शहरं
Join us  
Trending Stories
1
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
2
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
3
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
4
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण
5
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
6
होय माझा आत्मा भटकतोय! शरद पवारांचा शिरुरमधून नरेंद्र मोदींवर पलटवार, 'मी लाचार होणार नाही'
7
मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला, लोकसभा निवडणुकीदररम्यान आपला मोठा धक्का  
8
रणबीर-आलियाच्या फुटबॉल टीमची Finals मध्ये एन्ट्री, स्टेडियममध्ये केलं सेलिब्रेशन
9
'भटकती आत्मा' म्हणत मोदींचा हल्लाबोल; अजित पवार म्हणाले, पुढच्या सभेत मी...
10
'10 वर्षांपूर्वी देशात रिमोट कंट्रोलचे सरकार होते', लातूरमधून PM मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका
11
IPL 2024 LSG vs MI: बर्थ डे बॉय रोहित शर्माचा 'जबरा फॅन', हिटमॅनच्या कृतीनं जिंकली मनं!
12
Rohit Sharma Record, Mumbai Indians IPL 2024: 'बर्थडे बॉय' रोहितला आजच्या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी, हव्यात फक्त 'इतक्या' धावा
13
“राम मंदिराच्या लोकार्पणात गरीब अन् शेतकरी कुठे दिसले का?”; राहुल गांधींचा थेट सवाल
14
Guru Gochar 2024: बारा वर्षांनी वृषभ राशीत होणार गुरुबदल; वर्षभर अनेक शुभ-अशुभ घटना घडणार ; वाचा!
15
‘एकत्र येऊन मतांचा जिहाद करा’, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या पुतणीचा व्हिडीओ व्हायरल  
16
देवेंद्र यादव दिल्ली काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली नियुक्ती
17
'युपीत असते, तर उलटं टांगून...', सीएम योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "जेव्हा सकाळी उठतील तेव्हा जादुने महिलांच्या बँक अकाऊंटमध्ये 1 लाख येतील..."
19
T20 World Cup 2024: विश्वविजेत्या इंग्लंडच्या संघाची घोषणा! घातक गोलंदाजाची अखेर एन्ट्री
20
T20 World Cup संघ निवडीच्या हालचालींना वेग: जय शाह, अजित आगरकर यांच्यात बैठक

हौतात्म्याला धर्माचा रंग नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 4:11 AM

जम्मू आणि काश्मिरातील सुंजवा येथे जैश-ए-मोहम्मद या अतिरेक्यांच्या संघटनेने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या सात जवानांपैकी पाचजण मुस्लीम होते ही बाब मुसलमान समाजावर सातत्याने ते पाकिस्तानवाले आहेत असे म्हणणा-यांच्या डोळ्यात अंजन घालणारी असली तरी अशा शहादतीला धर्माचा रंग देणे योग्य नव्हे.

जम्मू आणि काश्मिरातील सुंजवा येथे जैश-ए-मोहम्मद या अतिरेक्यांच्या संघटनेने केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या सात जवानांपैकी पाचजण मुस्लीम होते ही बाब मुसलमान समाजावर सातत्याने ते पाकिस्तानवाले आहेत असे म्हणणा-यांच्या डोळ्यात अंजन घालणारी असली तरी अशा शहादतीला धर्माचा रंग देणे योग्य नव्हे. मोहम्मद अश्रफ मीर, हबिबुल्लाह कुरेशी, मनझूर अहमद देवा, मोहम्मद इकबाल आणि जुलम-मोईउद्दीन शेख अशी या हुतात्म्यांची नावे असून ते देशासाठी शहीद झाले आहेत. सैन्यास वा सैनिकांना धर्म नसतो, जात-पात-पंथ वा प्रांत नसतो. ते साºया देशाचे संरक्षक असतात. एका अर्थाने ते खरे भारतीय असतात असे म्हणूनच त्यांचा गौरव केला पाहिजे. लष्कराने तो तसा केलाही. परंतु जाती-धर्माचे राजकारण करणाºया पुढाºयांची व राजकारण्यांची वेगळी व सामान्यपणे आपापल्या जाती-धर्माचे समर्थन व संघटन करण्याची वृत्ती असते. त्यातून ज्या देशाच्या राजकारणास धर्माचे रंग चढविण्याची स्पर्धा सुरू झाली असते, त्यात तर अशा संधीची वाट सारेच पुढारी पहात असतात. ‘काश्मिरात शहादत पत्करणारे हे पाचही सैनिक मुसलमान होते ही गोष्ट मुसलमानांना पाकिस्तानी ठरविणाºयांनी लक्षात घेतली पाहिजे.’ इत्तेहादूल मुसलमीन या पक्षाचे अध्यक्ष व खासदार बॅ. असरुद्दीन औवेसी यांचे विधान त्याचमुळे आक्षेपार्ह आहे. भारतीय लष्कराच्या नॉर्दन कमांडचे प्रमुख जनरल देवराज अम्बू यांनी नेमका हाच आक्षेप औवेसी यांच्यावर घेतला आहे. ‘लष्करात आम्ही सारे एक आहोत. आमच्यात धर्म-पंथाची दुही नाही.’ असे सुचवत तशी दुही पसरवण्याचे प्रयत्न दुसºयाही कुणी करू नयेत असेही त्यांनी यातून सुचविले आहे. वास्तविक जनरल अम्बू यांचे हे आवाहन लष्कराने वा पुढाºयांनीच नव्हे तर साºया देशानेच गंभीरपणे घ्यावे व त्यानुसार वागावे हेच अपेक्षित व योग्य आहे. मात्र जाती-धर्मातील वेगळेपणावर उठून राष्ट्रीय होण्यासाठी लागणारे मन ना राजकारण्यांकडे आहे ना पक्षांजवळ. पुढारी धर्मनिरपेक्षतेचा वा राष्ट्रीयतेचा उल्लेख जाहीर भाषणातच तेवढा करतात. प्रत्यक्षात त्यांचे वर्तन या दुहीला वाढ मिळवून देणारेच असते. जनरल अम्बू यांचा हा उपदेश त्याचमुळे एकट्या असरुद्दीन औवेसीनीच नाही, तर तो साºयाच पुढाºयांनी व नागरिकांनीही ध्यानात घ्यावा असा आहे. देशासाठी प्राणपणाने लढणारा सैनिक हिंदू वा मुसलान नसतो. तो शीख वा पारशीही नसतो. तो एक भारतीय असतो. आणि खºया भारतीयाचे लक्षणही तेच आहे. त्यामुळे देशासाठी हौतात्म्य पत्करणाºया जवानांची वा स्वातंत्र्यासाठी प्राण देणाºया देशभक्तांची धर्मवार गणती करणे हा त्यांचा अपमानच नव्हे तर तो देशाशी केलेला द्रोहही आहे. ज्या पाच भारतीय जवानांनी देशासाठी बलिदान केले ते साºया देशासाठीच अभिवादनाचे व अभिमानाचे विषय झालेले वीर आहेत. त्यांना धर्म वा जातीचा रंग चढविण्याचा प्रयत्न कमालीचा निंद्य व हीन आहे. आपल्या समाजातून जात व धर्म यांच्या वृथा अभिमानाचे मूळ जेव्हा नष्ट व्हायचे तेव्हा ते होईलच. मात्र त्याची सुरुवात जनरल अम्बू यांनी दाखविलेल्या राष्ट्रीय वृत्तीच्या स्वीकारातूनच व्हावी लागेल. आम्ही येथे देशासाठी लढत आहोत आणि तुम्ही तिकडे आम्हाला जाती-धर्माचे रंग लावून आमच्या कुटुंबीयांना असुरक्षित करीत आहात ही भावना उद्या लष्करातील जवानांमध्ये शिरली तर त्यामुळे देशाचे व समाजाचे अकल्याणच होईल. देशासाठी केवळ सैनिकांनीच लढायचे नसते. त्यांच्या पराक्रमामागे साºया देशानेच एकजूट होऊन उभे व्हायचे असते. तसे होण्यासाठी त्याला त्यांचे खासगी स्वार्थ जसे सोडावे लागतात तसेच जाती-धर्म-पंथ या विषयीच्या खासगी श्रद्धाही बाजूस साराव्या लागतात. माणूस म्हणून साºयांनी एकत्र येणे हाच राष्ट्रनिर्मितीचा खरा मार्ग आहे. जम्मू आणि काश्मिरात देशासाठी हौतात्म्य पत्करणाºया जवानांनी हा मार्ग दाखविला आहे आणि त्यावरून पुढे जाणे हे पुढारी, राजकारणी, समाजकारणी व आपल्या साºयांचेही कर्तव्य आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीर