शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

मराठा राष्ट्रवादीचा ओबीसी चेहरा!

By अतुल कुलकर्णी | Updated: December 11, 2017 00:58 IST

मराठा पार्टी ही राष्ट्रवादीची प्रतिमा पुसण्यास जर मदत होत असेल तरी ती पवारांना हवीच आहे.

सरत्या आठवड्यात काँग्रेस, राष्ट्रवादी असा प्रवास करून भाजपात आलेल्या प्रसाद लाड यांना विधानसभेची लॉटरी लागली. नारायण राणे यांनी राजीनामा दिल्याने रिकाम्या झालेल्या जागेवर लाड निवडून आले. काँग्रेसने जनआक्रोश आंदोलन तर राष्ट्रवादीने यवतमाळ ते नागपूर हल्लाबोल यात्रा काढली. राज्यात दोन्ही काँग्रेस सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या असताना मुंबईत मात्र दोन्ही काँग्रेसची मिळून नऊ मतं भाजपाच्या पारड्यात पडली. त्यातली तीन मतं जगजाहीर होती. नीतेश राणे, कालिदास कोळंबकर हे दोन काँग्रेसी आमदार आणि राष्ट्रवादीचे रमेश कदम यांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट केल्या असल्या तरीही दोन्ही काँग्रेसच्या सहा मतांवर भाजपाने हल्लाबोल केला. त्यासाठी कोणाला कोणत्या देवाचा प्रसाद मिळाला याची चर्चा आता रंगली आहे. भाजपाची रणनीती यशस्वी ठरली अशा कौतुकाच्या बातम्याही सुरू झाल्या. पण प्रसाद वाटप चालू असताना कोणी हात पुढे केला तर त्यात नवल ते काय? देणा-यानेच साधनसुचिता ठेवली नसेल तर घेणा-याला तरी का दोष द्यायचा? आपल्या पक्षाचे नेते रोज दहा पंधरा किलोमीटरची पायपीट करत आंदोलन करत असताना काही आमदार सरकारी पक्षाच्या गळ्यात गळे घालतात याची चिंता मात्र आता दोन्ही काँग्रेसने करण्याची वेळ आली आहे.हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादीला राज्यभर नेता येईल असा चेहरा धनंजय मुंडेच्या रूपाने मिळाला आहे. या हल्लाबोल यात्रेत जो प्रतिसाद धनंजय मुंडेंना मिळतोय तेवढा राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांना मिळताना दिसलेला नाही. विदर्भात एका शेतकºयाने आपल्या उभ्या कापसावर ट्रॅक्टर चालवा आणि शेत मोकळं करा अशी भावनिक सादही धनंजय मुंडेंना सुप्रिया सुळेंच्या समोर घातली. त्याचे कारण सरळ आहे. मुंडेंची पाटी कोरी आहे. त्यांच्या आक्रमकपणामुळे ते काहीतरी करून दाखवतील असा विश्वास लोकांमध्ये निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. आधीचे नेते ‘टेस्टेड’ आहेत. त्यांच्या मर्यादा आणि क्षमता पंधरा वर्षात जनतेने पाहिल्या आहेत. म्हणूनच या हल्लाबोल यात्रेत म्हणावा तसा प्रतिसाद आपल्याला मिळत नाही हे लक्षात येताच काही नेत्यांवर पक्षाचा ध्वज खांद्यावर घेऊन तीन चार किलोमीटरचा प्रवास केल्याच्या बातम्या देण्याची वेळ आली.आर.आर. पाटील पक्षाचा चेहरा असतानाही त्यांना त्यावेळी पक्षाने कधी तसे प्रोजेक्ट केले नव्हते. त्याचे भले बुरे परिणाम पक्षाला भोगावेही लागले. आता लोक धनंजय मुंडेंना पहायला, ऐकायला येत आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांच्या कामाचे मूल्यमापन वेगळ्या विश्लेषणाचा भाग असला तरी आज लोक त्यांच्यात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. काळाची ही बदललेली पावले ओळखूनच शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला बारामती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मुंडेंच्या प्रचारसभा ठेवाव्या लागल्या. हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने आणि विविध निवडणुकांसाठी सातत्याने मुंडे राज्यभर फिरत आहेत. अजित पवार, सुप्रिया सुळे त्यांना पुढे करत आहेत. यानिमित्ताने मराठा पार्टी ही प्रतिमा पुसण्यास मदत होत असेल तरी ती पवारांना हवीच आहे. शिवाय मुंडेंच्या रूपाने ओबीसींचा नेता उभा रहात असेल तर त्याचा फायदा ओळखण्याइतके पवार कुटुंबीय चाणाक्ष आहेत. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र