शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
4
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
5
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
6
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
7
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
8
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
9
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
10
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
11
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
12
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
13
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
14
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
15
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
16
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
18
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
19
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
20
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!

निष्ठावान आणि संयमी शिवाजीराव नागवडे

By सुधीर लंके | Published: September 20, 2018 1:30 PM

सहकार चळवळीत आणि काँग्रेसच्या राजकारणात योगदान दिलेला नेता शिवाजीराव नागवडे यांच्या रुपाने जिल्ह्याने बुधवारी गमावला.

- सुधीर लंके 

सहकार चळवळीत आणि काँग्रेसच्याराजकारणात योगदान दिलेला नेता शिवाजीराव नागवडे यांच्या रुपाने जिल्ह्याने बुधवारी गमावला. जिल्ह्यातील ज्या नेत्यांनी हयातभर एखाद्या पक्षाचा झेंडा घेऊन तत्वनिष्ठपणे काम केले त्यात नागवडे यांचा उल्लेख सातत्याने होत राहील. 

डोळ्यावर काळा चष्मा, स्वच्छ पांढरे कपडे असे नागवडे यांचे राहणीमान होते. मितभाषी आणि शांत. दूरध्वनी केल्यावरही शांतपणे बोलायला सुरुवात करायचे. कधीही कोणावर जहरी टीका केली नाही. जे काही बोलायचे ते विरोधकांचाही सन्मान राखत. लोकशाही मार्गाने. 

नागवडे मूळचे कम्युनिष्ट. शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना ते काँग्रेसमध्ये आले. श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. सहकार क्षेत्रात ते पारंगत असल्याने माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे स्वत: त्यांची अनेकदा मदत घेत. राज्यात कारखानदारीत कोठे काही समस्या आली की वसंतदादा नागवडेंकडे ती समस्या सोपवत. त्यांचा या क्षेत्रात अधिकार असल्यानेच राज्य साखर संघाचे नेतृत्वही त्यांच्याकडे दिले गेले. शरद पवार यांनीही त्यांचे हे नेतृत्व मान्य केले. नागवडे हे वसंतदादा समर्थक म्हणून ओळखले जात. वसंतदादांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता. विलासराव देशमुख यांच्यासोबतही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. 

काँग्रेसचे राजकारण सुरु केल्यानंतर हयातभर ते काँग्रेसचे पाईक राहिले. १९७८ साली त्यांना काँग्रेसकडून विधानसभेची उमेदवारी मिळाली. जनता दलाचे मोहन गाडे व नागवडे यांच्यात हा मुकाबला झाला.  त्यावेळी नागवडे प्रथम विधानसभेत पोहोचले. पुढे श्रीगोंदा तालुक्याच्या राजकारणात नागवडे-पाचपुते हा संघर्ष पहायला मिळाला. विरोधकांचा ‘शंभर टक्के’ बंदोबस्त करायचा अशी प्रस्थापित राजकारण्यांची एक पद्धत असते. नागवडे त्यास अपवाद होते. त्यांनी कधीही विरोधकांवर टोकाची टीका केली नाही. सातत्याने सुसंस्कृतपणा जपला. पाचपुते बोलके व नागवडे मितभाषी असा हा राजकीय मुकाबला होता. पण, न बोलताही नागवडे यांनी आपला जनाधार कोसळू दिला नाही. १९९९ ला नागवडे पुन्हा आमदार झाले. चार वेळा विधानसभांना ते पराभूत झाले. 

१९९१ साली विखे-गडाख ही निवडणूक देशभर गाजली होती. यावेळी नागवडे हे गडाखांच्या रुपाने काँग्रेससोबत राहिले. काँग्रेसच्या गटबाजीच्या राजकारणात नागवडे हे थोरात गटाचे समर्थक होते. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र राजेंद्र नागवडे यांनी बंडखोरी करत भाजपकडून विधानसभा लढवली. पण, त्यावेळीही नागवडे यांनी काँग्रेस सोडली नाही. 

वांगदरी हे त्यांचे गाव. तेथील सरपंच ते आमदार व सहकारातील मोठा नेता असा प्रवास त्यांनी केला. तालुक्यात शिक्षणसंस्थाही उभारल्या. खेडोपाडी शिक्षण व तंत्रशिक्षण संस्था पोहोचल्या पाहिजेत हे वसंतदादा पाटील यांचे स्वप्न होते. त्यातून नागवडे यांनी तंत्रनिकेतन महाविद्यालय सुरु केले. केजी ते पीजीच्या शिक्षणसंस्था उभारल्या. काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या हयातीतच कारखान्याला त्यांचे नाव देण्याचा निर्णय सभासदांनी घेतला. विद्यमान जिल्हा परिषदेत त्यांच्या सुनबाई महिला बालकल्याण समितीच्या सभापती आहेत. नागवडे परिवाराला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद दिले जाईल, असे अनेकांना वाटत होते. पण, काँग्रेसच्या राजकारणात ती संधी त्यांना मिळाली नाही. नागवडे यांनी काँग्रेसमध्ये आयुष्य घातले. त्या तुलनेत पक्षाने त्यांचा योग्य सन्मान राखला नाही. 

विधानपरिषद किंवा इतर ठिकाणी त्यांचे पुनर्वसन करता येणे शक्य होते. परंतु बदललेल्या कॉंग्रेस संस्कृतीत नागवडे दुर्लक्षित राहिले. नागवडे यांनी स्वत:हून त्यासाठी कधी लुडबूड केली नाही. २०१४ च्या निवडणुकीत सहमतीच्या राजकारणात राहुल जगताप यांच्यासाठी श्रीगोंदा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्याचा दिलदारपणा नागवडे यांनी दाखविला होता. जगताप यांच्या विजयात त्यांनी मोलाचा वाटा उचलला. ‘बापू’ नावाने परिचित असलेले नागवडे हे जुन्या काँग्रेस नेत्यांच्या शृंखलेतील एक महत्त्वाचे केंद्र होते. ‘बापू’ नावाप्रमाणेच ते शांत व संयमी होते.

लेखक अहमदनगर आवृत्तीचे प्रमुख आहेत. 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर