शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

गणित, भौतिकशास्त्र... आणि उद्याचे इंजिनिअर्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 4:41 AM

सारेगमच्या पूर्व ज्ञानाशिवाय जसा संगीताचा अभ्यास अशक्य आहे, तसेच गणित व भौतिकशास्त्राच्या पूर्व ज्ञानाशिवाय अभियांत्रिकीचा अभ्यास अशक्य आहे.

डॉ. सुनील कुटे, अधिष्ठाता, क. का. वाघ अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन संस्था, नाशिक

व्यावसायिक महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी घेऊन बाहेर पडलेल्या तरुण अभियंत्यांना रोजच्या जीवनात लागणाऱ्या साध्या साध्या व्यावहारिक कौशल्यांची जाण नसते. त्यांचे सामान्य ज्ञान सुमार असते. ही अवस्था बदलण्यासाठी अभ्यासक्रमात संवाद कौशल्ये, ताणतणाव व्यवस्थापन, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र इ. विषयांचा अंतर्भाव केला तर  ते पढीक पंडित न बनता बहुश्रूत अभियंते बनतील या हेतूने अभियांत्रिकी अभ्यासक्रमात ‘लिबरल आर्टस्’ या नावाने वरील विविध विषय समाविष्ट करण्याला प्रोत्साहन देण्यात येत आहे हे स्वागतार्ह ! याचाच पुढचा भाग म्हणजे या विद्यार्थ्यांना आंतरशाखीय ज्ञान मिळावे, त्यांचे अंतिम वर्षाचे प्रकल्पसुद्धा आंतरशाखीय असावेत, याला प्रोत्साहन देण्यात येत आहे. आपल्या ज्ञानाचा इतर शाखांचा वापर करून समाजाला उपयोग व्हावा हे स्तुत्यच आहे. विद्यार्थ्यांना विषय निवडण्याचे स्वातंत्र्य असावे हा यामागचा मूळ हेतू आणि तो योग्यच आहे. बदलत्या काळात, नवनवीन विषय समोर येत असताना असे विषय निवडीचे स्वातंत्र्य आवश्यक आहे.

मात्र, हे करताना मूलभूत विषयांकडे दुर्लक्ष होण्याचा धोका संभवतो. अभियांत्रिकी  हा व्यावसायिक अभ्यासक्रम आहे. यातील संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारात उतरतात. धरणे, इमारती, मोठमोठे पूल यांचे संकल्पन हे गणिती समीकरणांवर आधारित असते. ज्या संकल्पना डोळ्यांना दिसू शकत नाहीत, त्या गणितीय प्रमेय व संकल्पचित्रांच्या माध्यमातून व्यक्त करता येतात. संगणक अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी तसेच स्थापत्य, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल यासारख्या मूलभूत अभियांत्रिकी शाखांचा पाया हाच मुळी गणित व भौतिकशास्त्र यावर उभा आहे. केमिकल, पॉलीमर, पेट्रोकेमिकल या शाखा रसायनशास्त्रच्या पायावर उभ्या आहेत. या विषयात प्रवेश घ्यावयाचा असेल तर अकरावी व बारावीत त्यांच्यासाठी लागणाऱ्या गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या पायाभूत विषयांचे मूलभूत ज्ञान आवश्यक आहे. म्हणूनच आजही आय.आय.टी.ला प्रवेश घेताना असो वा देशातील कोणत्याही अभियांत्रिकी ज्ञानशाखेत प्रवेश घेताना या पायाभूत विषयांचे मूलभूत ज्ञान बारावीच्या पातळीवर जोखले जाते.  हे विषय काढून टाकणे योग्य ठरणार नाही. आय.आय.टी.ला प्रवेश घेताना बारावीला जर पायाभूत विषयांचे ज्ञान प्रवेश परीक्षेसाठी आवश्यक असेल, तर तोच न्याय देशातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश परीक्षांना लागू करणे दर्जा टिकविण्यासाठी आवश्यक ठरेल.

देशातील व्यावसायिक शिक्षणाचा दर्जा व हल्ली उत्तीर्ण होणाऱ्या अभियंत्यांचा दर्जा खालावण्याची अनेक कारणे आहेत.  प्रवेश परीक्षांसाठी शून्यपेक्षा जास्त म्हणजे केवळ एक गुण जरी मिळाला तरी प्रवेश देणे, बारावीला ४०-४५ टक्के गुण मिळाले तरी अभियांत्रिकी प्रवेशाला पात्र ठरणे, ‘स्कॉलर’ नसलेल्या विद्यार्थ्यांना ‘स्कॉलरशिप’ जाहीर करणे यासारख्या अनेक कारणांनी अभियांत्रिकी शिक्षणाच्या गुणवत्तेचे व दर्जाचे बुरुज ढासळायला वेळ लागणार नाही.

प्रत्येक अभ्यासक्रमासाठी पूर्व तयारीच्या विषयांचे ज्ञान आवश्यक असते. सा-रे-ग-म-च्या पूर्व ज्ञानाशिवाय जसा रागदारी व संगीताचा अभ्यास अशक्य आहे, तसेच गणित व भौतिकशास्त्राच्या पूर्व ज्ञानाशिवाय अभियांत्रिकीचा अभ्यास अशक्य आहे. एक तर आधीच शालेय शिक्षणात या विषयांचा पाया अनेक ठिकाणी ठिसूळ असतो.  बारावीनंतरच्या पूर्वपरीक्षांमधूनही हे विषय वगळल्याने तो कच्चा राहिला तर निर्माण होणारे अभियंते कागदावरचे अभियंते राहतील. प्रत्यक्षात उद्योगधंदे व नोकरीत ते काहीच कामाचे असणार नाहीत.त्यापेक्षा त्या त्या वेळेलाच आवश्यक गोष्टी करणे म्हणजे खरी सुलभता. यातून पुन्हा खासगी क्लासेसवाल्यांचा धंदा उभारी घेईल हे वेगळेच. सुमार दर्जाच्या अशक्त अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या जागा भरण्यासाठी मदत होईल अशा निर्णयांपेक्षा चांगली महाविद्यालये अधिक सशक्त करायची असतील तर पाया भक्कम करणारे मूलभूत ज्ञान आणि दर्जा व गुणवत्ता यांच्याशी तडजोड होणार नाही असे निर्णय घेणेच उपयुक्त ठरेल.