शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

खान्देशात महाशिवआघाडी ठरणार प्रबळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 21:42 IST

महाराष्टÑात सत्ता स्थापन करण्यात शिवसेना, राष्टÑवादी व काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांच्या ‘महाशिवआघाडी’ च्या वाटाघाटी सुरु आहेत.

मिलिंद कुलकर्णीमहाराष्टÑात सत्ता स्थापन करण्यात शिवसेना, राष्टÑवादी व काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांच्या ‘महाशिवआघाडी’ च्या वाटाघाटी सुरु आहेत. भाजपला अजून सत्तास्थापनेची आशा असली तरी कागदावर गणित काही जमताना दिसत नाही. त्यामुळे उशिरा का होईना, परंतु नव्या आघाडीची सत्ता येईल, असे आता तरी म्हणता येईल.सत्तास्थापनेसंबंधी पदांचे वाटप हा महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. मुख्यमंत्रिपदावरुन ‘महायुती’ तुटली. त्यामुळे नव्या आघाडीत हा विषय चर्चेला येत असताना सर्व बाजू विचारात घ्याव्या लागतील. काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसने यापूर्वी १९९९ ते २०१४ असे तब्बल १५ वर्षे आघाडीचे सरकार चालविले होते. काँग्रेस मोठा भाऊ तर राष्टÑवादी काँग्रेस धाकट्या भावाच्या भूमिकेत होती. यंदा मात्र राष्टÑवादीचे संख्याबळ काँग्रेसपेक्षा अधिक आहे. त्यामुळे भूमिकेत बदल संभवतो. यंदा त्यात शिवसेना सहभागी झाल्याने सेनेला मुख्यमंत्रिपदासह महत्त्वाची खाती द्यावी लागतील. प्रादेशिक समतोल साधत असताना प्रत्येक पक्षाची तेथील ताकद लक्षात घेऊन मंत्रिपदे, पालकमंत्रीपद, महामंडळांची अध्यक्षपदे द्यावी लागणार आहेत. शिवसेनेने अनेक ठिकाणी काँग्रेस आणि राष्टÑवादी कॉंग्रेसचा पराभव केलेला आहे. त्यामुळे जिल्हापातळीवर सत्तासंतुलन राखण्याचे मोठे आव्हान या आघाडीपुढे राहील.खान्देशचा विचार केला तर ही आघाडी प्रबळ आणि सक्षम आहे. एकूण २० जागांपैकी ११ आमदार हे आघाडीचे वा त्यांना समर्थन देणारे आहेत. भाजपचे आठ तर एमआयएमचा एक आमदार आहे. जळगाव जिल्ह्यात भाजपला गेल्या २५ वर्षांत प्रथमच एवढ्या निचांकी संख्येवर यावे लागले आहे. भाजपचा दबदबा त्यामुळे कमी होणार असून शिवसेना प्रथमच तुल्यबळ ठरली आहे. जळगाव जिल्ह्यात भाजप व शिवसेनेचे प्रत्येकी चार आमदार आहेत. काँग्रेस आणि राष्टÑवादीचे प्रत्येकी एक आहे तर अपक्ष चंद्रकांत पाटील यांनी सेना किंवा राष्टÑवादी अशा कोणालाही पाठिंबा दिला तरी तो आघाडीला पाठिंबा राहणार आहे.नंदुरबार जिल्ह्यात २०१४ प्रमाणेच पक्षीय बलाबल आणि जागा कायम आहेत. भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आहेत.धुळे जिल्ह्यात भाजपचे गेल्या निवडणुकीएवढेच संख्याबळ म्हणजे दोन कायम आहे. मात्र काँग्रेसला मोठा फटका बसला. गेल्यावेळी तीन आमदार असताना यंदा केवळ कुणाल पाटील हे निवडून आले. साक्रीच्या मंजुळा गावीत या अपक्ष आमदारांनी सेनेला पाठिंबा दिल्याने महाशिवआघाडीचे बळ दोन झाले. एमआयएमच्या डॉ.फारुक शाह यांचे कोणत्याही पक्षाला समर्थन राहणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केलेले आहे.कळीचा मुद्दा हा मंत्रिपदाविषयी येणार आहे. गेल्यावेळी भाजपकडून एकनाथराव खडसे, गिरीश महाजन, जयकुमार रावल तर शिवसेनेतर्फे गुलाबराव पाटील यांना मंत्रिपदे मिळाली होती. ही चार मंत्रिपदे कायम राहतात का, याविषयी उत्सुकता राहील. मंत्रिपद कुणाला मिळते, याचीही उत्कंठा आहे. शिवसेनेकडून गुलाबराव पाटील हे प्रबळ दावेदार असून त्यांना कॅबीनेट मंत्रिपदाची बढती मिळू शकते. चिमणराव पाटील हे दुसरे दावेदार आहेत, मात्र त्यांच्याकडे महायुती सरकारच्या काळात शेवटच्या काही महिन्यात तापी पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्षपद देण्यात आले होते, ते कायम ठेवले जाण्याची शक्यता अधिक आहे. साक्रीच्या मंजुळा गावीत आणि मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील या दोन अपक्षांना सेनेच्या कोट्यातून काही वाटा मिळतो का, ही अपेक्षा असणार आहे.काँग्रेसचे चार आमदार असून चौघांची मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदारी आहे. त्यात पक्षाचे प्रवक्तेपद सांभाळणाऱ्या आणि आठव्यांदा आमदार झालेल्या के.सी.पाडवी यांचे नाव निश्चित मानले जाते. एवढा अनुभवी आमदार पहिल्यांदा मंत्री होण्याची शक्यता आहे. शिरीष चौधरी, कुणाल पाटील हे दुसऱ्यांदा आमदार झाले असून ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे पूत्र शिरीष हे पहिल्यांदा आमदार झाले आहेत.अमळनेरचे अनिल भाईदास पाटील हे राष्टÑवादीचे खान्देशातील एकमेव आमदार आहेत. गेल्यावेळी डॉ.सतीश पाटील हे एकमेव आमदार होते. गुलाबराव देवकर, संजय सावकारे या पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांना २००९-१४ या काळात मंत्रिपद देण्यात आले होते, हा निकष राहिला तर पाटील यांना संधी मिळू शकते. पक्षसंघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने त्यांना पक्षाकडून बळ देण्याचा प्रयत्न होईल.नंदुरबार व धुळ्याला गेल्या पंचवार्षिक काळात स्थानिक पालकमंत्री नव्हता. यंदा तो मिळू शकेल, अशी आशा करुया. जळगावला गुलाबरावांकडे हे पद येऊ शकेल, असा अंदाज बांधता येतो. एकंदरीत पुढील काळ हा पक्षीय घडामोडींचा आणि त्याच्या उमटणाºया पडसादांचा राहणार आहे, हे मात्र निश्चित.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव