शहरं
Join us  
Trending Stories
1
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
2
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
3
संकष्ट चतुर्थी 2025 : असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
4
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
5
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
6
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
7
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
8
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
9
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
10
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
11
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह
12
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
13
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
14
Corona Vaccine : लस घेतलेल्यांना कोरोनाला घाबरण्याची गरज नाही?, तज्ज्ञांनी स्पष्टच सांगितलं, दिला मोलाचा सल्ला
15
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
16
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
17
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
18
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
19
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
20
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम

विवाह हा ‘संस्कार’, तर लिव्ह इन रिलेशनशिप केवळ ‘व्यवहार’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 09:12 IST

उत्तरदायित्व नको असलेले संबंध ही लिव्ह इन रिलेशनशिपची पूर्वअटच होय! ज्यात फक्त दोनच व्यक्ती असतात, कुटुंब नसते; तो विचार ‘भारतीय’ नाहीच!

- विजया रहाटकरभाजप राष्ट्रीय सचिव,(माजी अध्यक्षा, महाराष्ट्र महिला आयोग)

देशभरात लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल भरपूर चर्चा सुरू आहे. त्यात व्यक्ती स्वातंत्र्याच्या अतिरेकापासून  संस्कृतीरक्षकांचा लिव्ह इन रिलेशनशिपला पूर्ण विरोध, अशी टोकाची मते व्यक्त होताना दिसतात. पण भारतीयांनी आधुनिक जीवनशैली अंगीकारताना त्यातले सांस्कृतिक अंग विसरलेच पाहिजे, असे  नव्हे. भारतीय विचाराच्या परिप्रेक्षात व्यक्ती स्वातंत्र्याला निश्चित महत्त्व आहे. यात व्यक्ती, मतं, धर्म, अभिव्यक्ती या सर्व स्वातंत्र्यांचा समावेश नक्की आहे. पण व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक मात्र  अजिबात अभिप्रेत नाही.  भारतीय विचाराच्या परिप्रेक्षात व्यक्ती स्वातंत्र्य आणि समष्टी विचार - विकास यात परस्पर सहयोग दिसतो. 

मुळात लिव्ह इन रिलेशनशिप ही संकल्पना पाश्चात्य देशांमध्ये तरी कशी आली आणि कशी रुजली?-  त्यामागे कुटुंबेतर व्यक्ती संस्थात्मक विचार अधिक आहे. जो विचार भारताचा नव्हे! कारण कुटुंब  हे तर भारतीय संस्कृतीचे खरे वैशिष्ट्य!  भारतीय संस्कृतीत जे चार आश्रम मानले गेले आहेत, त्यामधला मुख्य  गृहस्थाश्रम हा कुटुंब प्रणालीचा हा अपरिहार्य घटक आहे. कुटुंब प्रणालीत  उभय मान्य वैवाहिक संस्कार संबंधांना अधिक महत्त्व आहे, अधिकृतता आहे! यात “संस्कार” या शब्दाला अधिक महत्त्व आहे. कारण विवाह हा भारतीय विचारानुसार “संस्कार” आहे, तर लिव्ह इन रिलेशनशिप हा “व्यवहार” आहे!! इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी भारतीय विवाह संस्थेचा इतिहास लिहिताना “कुटुंब” घटकावर या अर्थाने विशेष भर दिला आहे. 

 केवळ पाश्चात्य संकल्पना म्हणून लिव्ह इन रिलेशनशिपवर आक्षेप घेण्याचे कारण नाही आणि तसा हेतूही नाही. पण ज्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये फक्त दोनच व्यक्तींचा विचार आहे आणि कुटुंब विचार हा त्यात अनुस्युत नाहीच, तो विचार भारतीय नाही.  स्त्री सुरक्षितता हा अत्यंत महत्त्वाचा घटक इथे दुय्यम स्थानावर जातो. कोणाही जीवाची, विशेषतः महिलेच्या जीवाची किंमत मोजून लिव्ह इन रिलेशनशिप हा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग असू शकत नाही! जर महिलाच सुरक्षित नसेल, तर लिव्ह इन रिलेशनशिप या संकल्पनेलाच छेद जातो. शिवाय स्त्री-पुरुषामधले नाते निर्माण करताना, टिकवताना आणि फुलवताना जी मूलभूत सपोर्ट सिस्टिम लागते, ती भारतीय कुटुंब संस्था विवाह या “संस्कार” संकल्पनेतून मिळवते. आज कुटुंबे विभक्त झाली आहेत. ही सपोर्ट सिस्टिमच डळमळीत झाली आहे. 

 अनेकदा कौटुंबिक उत्तरदायित्व नको म्हणूनच लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय निवडला जातो, ही कटू असली तरी वस्तुस्थिती आहे. उत्तरदायित्व नको असलेले संबंध ही लिव्ह इन रिलेशनशिपची पूर्वअट किंबहूना व्याख्या असता कामा नये. लिव्ह इन रिलेशनशिपमधूनच गेल्या काही वर्षांमध्ये महानगरांमध्ये ज्या अमानुष घटना घडल्या, त्यातला एक महत्त्वाचा धागा कुटुंबाच्या पाठिंब्याअभावी  निर्माण झालेल्या महिला असुरक्षिततेचा आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमधून महिला सुरक्षितता हा घटक दुर्लक्षित राहणे अक्षम्य आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाद्वारे लिव्ह इन रिलेशनशिपला आज अप्रत्यक्षपणे भले कायदेशीर मान्यता असेल, पण त्याबाबत स्वतंत्र कायदा झालेला नाही. तो जितका लवकर होईल, तितके चांगले!  पण तरीही कुटुंब जीवन हे भारतीय विचार प्रणालीतले परिपूर्ण जीवन आहे आणि ते आधुनिक काळातही भारतीय राज्यघटनेचा लेटर अँड स्पिरिटमध्ये अवलंब करतानाही मान्य केले पाहिजे, असे माझे ठाम मत आहे. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपmarriageलग्न