शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

गांधी आणि लुथर किंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 04:41 IST

गांधींचा लढा स्वातंत्र्यासाठी तर मार्टिनचा निग्रोंच्या मुक्तीसाठी. १९४० मध्ये प्रथम मार्टिन लुथरने गांधींचे विचार वाचले.

- प्रा. बी. वाय. कुलकर्णी

महात्मा गांधी यांचा अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचा मार्ग सत्याग्रह. हा वारसा अत्यंत निष्ठापूर्वक स्वीकारणारी व्यक्ती म्हणजे अमेरिकेतील मार्टिन लुथर किंग (ज्युनिअर). या दोघांच्या कामात विलक्षण साम्य आहे. अमेरिकेतील बोस्टन येथील सामाजिक जबाबदारी संस्थेच्या संचालकांचे महात्मा गांधींवर ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यांनी गांधी आणि किंगबाबत लिहिले आहे की, गांधी यांच्या विचारांचा व अन्यायाला विरोध करण्याच्या मार्गाचा वारसा चालवला तो मार्टिन लुथरने. दोघेही उच्चशिक्षित होते. दोघांनीही सत्याग्रहाच्या मार्गाने राजकीय चळवळीस नेतृत्व दिले. औपचारिक स्वरूपात दोघांकडे राजकीय पद नव्हते; पण दोघांकडे निर्वाचित व्यक्तीपेक्षा जास्त राजकीय सत्ता नियंत्रण होते. अहिंसा दोघांचा मार्ग होता आणि विसंगती पाहा, दोघांचाही अंत गोळीने झाला.

गांधींचा लढा स्वातंत्र्यासाठी तर मार्टिनचा निग्रोंच्या मुक्तीसाठी. १९४० मध्ये प्रथम मार्टिन लुथरने गांधींचे विचार वाचले. त्या विचाराने ते इतके प्रभावित झाले की, त्याबद्दल मार्टिन लिहितात की, मी गांधींच्या विचारावर व कामावर असणारी जवळपास अर्धा डझन पुस्तके विकत घेतली. ही पुस्तके वाचल्यानंतर ते लिहितात की, त्यांची सत्ताप्राप्तीची ओढ क्रमाने कमी झाली. अहिंसेच्या मार्गावरचा विश्वास वाढला. सामाजिक सुधारणा शाश्वत पद्धतीने करण्याचा हा एकच मार्ग आहे, याच मार्गात ती क्षमता आहे, असे मार्टिनचे मत झाले.

सामान्य माणसाची जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेता हाच मार्ग लोकसहभाग मिळवून देऊ शकतो, अशी त्यांची खात्री झाली. केवळ बौद्धिक, वैचारिक कसरतीतून ग्रंथनिर्मिती होईल; पण व्यावहारिक पातळीवर सामाजिक सुधारणा होणार नाहीत. त्यासाठी गांधीमार्गच योग्य आहे, असे त्यांचे मत झाले. मार्टिनच्या मते, त्यांना येशू ख्रिस्तामध्ये प्रेरणा दिसली तर गांधींमध्ये मार्ग दिसला. एका निग्रोंच्या सभेत ते म्हणाले की, आपणास जेल भरावे लागतील, तरच समान हक्क मिळतील. गांधींचे शब्दच त्यांच्या मुखातून बाहेर पडले होते. महात्मा गांधींची हत्या झाली (१९४८), तेव्हा त्यांचे काम पूर्ण झाले नव्हते. मार्टिनची हत्या (१९६८) झाली तेव्हा निग्रोमुक्तीचा लढा अर्ध्यावरच होता. गांधींच्या हत्येनंतर जगभरातून तीन हजार संदेश आले होते. ज्ञात इतिहासातील नोंदीनुसार इतक्या मोठ्या संख्येने शोकसंदेश कुणाच्याच मृत्यूनंतर आले नाहीत. दोघेही अहिंसेचे पुजारी. मात्र दोघांच्याही मृत्यूनंतर प्रचंड दंगली उसळल्या. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र