शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

गांधी आणि लुथर किंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 04:41 IST

गांधींचा लढा स्वातंत्र्यासाठी तर मार्टिनचा निग्रोंच्या मुक्तीसाठी. १९४० मध्ये प्रथम मार्टिन लुथरने गांधींचे विचार वाचले.

- प्रा. बी. वाय. कुलकर्णी

महात्मा गांधी यांचा अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचा मार्ग सत्याग्रह. हा वारसा अत्यंत निष्ठापूर्वक स्वीकारणारी व्यक्ती म्हणजे अमेरिकेतील मार्टिन लुथर किंग (ज्युनिअर). या दोघांच्या कामात विलक्षण साम्य आहे. अमेरिकेतील बोस्टन येथील सामाजिक जबाबदारी संस्थेच्या संचालकांचे महात्मा गांधींवर ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यांनी गांधी आणि किंगबाबत लिहिले आहे की, गांधी यांच्या विचारांचा व अन्यायाला विरोध करण्याच्या मार्गाचा वारसा चालवला तो मार्टिन लुथरने. दोघेही उच्चशिक्षित होते. दोघांनीही सत्याग्रहाच्या मार्गाने राजकीय चळवळीस नेतृत्व दिले. औपचारिक स्वरूपात दोघांकडे राजकीय पद नव्हते; पण दोघांकडे निर्वाचित व्यक्तीपेक्षा जास्त राजकीय सत्ता नियंत्रण होते. अहिंसा दोघांचा मार्ग होता आणि विसंगती पाहा, दोघांचाही अंत गोळीने झाला.

गांधींचा लढा स्वातंत्र्यासाठी तर मार्टिनचा निग्रोंच्या मुक्तीसाठी. १९४० मध्ये प्रथम मार्टिन लुथरने गांधींचे विचार वाचले. त्या विचाराने ते इतके प्रभावित झाले की, त्याबद्दल मार्टिन लिहितात की, मी गांधींच्या विचारावर व कामावर असणारी जवळपास अर्धा डझन पुस्तके विकत घेतली. ही पुस्तके वाचल्यानंतर ते लिहितात की, त्यांची सत्ताप्राप्तीची ओढ क्रमाने कमी झाली. अहिंसेच्या मार्गावरचा विश्वास वाढला. सामाजिक सुधारणा शाश्वत पद्धतीने करण्याचा हा एकच मार्ग आहे, याच मार्गात ती क्षमता आहे, असे मार्टिनचे मत झाले.

सामान्य माणसाची जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेता हाच मार्ग लोकसहभाग मिळवून देऊ शकतो, अशी त्यांची खात्री झाली. केवळ बौद्धिक, वैचारिक कसरतीतून ग्रंथनिर्मिती होईल; पण व्यावहारिक पातळीवर सामाजिक सुधारणा होणार नाहीत. त्यासाठी गांधीमार्गच योग्य आहे, असे त्यांचे मत झाले. मार्टिनच्या मते, त्यांना येशू ख्रिस्तामध्ये प्रेरणा दिसली तर गांधींमध्ये मार्ग दिसला. एका निग्रोंच्या सभेत ते म्हणाले की, आपणास जेल भरावे लागतील, तरच समान हक्क मिळतील. गांधींचे शब्दच त्यांच्या मुखातून बाहेर पडले होते. महात्मा गांधींची हत्या झाली (१९४८), तेव्हा त्यांचे काम पूर्ण झाले नव्हते. मार्टिनची हत्या (१९६८) झाली तेव्हा निग्रोमुक्तीचा लढा अर्ध्यावरच होता. गांधींच्या हत्येनंतर जगभरातून तीन हजार संदेश आले होते. ज्ञात इतिहासातील नोंदीनुसार इतक्या मोठ्या संख्येने शोकसंदेश कुणाच्याच मृत्यूनंतर आले नाहीत. दोघेही अहिंसेचे पुजारी. मात्र दोघांच्याही मृत्यूनंतर प्रचंड दंगली उसळल्या. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र