शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

व्यापाऱ्यांच्या संयमाचा कडेलोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 04:04 IST

जळगाव महापालिकेच्या मालकीच्या १८ व्यापारी संकुलांमधील २३८७ गाळ्यांचे थकीत भाडे, नवीन करार, त्याचा दर आणि लिलावाची प्रक्रिया यासंदर्भात उच्च न्यायालयाने निकाल देऊनही त्याची अंमलबजावणी करणे राज्य शासन, महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांना अवघड होऊन बसले आहे.

- मिलिंद कुलकर्णीजळगाव महापालिकेच्या मालकीच्या १८ व्यापारी संकुलांमधील २३८७ गाळ्यांचे थकीत भाडे, नवीन करार, त्याचा दर आणि लिलावाची प्रक्रिया यासंदर्भात उच्च न्यायालयाने निकाल देऊनही त्याची अंमलबजावणी करणे राज्य शासन, महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांना अवघड होऊन बसले आहे. चार वर्षांपासून हा प्रश्न भिजत घोंगडे बनला असून व्यापाºयांच्या संयमाचा कडेलोट झाला आहे. कुटुंबीयांसह मूक मोर्चा काढून , बंद पुकारून व्यापाºयांनी आक्रोश व्यक्त केला आहे.नगरपालिकेसारखी स्थानिक स्वराज्य संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी या उदात्त हेतूने सुरेशदादा जैन यांच्यासारख्या द्रष्ट्या नेत्याने जळगाव शहरात तब्बल १८ व्यापारी संकुले उभारली. जळगावला व्यापाराची असलेली परंपरा या संकुलांमुळे वृद्धिंगत झाली. सोने, कपडे, धान्य आदी वस्तूंच्या खरेदीसाठी मराठवाडा, विदर्भ, नाशिकसह गुजरात, मध्य प्रदेशातून नागरिक जळगावला येत असत. मध्यंतरी जकात, आॅक्ट्रॉय, व्हॅट, एलबीटी अशा करपद्धतीतील बदलाचा फटका जळगावच्या पेठेलाही बसला.महापालिकेच्या काही व्यापारी संकुलांतील गाळेकराराची मुदत २०१२ मध्ये संपली. नवीन करार करताना कोणता दर असावा, किती वर्षांचा करार असावा याविषयी व्यापारी आणि महापालिका यांच्यात चर्चा सुरू असताना राजकारणाचा शिरकाव झाला आणि गाळेकराराचा विषय चिघळला. पक्षीय राजकारण इतक्या टोकाला गेले की, व्यापारी संकुल हे मुळात महसूल विभागाच्या जागेवर असल्याने महापालिकेला या व्यापाºयांकडून भाडेच वसूल करता येणार नाही, असा युक्तिवाद केला गेला. महसूल विभागाकडून महापालिकेला तशा आशयाची नोटीसदेखील बजावण्यात आली. सरकारदरबारी हा विषय पोहोचविण्यात आला. दरम्यान, जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात हा विषय गेला. मात्र सगळीकडे गाळेकरार हा व्यापारी आणि महापालिका यांच्यातील व्यवहार असल्याबद्दल शिक्कामोर्तब झाले. या निकालानंतर महापालिका प्रशासनाने थकबाकीपोटी पाचपट दंड, नवीन करारासाठी रेडीरेकनरचा दर आणि ई-लिलाव करण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाच्या निकालानंतर हा विषय मार्गी लागायला हवा, परंतु त्यात राज्य शासन, महापालिका प्रशासनाकडून वेळकाढूपणाची भूमिका स्वीकारली गेल्याने प्रश्न चिघळत आहे. २०१२ पासून गाळेभाडे मिळालेले नाही, नवीन करार न झाल्याने मोठी रक्कम अडकून पडली आहे. ही रक्कम मिळाल्यास महापालिकेवर हुडकोचे असलेले कर्ज परतफेड करता येईल, अशी महापालिका पदाधिकाºयांची भूमिका आहे. महापालिकेने पाचपट दंडाची दिलेली नोटीस अवाजवी असल्याचे गाळेधारकांचे म्हणणे आहे, न्यायालयाच्या निकालानंतर याविषयी कोणती भूमिका घ्यावी, याविषयी चार महिन्यांपासून राज्य शासनाच्या नगरविकास, विधी व न्याय आणि अर्थ या विभागात खल सुरू आहे. केवळ जळगावसाठी निर्णय घेता येणार नाही, तर कोल्हापूर, नाशिकसह अनेक पालिकांमध्ये असा प्रश्न आहे. त्यामुळे धोरणात्मक निर्णयाविषयी सरकारचा ‘अभ्यास’ अद्याप सुरू आहे. भाजपाच्या खासदार, आमदार आणि नगरसेवकांची मात्र गोची झाली आहे. एकीकडे आपलेच सरकार तर दुसरीकडे मतदार, भूमिका कोणती घ्यावी हा पेच आहे. मोर्चात सहभागी होऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.