शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

लोकसभा निवडणूक निकाल 2019: ना मुद्दे ना उमेदवार, केवळ मोदीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 17:17 IST

आता भाजपची ओळख संघटनात्मक पक्ष म्हणून कमी तर शक्तिशाली नेत्यासोबत चालणारा सफल पक्ष अशी बनली आहे, हे भाजपसाठी संकटही ठरू शकते.

- पुण्यप्रसून वाजपेयीआता भाजपची ओळख संघटनात्मक पक्ष म्हणून कमी तर शक्तिशाली नेत्यासोबत चालणारा सफल पक्ष अशी बनली आहे, हे भाजपसाठी संकटही ठरू शकते. संघाच्या स्वयंसेवकाची भूमिका मोदींसमोर लुप्त झाल्यासारखी आहे.हुमतातील सरकार दुसऱ्यांदा आपल्या बळावर सुमारे ५० टक्के मतांच्या आधारे सत्ता कायम राखेल याचा कुणी कधी विचारही केला नसेल. केवळ चार राज्ये वगळता (तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ आणि पंजाब) प्रत्येक ठिकाणी भाजप अशीच धमक दाखवत सत्तेचा दोर आपल्याकडे ठेवेल. केवळ प्रादेशिक पक्षच नव्हे तर राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसलाही राजकारण बदलण्याबाबत नव्याने विचार करण्याची गरज भासेल, असेही कुणाला वाटले नसेल. देशासमोर मुद्दे कायम असताना हे घडले. बेरोजगारी, शेतकरी, मजूर आणि उत्पादनाची स्थिती अशा पद्धतीने बिकट झाली की, आर्थिक परिस्थिती बिघडली. त्यानंतर घृणा, पाकिस्तानशी युद्ध, हिंदूराष्ट्राचा विचार आणि गोडसे हे मुद्दे जिवंत करण्यात आले त्यामुळेच जनादेशासमोर मुद्दे आणि उमेदवार गौण ठरले. जाती तुटताना दिसून आल्या. उमेद आणि आस बनलेली हिंदुत्वाची झूल उडत देशभक्ती आणि राष्ट्रवादात अशा प्रकारे हरवून गेली की केवळ पारंपरिक राजकीय विचारच नव्हे तर संपूर्ण राजकीय कहाणी बदलली गेली. प. बंगालमध्ये धर्माला अफू मानणारे डावे मतदार पालटत धर्माचा जप करणाऱ्या भाजपच्या बाजूने उभे ठाकले. डाव्यांची २२ टक्के मते एकजात भाजपशी जोडली गेली.

मोदींच्या ऐतिहासिक विजयाबद्दल मौन पाळले जावे, एवढा २०१९ चा जनादेश स्थूल नाही. कारण बंगालला लागून असलेल्या बिहारमध्ये एमवायचा जोड तुटला आहे. लालूप्रसाद यादव यांची गैरहजेरी, त्यांच्या कुटुंबातील कलह आणि महागठबंधनची एकूणच तऱ्हा पाहता यादव केवळ राजदशी जोडला गेला आहे, तसेच मुस्लिमांची मते महाआघाडीलाच मिळतील हे गृहीतक गळून पडले. तेजस्वी, राहुल, मांझी, कुशवाह, साहनी यांनी हातमिळवणी केली असतानाही महाआघाडीची झोळी रिती राहिली. केवळ नितीश-मोदी-पासवान यांचा विजयच नव्हे तर सामाजिक समीकरणही बदलल्याचे संकेत मिळाले आहेत. बिहारला लागून असलेल्या उत्तर प्रदेशात अखिलेश-मायावती यांची एकजूट होऊनही यादव-जाटवांची मतेही ओढू शकले नाही. अखिलेश यादव भविष्यात ओबीसींचे नेते बनू शकणार नाहीत. मायावती यांचा सामाजिक विस्तारही केवळ जाटवांवर निर्भर राहील आणि त्यातही फूट पडत आहे, असा संकेतही दिला गेला. भाजपने हिंदूराष्ट्रवाद आणि देशभक्तीच्या नावावर केलेले ध्रुवीकरण भारी ठरले. काँग्रेसने सपा-बसपापासून वेगळे होत उच्चवर्णीयांची मते भाजपकडून ओढण्याचा विचार केला. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीचा पाया रोवण्यासह संघटन बळकट करण्याच्या काँग्रेसच्या रणनीतीला जबर धक्का बसला आहे. या जनादेशात भाजप आणि काँग्रेससाठी मोठा संदेशही दडला आहे.
जनादेशानंतर काय होणार, हा अखेरचा सवाल असेल. कारण देशाने विज्ञानाला मानले नाही, विकासही समजू शकला नाही. सत्य काय हेही देशाने जाणून घेतले नाही. प्रेम, सौहार्दाची भावना नसांमधून दौडत आहे, असेही नाही. हिंदू- देशभक्त होण्याची भावना प्रबळ ठरली आहे. शिक्षण, आरोग्य, पाणी, पर्यावरण हे मुद्दे बेईमानी वाटेल अशीच स्थिती आहे.(लेखक वरिष्ठ पत्रकार आहेत)

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNarendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी