शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

लोकसभा निवडणूक निकाल 2019: ना मुद्दे ना उमेदवार, केवळ मोदीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 17:17 IST

आता भाजपची ओळख संघटनात्मक पक्ष म्हणून कमी तर शक्तिशाली नेत्यासोबत चालणारा सफल पक्ष अशी बनली आहे, हे भाजपसाठी संकटही ठरू शकते.

- पुण्यप्रसून वाजपेयीआता भाजपची ओळख संघटनात्मक पक्ष म्हणून कमी तर शक्तिशाली नेत्यासोबत चालणारा सफल पक्ष अशी बनली आहे, हे भाजपसाठी संकटही ठरू शकते. संघाच्या स्वयंसेवकाची भूमिका मोदींसमोर लुप्त झाल्यासारखी आहे.हुमतातील सरकार दुसऱ्यांदा आपल्या बळावर सुमारे ५० टक्के मतांच्या आधारे सत्ता कायम राखेल याचा कुणी कधी विचारही केला नसेल. केवळ चार राज्ये वगळता (तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि पंजाब) प्रत्येक ठिकाणी भाजप अशीच धमक दाखवत सत्तेचा दोर आपल्याकडे ठेवेल. केवळ प्रादेशिक पक्षच नव्हे तर राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसलाही राजकारण बदलण्याबाबत नव्याने विचार करण्याची गरज भासेल, असेही कुणाला वाटले नसेल. देशासमोर मुद्दे कायम असताना हे घडले. बेरोजगारी, शेतकरी, मजूर आणि उत्पादनाची स्थिती अशा पद्धतीने बिकट झाली की, आर्थिक परिस्थिती बिघडली. त्यानंतर घृणा, पाकिस्तानशी युद्ध, हिंदूराष्ट्राचा विचार आणि गोडसे हे मुद्दे जिवंत करण्यात आले त्यामुळेच जनादेशासमोर मुद्दे आणि उमेदवार गौण ठरले. जाती तुटताना दिसून आल्या. उमेद आणि आस बनलेली हिंदुत्वाची झूल उडत देशभक्ती आणि राष्ट्रवादात अशा प्रकारे हरवून गेली की केवळ पारंपरिक राजकीय विचारच नव्हे तर संपूर्ण राजकीय कहाणी बदलली गेली. प. बंगालमध्ये धर्माला अफू मानणारे डावे मतदार पालटत धर्माचा जप करणाऱ्या भाजपच्या बाजूने उभे ठाकले. डाव्यांची २२ टक्के मते एकजात भाजपशी जोडली गेली.

मोदींच्या ऐतिहासिक विजयाबद्दल मौन पाळले जावे, एवढा २०१९ चा जनादेश स्थूल नाही. कारण बंगालला लागून असलेल्या बिहारमध्ये एमवायचा जोड तुटला आहे. लालूप्रसाद यादव यांची गैरहजेरी, त्यांच्या कुटुंबातील कलह आणि महागठबंधनची एकूणच तऱ्हा पाहता यादव केवळ राजदशी जोडला गेला आहे, तसेच मुस्लिमांची मते महाआघाडीलाच मिळतील हे गृहीतक गळून पडले. तेजस्वी, राहुल, मांझी, कुशवाह, साहनी यांनी हातमिळवणी केली असतानाही महाआघाडीची झोळी रिती राहिली. केवळ नितीश-मोदी-पासवान यांचा विजयच नव्हे तर सामाजिक समीकरणही बदलल्याचे संकेत मिळाले आहेत. बिहारला लागून असलेल्या उत्तर प्रदेशात अखिलेश-मायावती यांची एकजूट होऊनही यादव-जाटवांची मतेही ओढू शकले नाही. अखिलेश यादव भविष्यात ओबीसींचे नेते बनू शकणार नाहीत. मायावती यांचा सामाजिक विस्तारही केवळ जाटवांवर निर्भर राहील आणि त्यातही फूट पडत आहे, असा संकेतही दिला गेला. भाजपने हिंदूराष्ट्रवाद आणि देशभक्तीच्या नावावर केलेले ध्रुवीकरण भारी ठरले. काँग्रेसने सपा-बसपापासून वेगळे होत उच्चवर्णीयांची मते भाजपकडून ओढण्याचा विचार केला. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीचा पाया रोवण्यासह संघटन बळकट करण्याच्या काँग्रेसच्या रणनीतीला जबर धक्का बसला आहे. या जनादेशात भाजप आणि काँग्रेससाठी मोठा संदेशही दडला आहे.
जनादेशानंतर काय होणार, हा अखेरचा सवाल असेल. कारण देशाने विज्ञानाला मानले नाही, विकासही समजू शकला नाही. सत्य काय हेही देशाने जाणून घेतले नाही. प्रेम, सौहार्दाची भावना नसांमधून दौडत आहे, असेही नाही. हिंदू- देशभक्त होण्याची भावना प्रबळ ठरली आहे. शिक्षण, आरोग्य, पाणी, पर्यावरण हे मुद्दे बेईमानी वाटेल अशीच स्थिती आहे.(लेखक वरिष्ठ पत्रकार आहेत)

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी