शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चालेना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 19:10 IST

उच्च न्यायालयाने डीजेवर बंदी घातल्यानंतरही मुंबई-पुण्यासह अनेक शहरांमध्ये डीजेचा आवाज घुमला. मुंबईत २०० पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले.

- धर्मराज हल्लाळे

उच्च न्यायालयाने डीजेवर बंदी घातल्यानंतरही मुंबई-पुण्यासह अनेक शहरांमध्ये डीजेचा आवाज घुमला. मुंबईत २०० पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले. उत्सवादरम्यान लातूरसारख्या ठिकाणीही एक गुन्हा दाखल झाला. एकीकडे ध्वनी प्रदूषण तर काही ठिकाणी जल प्रदूषणही होत राहीले़ या सर्व प्रकारांवर कायदा काम करत राहील. परंतू, त्याहीपेक्षा एक गंभीर गोष्ट आणि श्रद्धावानांच्या श्रद्धेला ठेच पोहोचविणारी नित्याने घडत असते़. विसर्जनादिवशी अनेक शहरांमध्ये उत्तम सुविधा केल्या जातात. जलाशयांमध्ये पाणी सोडले जाते. विहीर व कुंड स्थळी कार्यकर्ते आपली सेवा बजावतात. मात्र अनेक ठिकाणी ज्या विहिरींवर विशेष सुविधा  नसतात. तिथे गणेशमूर्तींचे विसर्जन विधिवत होत असले तरी त्या विहिरींमध्ये पाणी किती आहे. तेथील अवस्था कशी आहे हे सुद्धा काही वेळा पाहिले जात नाही.

लातूर शहराच्या पश्चिम भागातील अशाच एका विहिरीवरील विसर्जन पाहिले असता पर्यावरणाचा प्रश्न प्रकर्षाने जाणवला. त्याबरोबर ज्या श्रद्धेने लोक उत्सव साजरा करतात तिथे त्याच भावनेचेही विसर्जन केले जाते, असे म्हणावे लागेल. ही स्थिती सर्व शहरांमध्ये कमी-जास्त प्रमाणात आढळून येते़ विहिरीच्या पाण्याचे प्रदूषण हा विषय तर कोणाच्याही पटलावर नसतो. शिवाय मूर्ती ज्या पद्धतीने विसर्जीत केल्या जातात. त्यामुळे तिथे विटंबना होत नाही का हा प्रश्न पडतो. विहिरी व नदीपात्रात दुसऱ्या दिवशी काही ठिकाणचे बघायला मिळणारे चित्र हे धर्मभावना दुखावणारे असत नाही का, हाही सवाल विचारावासा वाटतो. सर्वजण विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीचे दृश्य पाहून खासगीमध्ये चुकीचे झाले असे म्हणतात. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला पाहिजे, असेही सांगतात. परंतु, त्याच्या अंमलबजावणीसाठी कोणीही विशेष प्रयत्न करीत नाही.

गणेश विसर्जनादरम्यान जालना व नांदेड जिल्ह्यात चौघेजण बुडाले. प्रत्येक वर्षी या दुर्घटना घडत राहतात. विसर्जन स्थळाची पाहणी स्थानिक पोलिस प्रशासन करत असते. महापालिकेकडून पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी उचलली जाते़ निर्माल्य नदीपात्रात, विहिरीत टाकू नका हेही सांगितले जाते. परंतु, नित्याने हे चालत राहते. गणेश विसर्जन करताना कोणाचाही जीव धोक्यात जाऊ नये यासाठी विसर्जन स्थळी कार्यकर्ते, सुरक्षा जवान तैनात असतात. त्यानंतरही राज्यामध्ये २० पेक्षा अधिक भक्तांचा मृत्यू झाला. या घटना घडलेल्या शहरात तरी पुढच्या वर्षी धोक्याची पातळी ओळखून नियोजन होईल का हा प्रश्न आहे. 

अगदीच सर्व ठिकाणी, सर्वांनीच पर्यावरणाला हानी पोहोचविली असे नाही. अनेक गणेश मंडळांनी पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. त्याचे देखावे केले़ प्रचार, प्रसार आणि प्रबोधनाचेही काम केले़ परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विशेषत: प्रदूषण मंडळ नियंत्रणाच्या डोळेझाक करण्यामुळे ध्वनी व जल प्रदूषण बिनदिक्कतपणे केले जाते़ महानगरांमध्ये शेकडो गुन्हे दाखल झाले आहेत. मात्र त्याचा पुढे पाठपुरावा केला जात नाही. पुरावे गोळा करून शिक्षा होईल, असे फारसे घडत नाही. न्यायालयाच्या आदेशामुळे प्रशासन गुन्हे दाखल करून मोकळे होते. त्यामुळे तुम्हाला जे करायचे ते करा आम्ही कायद्याचा भंग करत राहणार ही प्रवृत्ती वाढताना दिसत आहे. परिणामी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे काही चालेना असेच म्हणावे लागेल. यापूर्वीच्या निकालांचा संदर्भ देऊन प्रदूषण नियंत्रण मंडळाने अनेक नियमावली जारी केल्या आहेत. शेवटी त्या कागदावरच राहतात. त्यासाठीही न्यायालयाच्याच एखाद्या आदेशाची वाट पाहावी लागणार आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणGanpati Festivalगणेशोत्सवMumbaiमुंबईPuneपुणेlaturलातूर