शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

पोस्ट, लाइक, फॉरवर्ड...मंत्र्यांच्या मानेवर खडा; या व्यवस्थेचा भाजपलाही फायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2024 08:01 IST

प्रत्येक मंत्रालयाकडे समाजमाध्यमे हाताळणारे कर्मचारी सज्ज असतात. मोदी सरकारमधील मंत्र्यांना याबाबतीत मानेवर काटा ठेवून काम करावे लागते!

हरीष गुप्ता, नॅशनल एडिटर, लोकमत, नवी दिल्ली

लहान मुले त्यांचा जास्तीत जास्त वेळ समाजमाध्यमे पाहण्यात घालवतात याबद्दल जगभरातील पालक चिंतित आहेत. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि इतर समाजमाध्यमांचा वापर कमी कसा करता येईल यावर धोरणकर्ते चर्चा करत आहेत. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंत्रिमंडळातील सहकारी आणि वरिष्ठ नेते मात्र सरकारने घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी समाजमाध्यमांचा जास्तीत जास्त वापर करत आहेत. आपल्या मंत्रालयाने घेतलेले निर्णय शक्य तितक्या लवकर या माध्यमांवर झळकलेच पाहिजेत, अशी अपेक्षा प्रत्येक केंद्रीय मंत्र्याकडून ठेवली गेली आहे. सरकारच्या निर्णयावर एखादी प्रतिकूल प्रतिक्रिया विरोधी पक्षांकडून उमटली तर त्यावर संबंधित मंत्र्यांनी सत्वर उत्तर द्यावे, अशीही अपेक्षा आहे. अशा प्रतिकूल शेरेबाजीचा तत्काळ समाचार घेण्यासाठी भाजप नेत्यांची फौजही तयारच असते.

प्रत्येक मंत्रालयाकडे समाजमाध्यमे हाताळणारे कर्मचारी अहोरात्र सज्ज असतात. मात्र, सर्व पोस्ट आणि ट्वीट्स मंत्रालयाच्या वरिष्ठ स्तरावरून पाहून मग पुढे पाठवले जातात. सर्वच मंत्र्यांना याबाबतीत मानेवर काटा ठेवून काम करावे लागते. पक्षाचा समाजमाध्यम विभाग २४ तास काम करतो आणि या सर्व व्यासपीठांवर काय चालले आहे याचा धांडोळा घेत असतो. एखादा मुद्दा समोर आल्यास त्यावर माध्यमांत एकाच सुरात प्रतिक्रिया कशी द्यायची हे संबंधित मंत्री आणि पक्षाचे नेते यांच्याशी समन्वय साधून भाजपचे माध्यम विभागप्रमुख अनिल बलूनी ठरवतात. या व्यवस्थेचा भाजपला भरपूर फायदाही झाला. पक्ष आणि भाजपशासित राज्यांतील सरकारे यांच्यातही अशाच प्रकारे समन्वयाची व्यवस्था करणे हे पुढचे मोठे काम असेल. त्याकडेही हळूहळू लक्ष दिले जात आहे.

प्रभू रामांची मोदींना मदत२२ जानेवारी रोजी अयोध्येत प्राणप्रतिष्ठा केल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रभू रामचंद्र पावले,  असे असंख्य समर्थकांना ठामपणे वाटते आहे. प्राणप्रतिष्ठेच्या आधी असे चित्र होते की भाजप आणि इंडिया आघाडी यांच्यात येत्या लोकसभा निवडणुकीत तुंबळ युद्ध होईल. एनडीएला लोकसभेत ३०० च्या आसपास जागा राखता आल्या तरी पुष्कळ असे भाष्यकर्ते म्हणत होते. परंतु, नंतर चित्र पालटले. आघाडीतले एकामागून एक भागीदार सोडून जाऊ लागले. इंडिया आघाडीला पहिला धक्का बिहारने दिला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आघाडीतून बाहेर पडून नाट्यपूर्णरीत्या पुन्हा भाजपची छत्रछाया पांघरली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे ठरवले. या सगळ्या गोंधळाला त्यांनी राहुल गांधी यांना जबाबदार धरले. 

पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मते काँग्रेसला किंवा तृणमूल काँग्रेसला मिळणार नाहीत हे काँग्रेसच्या धोरणकर्त्यांच्या लक्षात आल्यानंतरही घटनांनी अशा प्रकारे वळण घेतले. मुस्लीम मते आधीच तृणमूल काँग्रेसकडे गेलेली आहेत. गोवा, गुजरात, हरयाणा, आणि इतर राज्यांतील जागांच्या बदल्यात दिल्लीतील एक जागा देण्याची तयारी आम आदमी पक्ष दाखवत असला तरीही पंजाबमध्ये तो आघाडीतून बाहेर पडला आहे. झारखंडमध्येसुद्धा झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राजद हे एकत्र राहणे अत्यंत कठीण आहे. कारण या कळपात मुख्यमंत्री चंपाई सोरेन मुळीच बसत नाहीत. माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन पक्षावर पुन्हा पकड प्रस्थापित करतील किंवा कसे याबाबत कोणालाच खात्री नाही. 

ममता यांचा पुढाकारतृणमूल काँग्रेस वगळता भाजप किंवा काँग्रेससह कोणत्याही राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्षाने महिलांना लोकसभा - राज्यसभेमध्ये ३३ टक्क्यांपेक्षा जास्त जागा देऊ केलेल्या नाहीत. गतवर्षी महिला आरक्षण  विधेयक संमत करून घेतल्याचे श्रेय भाजप  घेईल. परंतु, ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने याबाबतीत आघाडी घेतली आहे. तृणमूल काँग्रेस जास्तीत जास्त संख्येने लोकसभा आणि राज्यसभेत महिलांना पाठवत आहे. काँग्रेस पक्षात सोनिया गांधी २५ वर्षांहून अधिक काळ शीर्षस्थानी आहेत. परंतु, भाजपप्रमाणेच या पक्षानेही राज्यसभा किंवा लोकसभेत फारच थोड्या महिलांना जागा दिली आहे. अर्थात ३३ टक्के आरक्षणाविषयीचा कायदा अमलात आल्यानंतर मात्र राजकीय पक्षांना तेवढे प्रतिनिधित्व देणे भागच पडेल.

 

टॅग्स :BJPभाजपाSocial Mediaसोशल मीडिया