शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

गांधी आणि लुथर किंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 04:41 IST

गांधींचा लढा स्वातंत्र्यासाठी तर मार्टिनचा निग्रोंच्या मुक्तीसाठी. १९४० मध्ये प्रथम मार्टिन लुथरने गांधींचे विचार वाचले.

- प्रा. बी. वाय. कुलकर्णी

महात्मा गांधी यांचा अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचा मार्ग सत्याग्रह. हा वारसा अत्यंत निष्ठापूर्वक स्वीकारणारी व्यक्ती म्हणजे अमेरिकेतील मार्टिन लुथर किंग (ज्युनिअर). या दोघांच्या कामात विलक्षण साम्य आहे. अमेरिकेतील बोस्टन येथील सामाजिक जबाबदारी संस्थेच्या संचालकांचे महात्मा गांधींवर ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यांनी गांधी आणि किंगबाबत लिहिले आहे की, गांधी यांच्या विचारांचा व अन्यायाला विरोध करण्याच्या मार्गाचा वारसा चालवला तो मार्टिन लुथरने. दोघेही उच्चशिक्षित होते. दोघांनीही सत्याग्रहाच्या मार्गाने राजकीय चळवळीस नेतृत्व दिले. औपचारिक स्वरूपात दोघांकडे राजकीय पद नव्हते; पण दोघांकडे निर्वाचित व्यक्तीपेक्षा जास्त राजकीय सत्ता नियंत्रण होते. अहिंसा दोघांचा मार्ग होता आणि विसंगती पाहा, दोघांचाही अंत गोळीने झाला.

गांधींचा लढा स्वातंत्र्यासाठी तर मार्टिनचा निग्रोंच्या मुक्तीसाठी. १९४० मध्ये प्रथम मार्टिन लुथरने गांधींचे विचार वाचले. त्या विचाराने ते इतके प्रभावित झाले की, त्याबद्दल मार्टिन लिहितात की, मी गांधींच्या विचारावर व कामावर असणारी जवळपास अर्धा डझन पुस्तके विकत घेतली. ही पुस्तके वाचल्यानंतर ते लिहितात की, त्यांची सत्ताप्राप्तीची ओढ क्रमाने कमी झाली. अहिंसेच्या मार्गावरचा विश्वास वाढला. सामाजिक सुधारणा शाश्वत पद्धतीने करण्याचा हा एकच मार्ग आहे, याच मार्गात ती क्षमता आहे, असे मार्टिनचे मत झाले.

सामान्य माणसाची जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेता हाच मार्ग लोकसहभाग मिळवून देऊ शकतो, अशी त्यांची खात्री झाली. केवळ बौद्धिक, वैचारिक कसरतीतून ग्रंथनिर्मिती होईल; पण व्यावहारिक पातळीवर सामाजिक सुधारणा होणार नाहीत. त्यासाठी गांधीमार्गच योग्य आहे, असे त्यांचे मत झाले. मार्टिनच्या मते, त्यांना येशू ख्रिस्तामध्ये प्रेरणा दिसली तर गांधींमध्ये मार्ग दिसला. एका निग्रोंच्या सभेत ते म्हणाले की, आपणास जेल भरावे लागतील, तरच समान हक्क मिळतील. गांधींचे शब्दच त्यांच्या मुखातून बाहेर पडले होते. महात्मा गांधींची हत्या झाली (१९४८), तेव्हा त्यांचे काम पूर्ण झाले नव्हते. मार्टिनची हत्या (१९६८) झाली तेव्हा निग्रोमुक्तीचा लढा अर्ध्यावरच होता. गांधींच्या हत्येनंतर जगभरातून तीन हजार संदेश आले होते. ज्ञात इतिहासातील नोंदीनुसार इतक्या मोठ्या संख्येने शोकसंदेश कुणाच्याच मृत्यूनंतर आले नाहीत. दोघेही अहिंसेचे पुजारी. मात्र दोघांच्याही मृत्यूनंतर प्रचंड दंगली उसळल्या. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र