शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

मनाचिये गुंथी - गुह्याय नम:

By admin | Updated: May 31, 2017 00:20 IST

संवादाला दोघे लागतात. सांगावेसे वाटते. बोलावेसे वाटते. कोणी तरी ऐकून घ्यावे, समजून घ्यावे अशी मनोवस्था अनेकांची अनेकवेळा

संवादाला दोघे लागतात. सांगावेसे वाटते. बोलावेसे वाटते. कोणी तरी ऐकून घ्यावे, समजून घ्यावे अशी मनोवस्था अनेकांची अनेकवेळा होते. केव्हा केव्हा नेमके उलटही होते. डोळ्यासमोर कोणी नको. आपला एकांतच बरा. एकांतात मन भरून येते आणि वाणी मौन धारण करते. संवादाला चटावलेले मन आत्मसंवाद साधू इच्छिते. यात नैराश्याचा भाव नसतो. बहिर्मुखी झालेली ज्ञानेंद्रिये अंतर्मुखी होऊन ‘स्व’चा शोध घेतात. अनाकलनीय निगूढ असे भावतरंग निर्माण होतात. जिवाला वेगळीच अनुभूती येते. खरे-खोटे, बरे-वाईट, कडू-गोड सारेच संपलेले असते. डोळे भरून येतात. हुंदके आवरेनासे होतात. काळ क्षणभर थांबल्याचा भास होतो. समाधिवस्था वेगळी काय असते? आचार्यांच्या भाषेत ‘अद्वैत अबुध्पते तदा’ असे काही बाही होऊन जाते. ही अवस्था आणता येत नाही ती आपोआप यावी लागते. हे परमगुह्य आई समजावून सांगता येत नाही. शब्दातून व्यक्त करता येत नाही. त्याला तुम्ही आत्मानुभूती म्हणा किंवा आणखी काही ते अतीत आणि अव्यक्तच राहिलेले बरे. भगवंतानी गीतेच्या पंधराव्या अध्याय समाप्तीला ‘इति गुह्यतमं शास्त्र’ अर्जुना ! तुला हे गुह्य गुपितातील गुपित समजावतो आहे असे म्हटले आहे. गुह्य कोणालाही सांगता येत नाही. निष्पाप अर्जुन भगवंताचा भक्त आणि सखा आहे. म्हणून हा योग त्याला लाभला. सांगणारा नि ऐकणारा दोघेही तेवढेच महत्त्वाचे. ‘ये हृदयीचे ते हृदयी घातले’ अशी सहजावस्था असावी लागते. बारा स्कंधाचे श्रीमद्भागवत पुराण केवढी अलौकिक साहित्यकृती. शुकदेवांनी शौनकांना ‘इति च परमगुह्यम् सर्व सिद्धान्तसिद्धम्’ - शौनका ! अनेक शास्त्रांचा अभ्यास करून हे परमगुह्य तुला सांगितले. गुह्य समजावून सांगण्याचे प्रयत्न हजारो वर्षांपासून सुरू आहेत. ज्ञानदेवांची अवतारसमाप्ती झाली. महाराष्ट्रात ज्ञानदेवांची प्रतिमा मनामनात, घराघरांत पूजेला लागली. ‘प्रकट गुह्यची बोले’ हे आहेत ज्ञानदेवांच्या आरतीमधील शब्द. कोणताही आडपडदा न ठेवता त्यांनी गुह्य प्रकट केले. संन्याशाच्या पोराने भरभरून दिले. मनाला कोंभ फुटले. भक्तीचे बीज अंकुरले. वारकरी संप्रदायाची गुढी उभारली. मुक्ताई ज्ञानदेवांपेक्षा चार वर्षांनी लहान; पण त्या योगिनीचा अधिकार तेवढाच मोठा. चौदाशे वर्षाच्या चांगदेवाची आई होणे हे कर्तृत्व कोणत्या मापदंडाने मोजायचे? ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतली. मुक्ताई तर आकाशातच गुप्त झाली. तिच्या जाण्याने गुह्य अजूनपर्यंत कोणालाच आकळले नाही. नामदेवांना समाधीवर अभंगात लिहावे लागले. - डॉ. गोविंद काळे -