शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

महात्मा गांधी : जगाचा माणूस

By राजेंद्र दर्डा | Updated: October 2, 2019 06:06 IST

आज गांधीजींची १५० वी जयंती. मात्र, आजही संपूर्ण जग हे महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रभावीत आहे, हे निश्चित.

- राजेंद्र दर्डा(एडिटर इन चीफ,  लोकमत समूह) हो-चि-मिन्ह हे व्हिएतनाम देशातील सर्वांत मोठे शहर. लुनार नवीन वर्षाच्या निमित्ताने मोठे पुष्पप्रदर्शन भरले होते. त्यातच होता पुस्तकांचा मेळा. प्रदर्शनात फिरत असताना अचानक महात्मा गांधीजींच्या पुस्तकावर माझी नजर गेली. त्यांच्या भाषेत या पुस्तकाचे नाव होते- ‘जगाला एकच आशा - महात्मा गांधी’. आज गांधीजींची १५० वी जयंती. मात्र, आजही संपूर्ण जग हे महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रभावीत आहे, हे निश्चित.युनायटेड स्टेटस एक्स्प्रेस या नियतकालिकाने सन २००० मध्ये जगातील दहा हजार विचारवंतांना, नेत्यांना, वैज्ञानिकांना, नोबेल विजेत्यांना आणि कुलगुरूंना एक प्रश्न विचारला. ‘गेल्या १ हजार वर्षांत जगात झालेला सर्वात मोठा माणूस कोणता?’ त्यातल्या ८८८६ लोकांचे एकमुखी उत्तर, ‘महात्मा गांधी’ हे होते. 

आइन्स्टाईन म्हणाला, ‘विसाव्या शतकाने जगाला दोन शक्ती दिल्या. एक, अणुबॉम्ब आणि दुसरी महात्मा गांधी.’ विन्स्टन चर्चिल हे दक्षिण आफ्रिकेचे गव्हर्नर जनरल स्मटस यांना म्हणाले, ‘तुझ्या तुरुंगात असताना तू गांधीला मारले असते, तर आपले साम्राज्य जगावर आणखी काही शतके राहिले असते.’ गांधी या नि:शस्त्र माणसाने हे सामर्थ्य कुठून आणले? भारतीय माणूस शस्त्र घेऊन साम्राज्याशी लढू शकत नाही हे ओळखणाऱ्या त्या महात्म्याने भारतीयांची सहनशक्ती हेच त्यांचे सामर्थ्य आहे हे ओळखले व ही सहनशक्ती संघटित करून तिच्या हाती अहिंसा व सत्याग्रह ही परिणामकारक मानवी हत्यारे दिली. त्यांच्या नेतृत्वात संघटित झालेला भारत मग एकटाच स्वतंत्र झाला नाही, तर त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन निम्मे जगच स्वतंत्र झाले. ‘तुमच्या देशात गांधी जन्माला आले नसते तर मी अमेरिकेचा अध्यक्ष कधीच झालो नसतो’ असे बराक ओबामा त्याचमुळे म्हणाले. महात्मा गांधीजी साबरमती आश्रमातून दांडी यात्रेसाठी १९३० मध्ये बाहेर पडले. संपूर्ण स्वराज्य प्राप्त केल्याशिवाय साबरमती आश्रमात परतणार नाही, असा दृढनिश्चय त्यांनी केला. त्यानंतर १९३६ मध्ये गांधीजी वास्तव्यासाठी आले ते विदर्भातील सेवाग्राम या लहानशा खेड्यात. सेवाग्रामातील बापू कुटी हे स्वातंत्र्य आंदोलनाचे केंद्रबिंदू बनले होते. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाचा शंख याच सेवाग्राममधून फुंकला गेला. सेवाग्राम हा आश्रम नव्हता, तर गांधीजींच्या विधायक कार्यक्रमाची कर्मभूमी होती. गांधीजींच्या आश्रमात चरखा, झाडू आणि सामुदायिक प्रार्थना यांना मानाचे स्थान होते.स्वातंत्र्याच्या चळवळीत स्वत:ला झोकून द्यावे, ही त्या काळातील तरुणांची उत्स्फूर्त भावना होती. सत्याग्रहीचे वय किमान २० वर्षे असावे, अशी अट गांधीजींनी घातली होती. त्या वेळेस आमचे वडील बाबूजी जवाहरलालजी दर्डा यांचे वय १९ वर्षे होते. वैयक्तिक सत्याग्रहाच्या परवानगीसाठी त्यांनी थेट सेवाग्राम गाठले. गांधीजींकडून सत्याग्रहाची परवानगी मिळविली. बाबूजी ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध सक्रिय झाले, अटक झाली आणि पावणेदोन वर्षाची शिक्षा झाली. स्वातंत्र्यानंतरही गांधीजींच्या विचारांचा घरात इतका प्रभाव होता की, लहानपणी विजयभय्या आणि मी दोघांना दर रविवारी एकदा चरख्यावर सूतकताई अनिवार्य होते. आमचे वडील नेहमीच सांगायचे, ‘बापूंना भेटलो, तो आयुष्यातला सर्वांत रोमांचक क्षण होता’.आज जगभर गांधी विचार हा युद्धाचा पर्याय म्हणून सांगितला जातो. संयुक्त राष्ट्र संघटनेने गांधीजींचा जन्मदिन हा जागतिक अहिंसा दिन म्हणून स्वीकारला आहे. भगवान महावीर, बुद्ध, ख्रिस्त, कबीर आणि संत परंपरा यांनी जगाला दिलेला माणुसकीचा व मनुष्यधर्माचा संदेशच गांधींनी आयुष्यभर वाहून नेला.  
गांधींसारखी माणसे देहाने जातात. मात्र, त्यांचे विचार अजरामर राहतात. जोपर्यंत हे जग अस्तित्वात आहे, त्यातली माणुसकी जिवंत आहे आणि त्यातल्या मानवी सद्भावना सक्रिय आहेत तोपर्यंत हे जग गांधींना पाहू शकणार आहे.लंडनमध्ये शिकत असताना फिट्झरॉय स्क्वेअरवरील वायएमसीए हॉस्टेलमध्ये माझे वास्तव्य होते. तेथे  तळमजल्यावरील सभागृहाचे नावच महात्मा गांधी सभागृह होते. ते लंडनमधील भारतीयांचे सांस्कृतिक देवाणघेवाणीचे केंद्र बनले होते. भारतीय समुद्रकिनाºयापासून १४ हजार किमी दूर असलेल्या कॅरेबियन बेटावरील पोर्ट आॅफ स्पेन येथे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत प्रवास करण्याचा योग आला. १९९९ साली वाजपेयीजींनी तेथील ५ एकरातील महात्मा गांधी सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन केले होते. हे केंद्र आज भारतीय संस्कृती वृद्धिंगत करण्याचे काम करीत आहे. गांधींनी आपला विचार ग्रंथबद्ध केला नाही. ‘तो अजूनही प्रयोगावस्थेत आहे’, असे ते म्हणत राहिले.  अनुयायांनी फारच आग्रह धरला तेव्हा ते म्हणाले, ‘माझे जीवन हाच माझा संदेश आहे.’ गांधी हे कोणा एका धर्माचे, देशाचे, वर्गाचे वा पंथाचे नव्हे, तर ते साऱ्यांचे होते. असा महात्मा आपल्या भूमीत जन्माला आला आणि या भूमीचे व भूमिपुत्रांचे त्याने वयाच्या ७९ वर्षांपर्यंत नेतृत्व केले हे या देशाचे व आपल्या साºयांचे सौभाग्य आहे. गांधीजींच्या स्मृतींना आमचे लक्षावधी प्रणाम.  

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीIndiaभारत