शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

गांधी आणि लुथर किंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 04:41 IST

गांधींचा लढा स्वातंत्र्यासाठी तर मार्टिनचा निग्रोंच्या मुक्तीसाठी. १९४० मध्ये प्रथम मार्टिन लुथरने गांधींचे विचार वाचले.

- प्रा. बी. वाय. कुलकर्णी

महात्मा गांधी यांचा अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचा मार्ग सत्याग्रह. हा वारसा अत्यंत निष्ठापूर्वक स्वीकारणारी व्यक्ती म्हणजे अमेरिकेतील मार्टिन लुथर किंग (ज्युनिअर). या दोघांच्या कामात विलक्षण साम्य आहे. अमेरिकेतील बोस्टन येथील सामाजिक जबाबदारी संस्थेच्या संचालकांचे महात्मा गांधींवर ग्रंथ प्रकाशित आहेत. त्यांनी गांधी आणि किंगबाबत लिहिले आहे की, गांधी यांच्या विचारांचा व अन्यायाला विरोध करण्याच्या मार्गाचा वारसा चालवला तो मार्टिन लुथरने. दोघेही उच्चशिक्षित होते. दोघांनीही सत्याग्रहाच्या मार्गाने राजकीय चळवळीस नेतृत्व दिले. औपचारिक स्वरूपात दोघांकडे राजकीय पद नव्हते; पण दोघांकडे निर्वाचित व्यक्तीपेक्षा जास्त राजकीय सत्ता नियंत्रण होते. अहिंसा दोघांचा मार्ग होता आणि विसंगती पाहा, दोघांचाही अंत गोळीने झाला.

गांधींचा लढा स्वातंत्र्यासाठी तर मार्टिनचा निग्रोंच्या मुक्तीसाठी. १९४० मध्ये प्रथम मार्टिन लुथरने गांधींचे विचार वाचले. त्या विचाराने ते इतके प्रभावित झाले की, त्याबद्दल मार्टिन लिहितात की, मी गांधींच्या विचारावर व कामावर असणारी जवळपास अर्धा डझन पुस्तके विकत घेतली. ही पुस्तके वाचल्यानंतर ते लिहितात की, त्यांची सत्ताप्राप्तीची ओढ क्रमाने कमी झाली. अहिंसेच्या मार्गावरचा विश्वास वाढला. सामाजिक सुधारणा शाश्वत पद्धतीने करण्याचा हा एकच मार्ग आहे, याच मार्गात ती क्षमता आहे, असे मार्टिनचे मत झाले.

सामान्य माणसाची जोखीम घेण्याची क्षमता लक्षात घेता हाच मार्ग लोकसहभाग मिळवून देऊ शकतो, अशी त्यांची खात्री झाली. केवळ बौद्धिक, वैचारिक कसरतीतून ग्रंथनिर्मिती होईल; पण व्यावहारिक पातळीवर सामाजिक सुधारणा होणार नाहीत. त्यासाठी गांधीमार्गच योग्य आहे, असे त्यांचे मत झाले. मार्टिनच्या मते, त्यांना येशू ख्रिस्तामध्ये प्रेरणा दिसली तर गांधींमध्ये मार्ग दिसला. एका निग्रोंच्या सभेत ते म्हणाले की, आपणास जेल भरावे लागतील, तरच समान हक्क मिळतील. गांधींचे शब्दच त्यांच्या मुखातून बाहेर पडले होते. महात्मा गांधींची हत्या झाली (१९४८), तेव्हा त्यांचे काम पूर्ण झाले नव्हते. मार्टिनची हत्या (१९६८) झाली तेव्हा निग्रोमुक्तीचा लढा अर्ध्यावरच होता. गांधींच्या हत्येनंतर जगभरातून तीन हजार संदेश आले होते. ज्ञात इतिहासातील नोंदीनुसार इतक्या मोठ्या संख्येने शोकसंदेश कुणाच्याच मृत्यूनंतर आले नाहीत. दोघेही अहिंसेचे पुजारी. मात्र दोघांच्याही मृत्यूनंतर प्रचंड दंगली उसळल्या. 

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र