शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मॉरिशस... 'थोरल्या' भावाकडून 'धाकट्या' भावाचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 12:22 IST

दीडशे वर्षांपूर्वी फ्रेंचांनी ते ताब्यात घेतले व आपल्या ये-जा करणाऱ्या जहाजांच्या पडावासाठी याचा उपयोग सुरू केला

योगेश्वर गंधे ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ व मॉरिशसचे सांस्कृतिक सल्लागार

१२ मार्च १९६८  या दिवशी दीडशे वर्षे असलेल्या फ्रेंच वसाहतीची एका बेट मार्च समूहात अखेर झाली आणि क्रूर, यातनामय संघर्ष व अत्याचारातून सुटका होऊन 'मॉरिशस' (La-mores) हा अत्यंत छोटा देश स्वतंत्रपणे अस्तित्वात आला. भारतीय लोक संक्षिप्तपणे याला 'मोरस' असं म्हणतात. घनदाट जंगल व चारही बाजूला समुद्राच्या पाण्याने वेढलेलं हे बेट पूर्णतः दुर्लक्षित होतं. दीडशे वर्षांपूर्वी फ्रेंचांनी ते ताब्यात घेतले व आपल्या ये-जा करणाऱ्या जहाजांच्या पडावासाठी याचा उपयोग सुरू केला. भयानक जंगलं, हिंस्त्र श्वापदं या पलिकडे तिथे काही नव्हतं. हे बेट साफ करून आपली छोटी वसाहत निर्माण करण्यासाठी त्यांनी भारतातून समुद्रकिनाऱ्याजवळच्या गावातून वेठबिगार म्हणून माणसे पकडून आणली. मग त्यात कुणी मराठी, कुणी गुजराथी, कुणी तेलगू तर कुणी बिहारी भय्या! या सगळ्या गरिबांना तिथे जाऊन अतोनात हाल-अपेष्टा, उपासमार, मृत्यू सारे सहन करावे लागले. पण घरासाठी, कुटुंबासाठी पैसे मिळतील, भूक भागेल या आशेवर ते सारे झगडत राहिले.

आडनावांची नोंद मुद्दामहून गाळून टाकल्याने संघटन व जात संघर्ष झाला नाही. पण, एकमेकांना धरून रहात, सांभाळत सुटकेसाठी, मानवी हक्कांच्या स्वातंत्र्याकरिता मोठा झगडा झेलावा लागला. त्यात तीन पिढ्या गेल्या. काही उपासमारीने, काही हिंस्त्र पशुंनी खाल्ल्याने तर बाकी विरोध केला म्हणून फ्रेंचांनी मारून टाकल्याने... आणि काही निर्जन बेटावर बंदी म्हणून ठेवल्याने खायला अन्न नाही म्हणून एकमेकांना खाऊन संपल्या !

मी पस्तीस वर्षापूर्वी तेथील सरकारच्या निमंत्रणावरून जेव्हा या बेटावर पहिल्यांदा पाऊल ठेवले तेव्हा हा पृथ्वीवरील अद्भूत स्वर्ग मना-डोळ्यांत बसला तो कायमचाच, पण तिथे जाण्यापूर्वी असा देश आहे हे मलाच काय पण भारतातील अनेक जाणत्या लोकांनाही माहीत नव्हते. शोधावे लागायचे. जगाच्या नकाशात अगदी 'टिंबा' एवढं त्याचं अस्तित्व. कुणी भारतीय पंतप्रधानही या बेटावर कधी फिरकला नाही. महात्मा गांधी जवळच्या आफ्रिकेत गेले, तिथे वर्णव्यवस्थेविरुद्ध लढले पण मॉरिशसच्या वेठबिगारी गरिबांसाठी लढल्याचे आढळले नाही. १९९० च्या दशकांत संपूर्ण जगात गोर्बाचेव्ह प्रणित ग्लासनोस्त व पेरिस्तोर्हकाचे लोण पसरून आर्थिक स्वातंत्र्य वाढले. त्याचा परिणाम मॉरिशस थोडाफार सक्षम व्हायला मदत झाली. तत्कालीन अर्थमंत्री दिवंगत मनमोहन सिंग यांच्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणामुळे भारताच्या या धाकट्या भावाला अधिक बळ मिळाले पण उरलं तर देऊ या सापत्न वृत्तीने धाकट्या भावाला अवलंबित्व व अटींवर रहावं लागलं. परंतु गेल्या चौदा वर्षात नरेंद्र मोदी सरकारने मुक्त हस्ते या धाकट्या भावाला तिथला 'आपला माणूस' म्हणून सर्व स्तरावर मोठी मदत तर केली. मॉरिशस अवघ्या १३ लाख लोकसंख्येचा. त्यातील सत्तर टक्के आपलेच भाऊबंद भारतीय विविध भाषी. म्हणजे भारताच्या दृष्टीने धाकटे भाऊ-बहिणीच! एकेकाळी केवळ नवीन लग्न झालेल्यांसाठी 'मधुचंद्रा' करिताचं जवळचं, थोडं स्वस्त व स्वर्ग असलेलं हे पर्यटन स्थळ. एकेकाळी केवळ बीट, ऊस व इतर फळांपासून मोरस साखर तयार करणारा हा देश. आता वाईन उद्योग, जहाज बांधणी, माहिती तंत्रज्ञान, गुंतवणूक, हॉटेल सेवा, बँकांचे तंत्र अशा अनेक उद्योग-व्यवसायात हा देश पुढे आहे. मोठ्या भावाने (भारताने) धाकट्या भावाला (मॉरिशस) गेल्या दहा वर्षात प्रचंड मदत केली आहे. एका कुटुंबात धाकटे नेहमी दुर्लक्षित रहातात. कारण मोठ्या दादांची दादागिरी असते. पण भारत - मॉरिशसमध्ये संबंध हे प्रोत्साहित करणारे व सहभाग देणारे असेच आहेत. माजी पंतप्रधान प्रवींद जगन्नाथ व विद्यमान पंतप्रधान नवीनचंद्र रामुगुलाम हे भारत व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सबका साथ सबका विकास' या सूत्रावर चालणारे आहेत. शिवाय भारताची सत्ता सध्या तरी बिहारी बाबूंच्या पाठिंब्यावर, पूर्ण सहकार्यावर अवलंबून आहे. पंतप्रधान म्हणजे मोठे भाऊ, नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्य दिनानिमित्त मॉरिशस म्हणजे धाकट्या भावाच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायला, सहयोग वाढवायला आणि भारतीय भिन्न संस्कृतीचं स्थान मजबूत करायला मॉरिशसला येत आहेत. याचे दूरगामी परिणाम हे केवळ मोठा व धाकटा भाऊ असे नाहीत. तर या दोघांच्या संबंधांमुळे अनेक छोटे भारतीय वंशाचे देश मोठ्या भावाजवळ येण्याचे आहेत. मॉरिशस हा धाकटा भाऊ मोठ्याला आणखी मोठा करण्याचा महत्त्वाचा दुवा आहे. ही कौतुकाची थाप भविष्याचा पडघम आहे. यासाठी मोरसच्या भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.