शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

कोवळ्या कळ्यांचा हा बाजार उठवला पाहिजे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 06:07 IST

कोवळ्या मुलींच्या स्वप्नांचा, भवितव्याचा कसलाही विचार न करता त्यांच्यावर अकाली बाईपण लादणं हे सतीप्रथेपेक्षाही क्रूर आहे.

- नंदकिशोर पाटील(संपादक, लोकमत, औरंगाबाद) 

गेल्या  आठवड्यात राज्यातील कोरोनामुक्त गावांतील शाळांची घंटा वाजली. अनेक दिवसांनंतर शाळेची दारं उघडताच  धरणाच्या कालव्यातून पाणी खळाळत जावं तशी मुलं शाळेत धावत गेली. जाणारच ती. कारण, कोरोनामुळं मुलांचा अक्षरश: कोंडमारा झाला होता. ऑनलाइन शिक्षणात गोडी  नव्हती. संसर्गाच्या भीतीपोटी घराबाहेर पडण्याची  मनाई. खेळणं, बागडणं तर सोडाच मित्रांशी असलेला साधा संवादही खुंटला होता. ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली सतत डोळ्यांसमोर मोबाइल धरून ही मुलं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही थकली होती. चोवीस तास पालकांच्या पहाऱ्यात राहण्याची मुलांना सवय नसते. मुलं शाळेत, शाळेच्या प्रांगणात रमतात. तिथे सवंगडी असतात, मित्र-मैत्रिणी भेटतात. गप्पागोष्टी रंगतात. रुसवेफुगवे होतात. तिथं मोकळा श्वास घेता येतो. साने गुरुजी म्हणायचे, शाळेत जाणारी मुलं ही देवाघरची फुलं असतात. संस्काराचं खतपाणी घालून त्यांना जोपासायचं असतं. आपल्या अवतीभवती बागडणारी मुलं आणि वाऱ्याच्या झुळकीने डोलणारी झाडं असावी लागतात. म्हणूनच, गुरुजींनी वर्गातील पटसंख्येबरोबरच वृक्षलागवडीला तितकंच महत्त्व दिलं होतं. मात्र, लॉकडाऊनच्या काळात शाळेच्या पटसंख्येला आणि एकूणच सामाजिक पर्यावरणाला नख लावण्याचे प्रकार समोर आले आहेत. लॉकडाऊननंतर शाळा उघडल्या खऱ्या, परंतु आठवी ते दहावीची पटसंख्या कमी झाल्याचं दिसलं.  विशेषतः मुलींची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याचं मराठवाड्यात दिसलं.  या मुली गेल्या कुठे? मुख्याध्यापकांनी घेतलेल्या शोधानंतर समोर आलेलं वास्तव  धक्कादायकच नव्हेतर, संतापजनक आहे. मराठवाड्यातील अनेक गावांत कोरोनापत्तीचं निमित्त साधून अनेक अल्पवयीन मुलींचे विवाह उरकून टाकण्यात आले. त्याविषयी ना कुठे तक्रार, ना कारवाई! काही बालविवाह रोखले गेले हे खरं, पण ती संख्या अगदीच नगण्य.  बालविवाह रोखण्यासाठी प्रत्येक गावात स्वतंत्र यंत्रणा असते. ग्रामसेवकच ‘बालविवाह प्रतिबंध अधिकारी’ असतो. शिवाय, बालसंरक्षण कायद्याअंतर्गत जिल्हा आणि गावस्तरावर समित्याही असतात. तरीही बालविवाह होतात.  एकतर असे विवाह लपूनछपून होतात. जातीधर्माच्या भिंतीही आड येतात. परिणामी, तक्रारीच येत नाहीत.  लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला. कुटुंबावर आर्थिक अरिष्ट आलं. मुलींच्या शिक्षणाचा खर्च आणि तिची जबाबदारी आता पेलवत नाही, अशी कारणं पुढे करून अल्पवयीन मुलींच्या गळ्यात अकाली डोरलं बांधलं गेलं. पण, ही कारणं साफ खोटी आहेत, असं सामाजिक कार्यकर्त्यांचं मत आहे. एकतर बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण आहे. गावात शाळा असेल तर इतर खर्चही येत नाही. आरक्षित वर्गातील मुलींसाठी पुढील शिक्षणासाठी सरकारच्या सोयी-सवलती असतात. त्यामुळे आर्थिक कारणांसाठी अल्पवयीन मुलींच्या लग्नाचं समर्थन होऊ शकत नाही. यामागे निश्चितच इतर प्रलोभनं असतात. पालकांच्या असहायतेचा फायदा घेऊन त्यांना अशा प्रकारचं बेकायदा कृत्य करण्यास भाग पाडणारे ‘मध्यस्थ’ असतात. साधारणपणे आपल्याकडे हुंडापद्धतीत वरपक्षाला हुंडा दिला जातो. (कायद्याने मनाई असली तरी!)  बालविवाहाच्या प्रकारात नेमकं उलटं घडतं. वरपक्षाकडची मंडळी मुलीच्या पालकांना पैसे देतात. हा  राजीखुशीचा मामला असला तरी तो एकप्रकारचा सौदाच! दिव्यांग, विदुर आणि वडिलांच्या वयाच्या पुरुषाबरोबर अल्पवयीन मुलींची लग्नं लावण्यात आल्याची प्रकरणं घडली आहेत. कोवळ्या वयातील या मुलींच्या स्वप्नांचा, भवितव्याचा कसलाही विचार न करता त्यांच्यावर अकाली बाईपण लादणं हा तर सतीप्रथेपेक्षाही भयंकर, अघोरी आणि क्रूर असा प्रकार आहे. कळ्यांचा हा बाजार वेळीच उठवला पाहिजे.  काल-परवापर्यंत शाळेत जाणारी, आईच्या मागे-पुढे करणारी, शेतातून दमून थकून आलेल्या बाबांना बिलगणारी ती चिमुरडी पोर एकाएकी परक्याचं धन कशी होते? तिच्या गळ्यात बाईपणाचं डोरलं बांधताना आई-वडिलांचं काळीज जराही हेलावत नाही? शेजारघरी एक अल्पवयीन पोर सून म्हणून आलेली असताना तिची खबरबात कोणालाच कशी लागत नाही?  - समाजाची ही डोळेझाकच बालविवाहाच्या पथ्यावर पडते  आहे.nandu.patil@lokmat.com

टॅग्स :marriageलग्नStudentविद्यार्थीMaharashtraमहाराष्ट्र