शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

शिक्षणासाठी 'पोषण', पोषणासाठी 'शिक्षण' नासू नये.. बस्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2023 07:52 IST

शालेय पोषण आहारातील त्रुटी दूर करण्यासंदर्भात समितीच्या सदस्यांनी त्यांची मते मांडली; पण यासंदर्भात शिक्षक, पालकांचंही काही म्हणणं आहे.

- बालाजी देवर्जनकर, मुख्य उपसंपादक, लोकमत, नागपूर

शाळेत दिल्या जाणाऱ्या खिचडीला लागणाऱ्या जिन्नसापैकी एखादी जरी वस्तू महाग झाली तर पोषण आहारातून 'ती' कंत्राटदाराकडून गायब होते. बरं शिक्षक, बचतगटांनी खिशातून पैसे खर्च केले तर सहा-सहा महिने बिले मिळत नाहीत. तिकडून साहेबही मानगुटीवर. त्यांचा प्रश्न असतो 'खिचडी'चा दर्जा का घसरला? शालेय पोषण आहार समितीने तर आता पराठे थालीपिठाशिवाय भगर, उकडपेंडी, सांजा, खीर, नाचणीचे सत्त्व, इडली सांबार असे पदार्थ सुचवले आहेत.

समितीचे सदस्य ख्यातनाम शेफ विष्णू मनोहर यांनी ते चविष्ट पदार्थ करून दाखविले तरी अकुशल स्वयंपाकींना ते बनवता येतील का? समितीने म्हटल्यानुसार धान्याची भाजीची गुणवत्ता कोण तपासणार? शिक्षण मंत्रालयाकडे तक्रारी केल्या तर त्याची दखल घेतली जाईल का? सध्या पुरविला जात असलेला निकृष्ट माल कोणाच्या संमतीने शाळांना पाठविला जातो, याचे चिंतन कोण करणार, असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

काय शिकवलं, यापेक्षा आज शाळेत 'खिचडी' कशी होती, हा प्रश्न आधी विचारला जातो. थोडीही बिघडली तरी त्याचा तमाशा कसा होतो, हे शिक्षकांना चांगले ठाऊक आहे. सरकारचा सदस्य म्हणून विष्णू मनोहर यांनी मांडलेली संकल्पना चांगली आहे; पण योजनेची अंमलबजावणी होताना त्याची 'खिचडी' होऊन पुन्हा कंत्राटदारांचंच पोटभरण होणार का, हा प्रश्नही आहेच. शालेय पोषण आहार योजना चांगलीच आहे. ती आवश्यकही आहे, याबाबत कुणाचेच दुमत असण्याचे कारण नाही, असे शिक्षकच म्हणताहेत.

विद्यार्थ्यांच्या दृष्टीने 'शिक्षण' आणि 'पोषण' या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. मात्र, शिक्षणासाठी पोषण आणि पोषणासाठी मुलांचं शिक्षण नासू नये, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. 'आम्हाला शिकवू द्या' असं शिक्षक वारंवार ओरडून सांगत असतात. शाळेत दररोज शिजविला जाणारा पोषण आहार, हे अत्यंत जिकिरीचे आणि तेवढेच जबाबदारीचे काम आहे. पोषण आहारातून विषबाधा होणार नाही, त्यात खडे, अळ्या, किडे असणार नाहीत, पदार्थ कच्चे राहणार नाहीत, याची खूप काळजी पोषण आहार शिजविणाऱ्यांसह शिक्षकांनाही घ्यावी लागते. 

फाटक्या बारदाण्यातून महिना-दोन महिने पुरेल एवढे धान्य, कडधान्य शाळेला पुरविले जाते. ते साठविण्यासाठी शाळेत पुरेशी जागा व सुविधा उपलब्ध नसते. तुटके, तकलादू किचन शेड, अपुरे कर्मचारी, पाण्याचा अभाव, पूर्णवेळ उपलब्ध नसणारी वीज, वीज बिल भरण्यासाठी शाळांकडे नसणारे अनुदान, एवढे करूनही अग्रीम रक्कम मिळत नाही, या बाबी समितीला थोडेच माहीत आहेत. शिवाय पोषण आहार शिजविल्याचा दरदिवशी ठेवावा लागणारा हिशेब, दररोज ऑनलाइन भरावी लागणारी माहिती, मेंटेन करावा लागणारा स्टॉक, तसेच संपूर्ण रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी मुख्याध्यापक किंवा शिक्षकांची आहे. पोषण आहार शिजविण्याचे काम स्वयंपाकी किंवा बचतगटाकडे सोपविले असे म्हणून शिक्षक, मुख्याध्यापकांना हात वर करता येत नाहीत. 

पोषण आहार शिजविणाऱ्या स्वयंपाकी आणि मदतनिसांना मिळणारा महिना २५०० रुपये पगार पुरेसा नाही. सकाळी शाळेची स्वच्छता करून पोषण आहार शिजवणे आणि दुपारी त्याचे वाटप करण्याचे काम करावे लागते. यातच अर्धा दिवस जातो. स्वयंपाकाची आणि मुलांची भांडी धुवायची, उष्टे काढायचे, मुलांनी न धुतलेली आणि धुतलेलीही भांडी परत एकदा स्वच्छ करून दुसऱ्या दिवसासाठी व्यवस्थित तयार ठेवायची. मुलांनी जेवण केलेली जागा स्वच्छ करून घ्यायची. शिवाय पुढल्या दिवशी लागणारं धान्य स्वच्छ करून ठेवण्याचं काम दोन तासांत संपतं असं कागदावर भलेही म्हणता येईल; पण प्रत्यक्षात मात्र ते शक्य नाही.

अन्न शिजविण्यासाठी लागणारा गॅस तरी सर्व शाळांमध्ये आहे का? गॅस संपला तर राखीव सिलिंडर किती शाळांमध्ये आहेत? जिथे गॅस नसेल तिथे लाकूडफाटा कुठून आणणार? आणला तर तो शाळेत कुठे साठवून ठेवणार? अशा अनेक समस्या तुमच्या-आमच्या खिसगणतीतही नाहीत.

- या विषयावरील चर्चा येथे थांबविण्यात येत आहे.

 

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा