शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

लोकसभेच्या प्रचारात सभ्यतेचेच वावडे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2019 6:52 AM

विरोधी पक्षांजवळ तोंडाचे हत्यार असते व तेही त्याचा सर्रास वापर करतात. पं. नेहरूत्यांच्या भाषणात विराधी नेत्यांचे नावही कधी घेत नसत. तो प्रकार पुढे इंदिरा गांधींपर्यंत चालत राहिला. आता मात्र तो सारा इतिहास झाला आहे.

१९५२ पासून कधी नव्हे तेवढी आपल्या निवडणूक प्रचाराने खालची पातळी २०१९ च्या निवडणुकीत गाठली आहे. देशात याआधीही अनेक चुरशीच्या निवडणुका झाल्या. १९६७ व १९७७ या दोन निवडणुका कमालीच्या टोकदार व हिंसक पातळीवरच्या म्हणता येतील अशा झाल्या. पण पुढारी, माध्यमे, सोशल मीडिया, प्रचारक आणि पक्षांचे कार्यकर्ते यांनी या वेळी प्रचाराची जी नीच व हीन पातळी गाठली तेवढी याआधी ती दुसऱ्या कोणत्याही निवडणुकीत देशाला पाहावी लागली नाही. सुब्रह्मण्यम स्वामी या माणसाच्या जिभेला हाड नाही. ते वाजपेयींपासून जेटलींपर्यंतच्या साऱ्यांना शिवीगाळ करीत आले. अशा माणसाने राहुल गांधींच्या जन्माचे दाखले मागणे व प्रियांकाच्या धर्मश्रद्धेविषयी प्रश्न विचारणे स्वाभाविक मानले पाहिजे.

प्रज्ञासिंह ठाकूर यांनी हेमंत करकरे हे माझ्या शापाने मेल्याचे सांगणे, मनमोहन सिंग यांना अर्थशास्त्र कळत नाही असे एखाद्या सडकछाप पुढाºयाने म्हणणे, नरेंद्र मोदी आणि स्मृती इराणी यांच्या संबंधांची नको तशी चर्चा करणे हा सारा अशाच वाचाळ प्रचाराचा भाग म्हणता येईल. पण तो तसा नाही. यातल्या काहींना घाणेरडी वक्तव्ये करत प्रसिद्धीत राहण्याची सवय आहे. राहुल आणि सोनिया यांना शिवीगाळ करणे हे त्यांच्या पक्षालाही धर्मकर्तव्यासारखे वाटणारे आहे. मात्र याहून वाईट प्रकार विरोधी पक्षांच्या नेत्यांविरुद्ध सरकारी यंत्रणांचा ऐन मतदानाच्या क्षणापर्यंत वापर करणे हा आहे.
झारखंड, केरळ व बंगालच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध चौकशांचा ससेमिरा लावणे, त्यांच्या सहकाºयांना अटक करणे, रॉबर्ट वाड्राविरुद्ध पोलीस कारवाई करणे, स्टॅलीन आणि द्रमुकच्या पुढा-यांवर छापे घालणे हा सारा या दुष्टाव्याचा पुरावा आहे. याशिवाय सोशल मीडियावर पोसून सोडलेल्या ट्रोल्सकडून पुढा-यांवर लैंगिक आरोप करणे, स्त्रियांविरुद्ध बेशरम विनोद करणे यासारखे प्रकार याआधी आपल्या निवडणुकीत कधी झाले नाहीत. मोदी व त्यांचे सरकार यावर टीका करणा-यांबाबत तर या माध्यमांनी सारे तारतम्यच गुंडाळून ठेवले आहे. त्यांना दिल्या जाणा-या शिव्या आपण कधी सडकेवरही ऐकल्या नसतात. या व अशा भाषेचा वापर प्रत्यक्ष मोदी, शहा, गिरीराज, योगी इत्यादींनी तर केला; पण ज्यामुळे प्रचाराची व लोकशाहीची शान आणखी डागाळेल अशी भाषा सुमित्रा महाजन, आदित्यनाथ, स्मृती इराणी यांनीही वापरली. येत्या काळात आपले राजकारण जास्तीचे हिंस्र, अश्लील व हीन पातळीवर जाणार असल्याचीच ही लक्षणे आहेत. याला आळा घालू शकणा-या निवडणूक आयोगालाही नखे वा दात नाहीत आणि त्याला पुरेशी क्षमताही पुरविलेली नाही हेही या काळात दिसले.
आझम खान व जया प्रदा यांचा संघर्ष, दानवे व खैरे यांची खडाखडी, ममता बॅनर्जी आणि काँग्रेस यांनी पश्चिम बंगालमध्ये तसेच आप व काँग्रेस यांनी दिल्लीत एकमेकांवर केलेली चिखलफेक किंवा प्रादेशिक पुढाºयांनी गल्लीतल्या पोरांनी एकमेकांना ऐकवावी अशी केलेली शिवीगाळ हे प्रकारही या काळात फार झालेत. ज्याच्या हातात सत्ता आहे त्याला पोलीस आर्थिक अन्वेषण विभाग, गुप्तहेर खाते, विकत घेतलेली माध्यमे या साºयाच गोष्टी वापरता येतात. विरोधी पक्षांजवळ तोंडाचे हत्यार असते व तेही त्याचा सर्रास वापर करतात. पं. नेहरूत्यांच्या भाषणात विराधी नेत्यांचे नावही कधी घेत नसत. तो प्रकार पुढे इंदिरा गांधींपर्यंत चालत राहिला. आता मात्र तो सारा इतिहास झाला आहे. एखाद्याची जातकुळी वा आई-बहीण उद्धारणे ही गोष्ट आता अनेकांना नेहमीची वाटू लागली आहे.
सोशल मीडियावर येणारे ‘संदेश’ आणि त्यावरची विधाने पाहिली की आपण आपल्याच सभ्य देशात राहत आहोत की नाही हा प्रश्न साºयांना पडावा. राजकारण हे धर्मक्षेत्र आहे आणि त्यातली स्पर्धा धर्माच्या सुसंस्कृत पातळीवर लढविली पाहिजे, असे गांधी आणि विनोबा म्हणत. ही माणसे आजचा काळ पाहायला जिवंत नाहीत हे त्यांचे भाग्य वा आपले दुर्दैव मानले पाहिजे. राजकारणाला सभ्यतेचे व सुसंस्कृतपणाचे वळण देण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करीत नसतील तर ते काम जनतेनेच आता हाती घेतले पाहिजे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग