शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

महात्मा गांधींनी अहिंसेलाच शस्त्र केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 05:43 IST

खरे तर गांधींच्या या १५० व्या जन्मशताब्दी निमित्ताने आजच्या परिस्थितीत गांधी आणि गांधी विचार आपल्या आयुष्याशी निगडित आहेत का? त्यांची खरी गरज किती आणि कशी आहे हा मूळ प्रश्न आहे.

- डॉ. राजन वेळूकर(माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठ गांधी विचारांचे अभ्यासक)खरे तर गांधींच्या या १५० व्या जन्मशताब्दी निमित्ताने आजच्या परिस्थितीत गांधी आणि गांधी विचार आपल्या आयुष्याशी निगडित आहेत का? त्यांची खरी गरज किती आणि कशी आहे हा मूळ प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी गांधींच्या चळवळी, त्यांची तत्त्वे, त्यांनी सांगितलेल्या अहिंसावादाचे महत्त्व, सत्याची कास या साऱ्याचा धांडोळा घेण्याची आवश्यकता आहे.असत्य, धाकशाही, हिंसेच्या आधारावरच वर्तमान परिस्थितीत जगाचा कारभार चालू आहे. त्यामुळे देश वाचविण्यासाठी गांधीजींच्या सत्य, अहिंसेचा विचार लोकमनामध्ये जागृत करणे गरजेचे आहे. देशावर येणाºया प्रत्येक समस्येला गांधी प्रयोगाने सोडविता येते़ आज जगासमोर, पाणी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरणीय समस्या अशा समस्या ठाण मांडून उभ्या आहेत. असे असताना केवळ हिंसा रोखण्यासाठी शासनाचा एवढा पैसा खर्च होत असेल तर आपल्याला ही हिंसा रोखण्यासाठी पर्यायाची आवश्यकता आहे. हा पर्याय शोधताना आपण आपल्याच इतिहासावर एक नजर टाकली असता आपल्या देशामध्ये मोहनदास करमचंद गांधी नावाच्या माणसानेच अहिंसेलाच शस्त्र बनविल्याचे लक्षात येईल आणि या शस्त्राच्या साहाय्यानेच त्यांनी समाजबांधणी व समाजपरिवर्तन घडवून आणले.आज आर्टिफिशिअल इंटेलिजिन्सवर संपूर्ण जग अभ्यास करत आहे. मात्र या क्षेत्रात काम करणारे नावाजलेले तंत्रज्ञ आज करुणा आणि प्रेम यांचा ताळमेळ यामध्ये कसा घालत येईल याचा अभ्यास करत आहेत. आज अमेरिकेत शालेय शिक्षण हे करुणा आणि प्रेम यावर आधारित अभ्यासक्रम तयार करण्याचा विचार केला जात आहे़ याचाच अर्थ गौतम बुद्ध, महावीर, गांधी यांनी अहिंसारुपी जी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला त्याचाच हा भाग आहे.आज लोकांना या गोष्टींची गरज लागते याचाच अर्थ गांधी आज किती संबंधित आणि महत्त्वपूर्ण आहे हे यातून सिद्ध होते. हाँगकाँगमधील आंदोलन हे कशाप्रकारे शांततेत पार पडले हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. गांधीजींनी इंग्रजी शिक्षणाला, पुरुषप्रधानतेला, हिंसेला आव्हान दिले होते. त्यांनी आधुनिकतावाद्यांना विरोध केला. त्यातून गांधींना परंपरावाद्यांच्या चौकटीत बसविण्याचा प्रयत्नही झाला. त्यांनी तंत्रज्ञानाला विरोध केला असे भासविण्याचा प्रयत्नही केला मात्र, गांधींनी परंपरा कोणत्या याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी तंत्रज्ञानाला विरोध नाही तर सर्वसामान्यांच्या रोजगाराला ज्यामुळे धक्का लागणार नाही, अशा तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला. आजच्या काळातील सरकारला जनतेमध्ये पोहोचण्याची आवश्यकता आहे. खरे तर प्रत्येक सरकारची गरज ती गरज असते मात्र खरे नेतृत्व गांधीजींच्या चळवळींतून समोर येते. त्यांनी देशभरातल्या तमाम जनसामान्यांना, त्यांची भाषा येत नसतानाही किंवा कोणतीही भाषणे न करता स्वातंत्र्यलढ्यात सामावून घेतलेहोते.गांधी हे घटना घडल्यानंतर काही करणाऱ्यांपैकी नव्हते, तर ते घटना घडूच नये म्हणून काळजी घेणाºयांपैकी होते. त्यांची अहिंसा हे काही तत्कालीन औषध नाही. ते चिरकालीन मूल्य आहे. ते आज असते, तर आजही ते सामाजिक ऐक्याचं बीजारोपण करत राहिले असते. या सगळ्यातून एकाच गोष्ट लक्षात येते की गांधी आजच्या काळाशी सुसंगत आहेत. त्यांचे विचार, आचार, तत्त्वे आजच्या परिस्थिती खºया अर्थाने आजच्या काळाची गरज आहेत.

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीIndiaभारत