबईसाठी CM फडणवीसांचा अजेंडा
2
'या' स्कीममध्ये तुमच्या मुलीसाठी उभा करू शकता ४७ लाख रुपयांचा फंड; सरकार देतेय ८.२% चं व्याज, जाणून घ्या
3
जयपूरमध्ये कारचं मृत्यूतांडव! रेसिंगच्या नादात १६ जणांना चिरडलं; एकाचा जागीच मृत्यू, शहरात खळबळ
4
सुझुकीने अखेर ईलेक्ट्रीक स्कूटर e-Access लाँच केली, ९५ किमी रेंजसाठी किंमत एवढी ठेवली की...
5
"मी गरीब आहे, मला डॉक्टर व्हायचंय..."; मुख्यमंत्र्यांना भेटता न आल्याने विद्यार्थिनीला कोसळलं रडू
6
ट्रम्प टॅरिफबाबत अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात काय-काय झालं? भारतावर किती परिणाम, जाणून घ्या
7
पाकिस्तानच्या कुरापती सुरूच! सांबाच्या फ्लोरा गावात ड्रोनने पाडलं पॅकेट; बीएसएफने उधळला पाकचा डाव
8
जपानच्या अधिकाऱ्याचा फोन चीनच्या विमानतळावर चोरीला गेला; अणुऊर्जा प्रकल्पांसह अत्यंत गोपनीय माहिती लीक होण्याचा धोका...
9
परभणी-जिंतूर मार्गावर पहाटे भीषण अपघात; कीर्तनाहून परतणाऱ्या तीन वारकऱ्यांचा मृत्यू
10
डोनाल्ड ट्रम्प यांची तेल कंपन्यांसोबत बैठक, अमेरिका भारताला व्हेनेझुएलाचे तेल देण्यास तयार; पण एका अटीवर...
11
ठाकरेंनी एक तरी ठोस विकासकाम दाखवावे; मुख्यमंत्री फडणवीस यांचे युतीच्या प्रचारसभेत आव्हान
12
भयंकर प्रकार! 'द राजा साब'च्या स्क्रीनिंगदरम्यान प्रभासच्या चाहत्यांनी कागदाचे तुकडे जाळले, व्हिडीओ व्हायरल
13
बांगलादेशात नव्या युगाची नांदी! खालिदा जिया यांच्यानंतर आता सुपुत्र तारिक रहमान यांच्याकडे बीएनपीची धुरा
14
आजचे राशीभविष्य १० जानेवारी २०२६ : धनु राशीला पदोन्नतीचे योग, तर तूळ राशीने राहावे सतर्क; वाचा काय सांगते तुमचे नशीब!
15
आमच्या अस्तित्वासाठी नव्हे, राज्यातील भावी पिढीच्या भवितव्यासाठी एकत्र आलो: ठाकरे बंधू
16
वडापाव-दाल पकवानचे महागठबंधन सत्तेवर येणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी-सिंधीवर भाष्य
17
कुठे, कोणत्या मुद्द्यांवर निवडणूक? मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पनवेलमध्ये काय गाजतेय?
18
अजित पवारांची मिळाली साथ; अंबरनाथमध्ये शिंदेसेनेने भाजपचे ‘सत्तास्वप्न’ लावले उधळून
19
अमेरिका : मोदींनी फोन न केल्याने करार रखडला; भारत : मोदी-ट्रम्प यांच्यात ८ वेळा फोनवर संवाद
20
यंदा अर्थसंकल्प रविवारी मांडणार? अधिवेशन सुरू होणार २८ जानेवारीपासून; १३ फेब्रुवारीला संपेल
Daily Top 2Weekly Top 5

डोंगर-दऱ्या, नद्या, प्राणी-पक्षी, माणूस आणि माधव गाडगीळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 04:40 IST

माधव गाडगीळ यांनी पर्यावरण संवर्धनासाठी लढणाऱ्या व्यक्ती, छोट्या संस्थांना बळ दिले. त्यांच्या मांडणीत तळागाळातील ‘माणूस’ नेहमीच केंद्रस्थानी असे.

अभिजित घोरपडे, संस्थापक, भवताल पर्यावरण अभ्यासक

साधारण पंधरा वर्षांपूर्वीची गोष्ट. हिवरे-बाजार गावचा कायापालट करणारे सरपंच पोपटराव पवार यांचा फोन आला. मी, माधव गाडगीळांना त्यांच्या गावाला घेऊन यावं, अशी विनंती होती. एके दिवशी सकाळी गाडगीळ, मी आणि पोपटरावांचा एक कार्यकर्ता असे हिवरे-बाजारकडे निघालो. वाटेत नास्ता करताना पिण्यासाठी त्यांच्यासाठी बाटलीबंद पाणी मागवले; पण बाटलीतले पाणी नाकारून गाडगीळ स्थानिक पाणीच प्यायले. ते म्हणाले, इथले स्थानिक लोक हे पाणी पितातच ना, मग आपणही ते प्यायला काय हरकत आहे? अगदी त्रास झालाच तर एखादा दिवस होईल; पण त्याच्यामुळे आपली प्रतिकारक्षमता वाढेल हे निश्चित... त्यानंतर हिवरे-बाजार गावाच्या भेटीत तिथे पुनरुज्जीवित झालेल्या झऱ्यांचे पाणी आम्ही सर्वजण तोंड लावून प्यायलो. अशा वेगवेगळ्या भेटींमधून, प्रसंगांमधून आणि गप्पांमधून गाडगीळांची ओळख होत गेली. 

एकदा त्यांच्याशी गप्पांमध्ये विषय निघाला रंगाचा आणि सौंदर्याचा. आपल्याकडे त्वचेच्या गोऱ्या रंगाला सौंदर्याशी अगदी अलीकडच्या काळात जोडले गेले असे त्यांचे मत होते. रंगावरून सुंदर असणे किंवा नसणे ही मांडणी त्यांना अगदीच नापसंत होती. त्यासाठीचे दाखले देताना ते द्रौपदीचे उदाहरण देत. त्याबाबतचे संदर्भ, दाखले वाचले तर ती त्या काळातील सौंदर्यवती असल्याचे समजते; पण त्याच वेळी तिचा रंग काळा होता हेही तिच्या वर्णनावरून समजते. त्यामुळे सुंदर असण्याचा आणि गोऱ्या रंगाचा मुळीच संबंध नव्हता. उलट आपल्याकडे काळा हा सौंदर्याचा रंग होता, असे ते म्हणत. इंग्रजांच्या प्रभावामुळे अलीकडच्या काळात त्वचेच्या गोऱ्या रंगाला अनाठायी महत्त्व प्राप्त झाल्याचे ते सांगत.

गाडगीळांच्या बोलण्यात सरकारी कारभारावर, विशेषत: वनविभागावर रोष जाणवत असे. वनांचे संरक्षण हे लोकांच्या सहभागातूनच होऊ शकते. वनविभागाच्या बंधनांमुळे वनांमध्ये राहत असलेल्या लोकांना, मुख्यत: आदिवासींना नाहक त्रास होत असल्याचे त्यांचे ठाम मत होते. त्यांना त्रास होत असतानाच वनांचे रक्षणही होत नसल्याची मांडणी ते करत. वनजमिनी मोठमोठ्या भांडवलदारांना देऊन खाणींसाठी जंगले तोडली जातात आणि आदिवासींनी त्यांच्या गरजांसाठी चार फांद्या तोडल्या तर तो मोठा गुन्हा ठरवला जातो... संवर्धनाच्या नावाखाली अशा विसंगतींवर गाडगीळ अचूक बोट ठेवत. हीच बाब नद्या आणि इतरही नैसर्गिक स्त्रोतांनाही लागू असल्याचे ते वेळोवेळी मांडत आणि सरकारी कारभारावर कोणतीही भीडभाड न बाळगता थेट टीका करत.

पर्यावरण संवर्धनासाठी गाडगीळांच्या मांडणीत तळागाळातील माणूस केंद्रस्थानी असे. त्यातूनच ते वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान होत असल्यामुळे नियंत्रित पद्धतीने शिकारीला परवानगी देण्याची पाठराखण करत. या मुद्द्यामुळे त्यांच्यावर बरीच टीकाही झाली; पण वानरे, मोर, बिबटे, गवे-हत्ती यांच्यामुळे होणारे नुकसान पाहता ‘त्यांचा बंदोबस्त करणार की केवळ हाताची घडी घालून गप्प राहणार?’ असा त्यांचा सवाल असे. कितीही टीका झाली तरी ते त्यांच्या मुद्द्यावर ठाम होते.

मुंबईत भटक्या पारव्यांचा मुद्दा पेटलेला असताना माझ्या एका लेखाबाबत चर्चा सुरू असताना गाडगीळांशी ‘आहारातील विविधता’ यावर सविस्तर चर्चा झाली. शाकाहार करावा की मांसाहार? हा मुद्दा नेहमी चर्चेत असतो; पण ‘कोणी काय खावे यात इतरांनी का पडावे?’ हे गाडगीळ यांचे मत. पारव्यांना आपल्यापासून दूर राखण्यासाठी बरेच उपाय केले जातात; पण त्यावरची सोपी मात्रा म्हणजे- ही समस्या फासेपारधी समाजावर सोपवावी. त्यांच्यासाठी प्रोटिनचा उत्तम स्त्रोत निर्माण होईल आणि पारव्यांची समस्याही सुटेल. आहारातील विविधता महत्त्वाची आहे. पारवे हे काही जणांचे अन्न असते, तर काहींचा प्रोटिनचा स्त्रोत मुंग्या असतात... त्यात इतरांची ढवळाढवळ कशाला?... इति माधव गाडगीळ !

गेले आठवडाभर केरळच्या दौऱ्यावर होतो. तिथे पश्चिम घाट आणि पर्यावरणासंदर्भात काम करणारे अनेक कार्यकर्ते भेटले. त्यांनी गाडगीळ यांची आठवण काढली. कारण त्यांच्या छोट्या-छोट्या गटांशी आणि त्यांच्या लहान-मोठ्या कामांशी गाडगीळ यांचा थेट संपर्क होता. तो जसा पश्चिम घाटासंदर्भातील संस्थांशी होता, तसाच तो मेळघाट, विदर्भ, कोकण आणि अनेक राज्यांमधील संस्थांशीही होता. कोणत्याही मोठ्या संस्थांपेक्षा लहान संस्था, गट यांच्याशी जोडलेले राहणे आणि त्यांना बळ देणे हे त्यामागचे कारण. माधव गाडगीळ यांनी पर्यावरण संवर्धनासाठी लढणाऱ्या व्यक्ती, संस्थांना बळ दिले आणि या विषयाला वेगळा आयामही दिला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.abhighorpade@gmail.com 

English
हिंदी सारांश
Web Title : Madhav Gadgil: Ecology, People, and Conservation - A Tribute

Web Summary : Madhav Gadgil championed grassroots environmentalism, advocating for local involvement and criticizing restrictive forest policies. He supported regulated hunting to protect crops and valued diverse diets. Gadgil connected with and empowered small organizations across India, leaving a lasting impact on conservation efforts.
टॅग्स :Puneपुणेenvironmentपर्यावरण