शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मराठा राष्ट्रवादीचा ओबीसी चेहरा!

By अतुल कुलकर्णी | Updated: December 11, 2017 00:58 IST

मराठा पार्टी ही राष्ट्रवादीची प्रतिमा पुसण्यास जर मदत होत असेल तरी ती पवारांना हवीच आहे.

सरत्या आठवड्यात काँग्रेस, राष्ट्रवादी असा प्रवास करून भाजपात आलेल्या प्रसाद लाड यांना विधानसभेची लॉटरी लागली. नारायण राणे यांनी राजीनामा दिल्याने रिकाम्या झालेल्या जागेवर लाड निवडून आले. काँग्रेसने जनआक्रोश आंदोलन तर राष्ट्रवादीने यवतमाळ ते नागपूर हल्लाबोल यात्रा काढली. राज्यात दोन्ही काँग्रेस सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या असताना मुंबईत मात्र दोन्ही काँग्रेसची मिळून नऊ मतं भाजपाच्या पारड्यात पडली. त्यातली तीन मतं जगजाहीर होती. नीतेश राणे, कालिदास कोळंबकर हे दोन काँग्रेसी आमदार आणि राष्ट्रवादीचे रमेश कदम यांनी त्यांच्या भूमिका स्पष्ट केल्या असल्या तरीही दोन्ही काँग्रेसच्या सहा मतांवर भाजपाने हल्लाबोल केला. त्यासाठी कोणाला कोणत्या देवाचा प्रसाद मिळाला याची चर्चा आता रंगली आहे. भाजपाची रणनीती यशस्वी ठरली अशा कौतुकाच्या बातम्याही सुरू झाल्या. पण प्रसाद वाटप चालू असताना कोणी हात पुढे केला तर त्यात नवल ते काय? देणा-यानेच साधनसुचिता ठेवली नसेल तर घेणा-याला तरी का दोष द्यायचा? आपल्या पक्षाचे नेते रोज दहा पंधरा किलोमीटरची पायपीट करत आंदोलन करत असताना काही आमदार सरकारी पक्षाच्या गळ्यात गळे घालतात याची चिंता मात्र आता दोन्ही काँग्रेसने करण्याची वेळ आली आहे.हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादीला राज्यभर नेता येईल असा चेहरा धनंजय मुंडेच्या रूपाने मिळाला आहे. या हल्लाबोल यात्रेत जो प्रतिसाद धनंजय मुंडेंना मिळतोय तेवढा राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांना मिळताना दिसलेला नाही. विदर्भात एका शेतकºयाने आपल्या उभ्या कापसावर ट्रॅक्टर चालवा आणि शेत मोकळं करा अशी भावनिक सादही धनंजय मुंडेंना सुप्रिया सुळेंच्या समोर घातली. त्याचे कारण सरळ आहे. मुंडेंची पाटी कोरी आहे. त्यांच्या आक्रमकपणामुळे ते काहीतरी करून दाखवतील असा विश्वास लोकांमध्ये निर्माण करण्यात ते यशस्वी झाले आहेत. आधीचे नेते ‘टेस्टेड’ आहेत. त्यांच्या मर्यादा आणि क्षमता पंधरा वर्षात जनतेने पाहिल्या आहेत. म्हणूनच या हल्लाबोल यात्रेत म्हणावा तसा प्रतिसाद आपल्याला मिळत नाही हे लक्षात येताच काही नेत्यांवर पक्षाचा ध्वज खांद्यावर घेऊन तीन चार किलोमीटरचा प्रवास केल्याच्या बातम्या देण्याची वेळ आली.आर.आर. पाटील पक्षाचा चेहरा असतानाही त्यांना त्यावेळी पक्षाने कधी तसे प्रोजेक्ट केले नव्हते. त्याचे भले बुरे परिणाम पक्षाला भोगावेही लागले. आता लोक धनंजय मुंडेंना पहायला, ऐकायला येत आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांच्या कामाचे मूल्यमापन वेगळ्या विश्लेषणाचा भाग असला तरी आज लोक त्यांच्यात काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. काळाची ही बदललेली पावले ओळखूनच शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याला बारामती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मुंडेंच्या प्रचारसभा ठेवाव्या लागल्या. हल्लाबोल यात्रेच्या निमित्ताने आणि विविध निवडणुकांसाठी सातत्याने मुंडे राज्यभर फिरत आहेत. अजित पवार, सुप्रिया सुळे त्यांना पुढे करत आहेत. यानिमित्ताने मराठा पार्टी ही प्रतिमा पुसण्यास मदत होत असेल तरी ती पवारांना हवीच आहे. शिवाय मुंडेंच्या रूपाने ओबीसींचा नेता उभा रहात असेल तर त्याचा फायदा ओळखण्याइतके पवार कुटुंबीय चाणाक्ष आहेत. 

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र