शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
2
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
VIDEO: कल्याण मारहाण प्रकरण: रिसेप्शनिस्ट मुलीनेच आधी महिलेला मारली होती कानशिलात
5
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
6
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
7
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
8
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
9
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
11
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
12
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
13
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
14
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
15
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी
16
फक्त अडकवायचे होते? 'या' हुशार AI एक्सपर्टने झकरबर्गच्या मेटाची चलाखी ओळखली; १०,४०० कोटींचा पगार नाकारला
17
'या' शेअरला लागलं २० टक्क्यांचं अपर सर्किट; दिग्गज गुंतवणूकदाराची मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
18
Video - IAS चं स्वप्न, डबल MA, अस्खलित इंग्रजी, MNCमध्ये नोकरी, आता चालवतात रिक्षा, कारण...
19
Ind vs Eng 4th Test India Playing XI : अंशुल कंबोजला पदार्पणाची संधी; करुण नायरचं करिअर संपलं?
20
चिनी नागरिकांसाठी भारताचे दरवाजे पुन्हा खुले! केंद्राने पाच वर्षानंतर पर्यटन व्हिसा बंदी मागे

मनाचिये गुंथी - गुह्याय नम:

By admin | Updated: May 31, 2017 00:20 IST

संवादाला दोघे लागतात. सांगावेसे वाटते. बोलावेसे वाटते. कोणी तरी ऐकून घ्यावे, समजून घ्यावे अशी मनोवस्था अनेकांची अनेकवेळा

संवादाला दोघे लागतात. सांगावेसे वाटते. बोलावेसे वाटते. कोणी तरी ऐकून घ्यावे, समजून घ्यावे अशी मनोवस्था अनेकांची अनेकवेळा होते. केव्हा केव्हा नेमके उलटही होते. डोळ्यासमोर कोणी नको. आपला एकांतच बरा. एकांतात मन भरून येते आणि वाणी मौन धारण करते. संवादाला चटावलेले मन आत्मसंवाद साधू इच्छिते. यात नैराश्याचा भाव नसतो. बहिर्मुखी झालेली ज्ञानेंद्रिये अंतर्मुखी होऊन ‘स्व’चा शोध घेतात. अनाकलनीय निगूढ असे भावतरंग निर्माण होतात. जिवाला वेगळीच अनुभूती येते. खरे-खोटे, बरे-वाईट, कडू-गोड सारेच संपलेले असते. डोळे भरून येतात. हुंदके आवरेनासे होतात. काळ क्षणभर थांबल्याचा भास होतो. समाधिवस्था वेगळी काय असते? आचार्यांच्या भाषेत ‘अद्वैत अबुध्पते तदा’ असे काही बाही होऊन जाते. ही अवस्था आणता येत नाही ती आपोआप यावी लागते. हे परमगुह्य आई समजावून सांगता येत नाही. शब्दातून व्यक्त करता येत नाही. त्याला तुम्ही आत्मानुभूती म्हणा किंवा आणखी काही ते अतीत आणि अव्यक्तच राहिलेले बरे. भगवंतानी गीतेच्या पंधराव्या अध्याय समाप्तीला ‘इति गुह्यतमं शास्त्र’ अर्जुना ! तुला हे गुह्य गुपितातील गुपित समजावतो आहे असे म्हटले आहे. गुह्य कोणालाही सांगता येत नाही. निष्पाप अर्जुन भगवंताचा भक्त आणि सखा आहे. म्हणून हा योग त्याला लाभला. सांगणारा नि ऐकणारा दोघेही तेवढेच महत्त्वाचे. ‘ये हृदयीचे ते हृदयी घातले’ अशी सहजावस्था असावी लागते. बारा स्कंधाचे श्रीमद्भागवत पुराण केवढी अलौकिक साहित्यकृती. शुकदेवांनी शौनकांना ‘इति च परमगुह्यम् सर्व सिद्धान्तसिद्धम्’ - शौनका ! अनेक शास्त्रांचा अभ्यास करून हे परमगुह्य तुला सांगितले. गुह्य समजावून सांगण्याचे प्रयत्न हजारो वर्षांपासून सुरू आहेत. ज्ञानदेवांची अवतारसमाप्ती झाली. महाराष्ट्रात ज्ञानदेवांची प्रतिमा मनामनात, घराघरांत पूजेला लागली. ‘प्रकट गुह्यची बोले’ हे आहेत ज्ञानदेवांच्या आरतीमधील शब्द. कोणताही आडपडदा न ठेवता त्यांनी गुह्य प्रकट केले. संन्याशाच्या पोराने भरभरून दिले. मनाला कोंभ फुटले. भक्तीचे बीज अंकुरले. वारकरी संप्रदायाची गुढी उभारली. मुक्ताई ज्ञानदेवांपेक्षा चार वर्षांनी लहान; पण त्या योगिनीचा अधिकार तेवढाच मोठा. चौदाशे वर्षाच्या चांगदेवाची आई होणे हे कर्तृत्व कोणत्या मापदंडाने मोजायचे? ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतली. मुक्ताई तर आकाशातच गुप्त झाली. तिच्या जाण्याने गुह्य अजूनपर्यंत कोणालाच आकळले नाही. नामदेवांना समाधीवर अभंगात लिहावे लागले. - डॉ. गोविंद काळे -