शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक निकाल 2019: ना मुद्दे ना उमेदवार, केवळ मोदीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 17:17 IST

आता भाजपची ओळख संघटनात्मक पक्ष म्हणून कमी तर शक्तिशाली नेत्यासोबत चालणारा सफल पक्ष अशी बनली आहे, हे भाजपसाठी संकटही ठरू शकते.

- पुण्यप्रसून वाजपेयीआता भाजपची ओळख संघटनात्मक पक्ष म्हणून कमी तर शक्तिशाली नेत्यासोबत चालणारा सफल पक्ष अशी बनली आहे, हे भाजपसाठी संकटही ठरू शकते. संघाच्या स्वयंसेवकाची भूमिका मोदींसमोर लुप्त झाल्यासारखी आहे.हुमतातील सरकार दुसऱ्यांदा आपल्या बळावर सुमारे ५० टक्के मतांच्या आधारे सत्ता कायम राखेल याचा कुणी कधी विचारही केला नसेल. केवळ चार राज्ये वगळता (तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि पंजाब) प्रत्येक ठिकाणी भाजप अशीच धमक दाखवत सत्तेचा दोर आपल्याकडे ठेवेल. केवळ प्रादेशिक पक्षच नव्हे तर राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसलाही राजकारण बदलण्याबाबत नव्याने विचार करण्याची गरज भासेल, असेही कुणाला वाटले नसेल. देशासमोर मुद्दे कायम असताना हे घडले. बेरोजगारी, शेतकरी, मजूर आणि उत्पादनाची स्थिती अशा पद्धतीने बिकट झाली की, आर्थिक परिस्थिती बिघडली. त्यानंतर घृणा, पाकिस्तानशी युद्ध, हिंदूराष्ट्राचा विचार आणि गोडसे हे मुद्दे जिवंत करण्यात आले त्यामुळेच जनादेशासमोर मुद्दे आणि उमेदवार गौण ठरले. जाती तुटताना दिसून आल्या. उमेद आणि आस बनलेली हिंदुत्वाची झूल उडत देशभक्ती आणि राष्ट्रवादात अशा प्रकारे हरवून गेली की केवळ पारंपरिक राजकीय विचारच नव्हे तर संपूर्ण राजकीय कहाणी बदलली गेली. प. बंगालमध्ये धर्माला अफू मानणारे डावे मतदार पालटत धर्माचा जप करणाऱ्या भाजपच्या बाजूने उभे ठाकले. डाव्यांची २२ टक्के मते एकजात भाजपशी जोडली गेली.

मोदींच्या ऐतिहासिक विजयाबद्दल मौन पाळले जावे, एवढा २०१९ चा जनादेश स्थूल नाही. कारण बंगालला लागून असलेल्या बिहारमध्ये एमवायचा जोड तुटला आहे. लालूप्रसाद यादव यांची गैरहजेरी, त्यांच्या कुटुंबातील कलह आणि महागठबंधनची एकूणच तऱ्हा पाहता यादव केवळ राजदशी जोडला गेला आहे, तसेच मुस्लिमांची मते महाआघाडीलाच मिळतील हे गृहीतक गळून पडले. तेजस्वी, राहुल, मांझी, कुशवाह, साहनी यांनी हातमिळवणी केली असतानाही महाआघाडीची झोळी रिती राहिली. केवळ नितीश-मोदी-पासवान यांचा विजयच नव्हे तर सामाजिक समीकरणही बदलल्याचे संकेत मिळाले आहेत. बिहारला लागून असलेल्या उत्तर प्रदेशात अखिलेश-मायावती यांची एकजूट होऊनही यादव-जाटवांची मतेही ओढू शकले नाही. अखिलेश यादव भविष्यात ओबीसींचे नेते बनू शकणार नाहीत. मायावती यांचा सामाजिक विस्तारही केवळ जाटवांवर निर्भर राहील आणि त्यातही फूट पडत आहे, असा संकेतही दिला गेला. भाजपने हिंदूराष्ट्रवाद आणि देशभक्तीच्या नावावर केलेले ध्रुवीकरण भारी ठरले. काँग्रेसने सपा-बसपापासून वेगळे होत उच्चवर्णीयांची मते भाजपकडून ओढण्याचा विचार केला. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीचा पाया रोवण्यासह संघटन बळकट करण्याच्या काँग्रेसच्या रणनीतीला जबर धक्का बसला आहे. या जनादेशात भाजप आणि काँग्रेससाठी मोठा संदेशही दडला आहे.
जनादेशानंतर काय होणार, हा अखेरचा सवाल असेल. कारण देशाने विज्ञानाला मानले नाही, विकासही समजू शकला नाही. सत्य काय हेही देशाने जाणून घेतले नाही. प्रेम, सौहार्दाची भावना नसांमधून दौडत आहे, असेही नाही. हिंदू- देशभक्त होण्याची भावना प्रबळ ठरली आहे. शिक्षण, आरोग्य, पाणी, पर्यावरण हे मुद्दे बेईमानी वाटेल अशीच स्थिती आहे.(लेखक वरिष्ठ पत्रकार आहेत)

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी