शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: फाटके तोंड, घसरलेली जीभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2024 11:31 IST

Maharashtra Assembly Election 2024: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला २०२४ या वर्षी. योगायोगाने विधानसभेच्या निवडणुकाही याच वर्षात होत आहेत. प्रचारसभेतून उत्तमोत्तम भाषणे ऐकायला मिळतील, महाराष्ट्राच्या वाटचालीचा आढावा घेणारे विचारधन कानावर पडेल, अशी आशा होती आणि आहे. पण

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला २०२४ या वर्षी. योगायोगाने विधानसभेच्या निवडणुकाही याच वर्षात होत आहेत. प्रचारसभेतून उत्तमोत्तम भाषणे ऐकायला मिळतील, महाराष्ट्राच्या वाटचालीचा आढावा घेणारे विचारधन कानावर पडेल, अशी आशा होती आणि आहे. पण प्रचाराची रणधुमाळी सुरू झाल्याझाल्याच खासदार अरविंद सावंत, माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांचे समर्थक आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी आपल्या वाचाळ वृत्तीने मराठी संस्कृतीची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. सार्वजनिक जीवनात सभ्यतेचा वस्तुपाठ घालून देणारे यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श समोर असताना या वाचाळवीरांनी महिलांच्या चारित्र्याचे जाहीरपणे धिंडवडे काढले आहेत. भाजपच्या नेत्या शायना एन. सी. यांचा ‘इम्पोर्टेड माल’ असा उल्लेख होतो... एकेकाळी शेतकरी चळवळीत तुफान भाषणबाजी करणारे आणि भाजपच्या पाठिंब्याने आमदार झालेले सदाभाऊ खोत शरद पवार यांच्या आजारपणावरून व्यंग दर्शविणारी टीका करतात... ही मराठी माणसांची संस्कृती नाही. भाषण करण्याचे स्वातंत्र्य म्हणजे वाट्टेल ते बोलण्याचा परवाना नव्हे. महिलांचा सन्मान करणाऱ्या महाराष्ट्रात त्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभे करणारी वक्तव्ये ही हीन दर्जाची भाषा आहे. सुजय विखे-पाटील डॉक्टर आहेत, खासदार होते. त्यांच्यासमोर त्यांचा समर्थक विरोधी पक्षाच्या नेत्याच्या मुलीविषयी अश्लाघ्य भाषा वापरतो आणि त्याला विखे समर्थक टाळ्या वाजवून दाद देतात. ही कोणती संस्कृती आहे? शायना एन. सी. या आपल्या राहत्या भागाऐवजी दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवतात यावरून विकृत टिप्पणी करणारी भाषा संसद सदस्य कशी वापरू शकतो? सदाभाऊ खोत यांना एकेकाळी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तळमळीने धडाकेबाज भाषण करणारी तोफ म्हटले जायचे. त्या तोफेत राजकारणाचे पाणी गेले आणि ती धडाडण्याऐवजी फुसके बार काढू लागली. एकेरी उल्लेख करणे, शरद पवार यांच्या आजारपणावरून व्यंगात्मक बोलणे, हे सुसंस्कृत लोकप्रतिनिधींचे लक्षण म्हणावे का? विशेष म्हणजे सांगली जिल्ह्यातील जत येथे भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते शरद पवार यांच्याबद्दल वेडेवाकडे बोलले. कर्करोगावर मात करून उत्तम जगता येते, याचा वस्तुपाठ ज्यांनी समाजापुढे घालून दिला, अशा  ज्येष्ठ नेत्याच्या चेहऱ्याचा व्यंगात्मक उल्लेख करणे हा हीनपणा होय. सदाभाऊंच्या या अत्यंत असंस्कृत वक्तव्यावर व्यासपीठावरील लोकप्रतिनिधी हसत होते, हे आणखी चीड आणणारे. खोत यांच्या भाषणानंतर फडणवीस बोलायला उठले तेव्हा त्यांनी खडसावून सांगायला हवे होते की, ‘सदाभाऊ, तुमची भाषा योग्य नाही.’ पण त्यांनीही तसे केले नाही. शरद पवार सार्वजनिक जीवनात वावरणारे राजकीय नेते आहेत. त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्याचे स्वातंत्र्य जरूर आहे. लोकशाहीत ते असलेही पाहिजे. पण जाहीरपणे बोलताना आपण कोणते शब्द, कोणती भाषा आणि कुठले संदर्भ वापरतो, याचे भान सुटता कामा नये. सदाभाऊंनी ते सोडले. कोणतीही व्यक्ती किंवा नेता परिपूर्ण नसतो. विचारात मतभिन्नता असू शकते. भारतीय लोकशाहीचे हेच तर वैशिष्ट्य आहे. त्याची संधी घेत उद्याचा महाराष्ट्र कसा हवा, याचे उत्तम विवेचन व्यक्तिगत निंदा, नालस्ती न करता मांडता येऊ शकते. निवडणुकीचा प्रचार त्याचसाठी असतो. पण सध्या प्रचाराच्या आणि आरोप-प्रत्यारोपांच्या धामधुमीत नेमका याचाच विसर पडलेला दिसतो. इतरांवर टीका करताना आपली पाटी किती मळलेली आहे, हे ध्यानी धरण्याचाही विवेक सद्यस्थितीत अनेकांनी गमावलेला दिसतो. सदाभाऊंनाही असेच सोयीस्कर विस्मरण झालेले असावे. त्यांचे स्वत:चे वर्तन, चारित्र्य आणि त्यांच्या ‘प्रगती’वर प्रश्नचिन्हे लावली गेलेली आहेत.   एखाद्याच्या व्यंगावर बोलत असताना आपल्या अंगातील सदरा किती स्वच्छ आहे, याचे थोडे चिंतन करायला हरकत नव्हती. सावंत असोत वा सदाभाऊ, टीका झाल्यावर या दोघांनीही माफी मागितली खरी; पण आधी तोंड फाटेपर्यंत वाट्टेल ते बोलून नंतर अंगावर उलटले की, माफी मागण्यात काय हशील आहे? जाणत्या लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया आल्यावर माफी मागण्याची अशी नामुष्की येते. अशी वेळ येऊ नये, असे वाटत असेल, तर सर्वच पक्षातल्या नेत्या-कार्यकर्त्यांनी आपल्या फाटक्या तोंडाला विवेकाचा लगाम लावावा. आरोप-प्रत्यारोप चालूच आहेत, म्हणून निवडणुकीच्या गलबल्यात जीभ घसरण्याला परवाना असता कामा नये. भाषेची अभिजातता दूर राहिली, किमान संस्कृती तरी राखा, म्हणजे झाले!

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी