शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
6
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
7
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
8
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
10
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
11
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
12
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
13
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
14
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
15
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
16
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
17
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
18
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
19
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
20
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय

महाराष्ट्रावर पुन्हा दुष्काळाचे सावट; सामोरे जाण्याआधीच राजकीय कलगीतुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 04:08 IST

जलयुक्त शिवारांच्या कामांची पाहणी करताना मुख्यमंत्री म्हणायचे की, ‘पाच वर्षांत आम्ही महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार आहोत.’ हजारो कोटींची कामे करून शिवारच्या शिवारे जलयुक्त केली, असा दावाही केला जात होता; पण त्यात जलाचा अंश कोठे आहे?

जलयुक्त शिवारांच्या कामांची पाहणी करताना मुख्यमंत्री म्हणायचे की, ‘पाच वर्षांत आम्ही महाराष्ट्रदुष्काळमुक्त करणार आहोत.’ हजारो कोटींची कामे करून शिवारच्या शिवारे जलयुक्त केली, असा दावाही केला जात होता; पण त्यात जलाचा अंश कोठे आहे?

महाराष्ट्रावर पुन्हा एकदा दुष्काळाचे संकट येऊ घातले आहे. त्याला सामोरे जाण्यापूर्वीच राजकीय कलगीतुरा सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवा लातूर येथे बोलताना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. तसेच ते मान्यही केले. कर्जाच्या खाईत लोटलेला महाराष्ट्र दुष्काळाचा सामना करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही, अशी भीमगर्जनाही त्यांनी केली आहे. राजकारण्यांची भूमिकाही तशीच असते. अद्याप परतीच्या पावसाचा कालावधी संपलेला नसताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दुष्काळ जाहीर का करीत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. या नेत्यांच्या वक्तव्याने परिस्थितीचे गांभीर्य संपत नाही किंवा त्यातील तीव्रता कमी होत नाही. मागील उन्हाळ्यात जलयुक्त शिवारांच्या कामांची पाहणी करताना मुख्यमंत्री म्हणायचे की, आम्हीच महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार आहोत. गेल्या सहा-सात दशकांत झाले नाही ते काम आम्ही पाच वर्षांत पूर्ण करणार आहोत. चालू वर्षीच्या हंगामात पावसाने राज्यात सरासरी ५० ते ७० टक्क्यांपर्यंतच गाठल्याने दुष्काळाचे सावट उभे राहिले. परतीचा पाऊस पुरेसा पडला नाही तर त्याचे लवकरच संकटात रूपांतर होईल. याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. चारा-अन्नधान्य देता येईल, पण पाणी कोठून आणणार आहोत? हजारो कोटींची कामे करून शिवारच्या शिवारे जलयुक्त केली, असा दावा करण्यात येत होता; पण त्यात जलाचा अंश कोठे आहे? पुरेसा पाऊस झाला नाही तर महाराष्ट्राचे अर्थकारणच कोलमडते, हे पुन्हा एकदा सिद्ध होणार आहे. त्याचे खूप दूरगामी परिणाम जाणवतात. सामान्य मजुरांचे सर्वाधिक हाल होतात आणि पशुधन कमी व्हायला लागते. महाराष्ट्राची ८0 टक्के कोरडवाहू शेती हेच मुळात एक संकट आहे. ‘दरवर्षीच मग येतो पावसाळा’ असे म्हणत तो आला नाही तर काय करायचे? याचे कोडे सोडवत नाही आहोत, तोवर हे असेच होत राहणार आहे. खान्देश, मराठवाडा आणि वºहाड आदी विभागांतील जवळपास १८ जिल्ह्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालीच आहे. खरिपाचे उत्पादन हातचे गेले आहे. पूर्व विदर्भातही उत्पादनात ३० ते ४० टक्के घट होणार आहे. खरिपाचे पीक हातचे गेले तर किमान जगण्यापुरते उत्पादन देणारे रब्बी असते. ती पशुधन तरी वाचविते, मात्र परतीचा पाऊसही जेमतेमच आहे. ही परिस्थिती खूपच गंभीर बनत चालली आहे. दर तीन वर्षांनी महाराष्ट्र अशा संकटात सापडतो आहे. त्यामुळे जलयुक्त शिवार म्हणा की, आणखीन काहीही नाव द्या, असे प्रयोग यशस्वी होणार नाहीत. ही शिवारे भरण्यासाठी पाऊसच झाला पाहिजे. पावसाचा प्रत्येक थेंब न् थेंब अडवू, असे सांगितले जाते. त्यासाठी पुरेसा पाऊस झाला पाहिजे. वेगळ्या शब्दांत परत एकदा आपण पावसावरच अवलंबून राहणारी व्यवस्था निर्माण करून त्यावर मात करण्याची धडपड करीत आहोत. याचा वेगळा विचार करायला हवा आहे. आज पश्चिम महाराष्ट्रातील पूर्वेचा पट्टा वगळता आणि कोकण विभाग सोडला तर उर्वरित महाराष्ट्र संकटात आहे. याचे गांभीर्य अधिक गडद होत चालले आहे. त्यामुळे उद्ध्वस्त झालेली कुटुंबेच्या कुटुंबे शहरांकडे जाऊ लागली आहेत. त्या शहरात कितीही पायाभूत सुविधा निर्माण केल्या तरी प्रश्न संपणार नाहीत. भकासपणा संपणार नाही. शहरे ही विकासाची केंद्रे असली तरी त्यांच्यावर येणारा ताण हा ग्रामीण उद्ध्वस्तीकरणातून आहे. त्यामुळेच ग्रामीण भागात पावसावर अवलंबित्व रोखण्याचे प्रयोग करायला हवे आहेत, ते होणार नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्राची दुष्काळाच्या संकटातून सुटका होणार नाही. दुष्काळाचे संकट दुहेरी ओढविले आहे. या वर्षी उन्हाळी पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या लवकर केल्या, पण नंतर पावसाने ओढ दिल्याने बियाणे आणि खते वाया गेली. हा सर्वांत मोठा फटका होता. ज्या भागात हमखास पाऊस पडतो त्या पूर्व विदर्भ, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातही कमी पाऊस झाल्याने उत्पादन घटणार आहे, असे हे दुहेरी संकट कायम राहणार आहे. याची नोंद घ्यायला हवी आहे.

टॅग्स :droughtदुष्काळMaharashtraमहाराष्ट्र