शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

लोकसभा निवडणूक निकाल 2019: विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळवणारा कौल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 17:06 IST

ज्या राज्यात सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसला बहुमत मिळाले होते त्या राज्यातही काँग्रेस स्वत:ची पत राखू शकली नाही.

- आ. डॉ. नीलम गोऱ्हेउद्धव ठाकरे जो निर्णय घेतात त्याला सर्व शिवसैनिक मनापासून साथ देतात, हे निकालातून स्पष्ट झाले. ज्या राज्यात सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसला बहुमत मिळाले होते त्या राज्यातही काँग्रेस स्वत:ची पत राखू शकली नाही.सतराव्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणेच आहेत. भारतात रालोआ व महाराष्ट्रात शिवसेना-भाजपच्या जागा चांगल्या संख्येने निवडून येतील, हा आमचा आत्मविश्वास होता. सरकारचे घटक म्हणून आम्ही शेतकरी कर्जमुक्ती व्हावी, भूसंपादनाचे विधेयक लोकाभिमुख व्हावे, जीएसटीचा परतावा महापालिकांना थेट अगोदरच मिळावा, महाराष्ट्र अखंड राहावा, नाणार प्रकल्प रद्द व्हावा यासाठी जाहीर भूमिका सर्व सदनांत घेतली. त्यासाठी शिवसेनेने केंद्र सरकार व राज्य सरकारमध्ये पाठपुरावा केला. आमच्या वैचारिक मतभेदांना काहींनी भांडण हे नाव दिले. परंतु शिवसेनेची भूमिका पोटात एक व ओठात एक कधीच नसते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जनतेच्या प्रश्नांवरचे मतभेद सर्व व्यासपीठांवर व प्रत्यक्ष संवादातून मांडत होते, परंतु त्यांनी युतीत मतभेद झाले तरी मनभेद होऊ दिले नाहीत.

शिवसेनेने प्रश्न उपस्थित केले होते, पण त्याचबरोबर प्रत्यक्षात थेट मदत व सेवा करण्यातही शिवसेना जनतेसोबत राहिली. दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या ज्वलंत प्रश्नांसाठी शिवसेनेने अनेक सेवाभावी योजना केल्या. उदा. शिवजलक्रांती योजना, बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना, गुरांसाठी पशुखाद्य यासोबतच आमदार-खासदारांनी महिन्याचे मानधनही दुष्काळ मदतसेवेसाठी दिले. याबाबत समाजात सकारात्मक भूमिका दिसून आली व शिवसेनेची विश्वासार्हता वाढली होती. त्याचा परिणाम म्हणजे सरकारमधील दोन्ही घटकांची परत एकदा युती झाली, हे मतदारांनी स्वीकारले.
उद्धव ठाकरे जो निर्णय घेतात त्याला सर्व शिवसैनिक मनापासून साथ देतात, हे निकालातून स्पष्ट झाले. ज्या राज्यात सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसला बहुमत मिळाले होते त्या राज्यातही काँग्रेस स्वत:ची पत राखू शकली नाही. महाराष्ट्रात तर काँग्रेसची दयनीय अवस्था झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने कशाबशा दोन जागा राखल्या व दोन जागा फोडाफोडीने निवडून आणल्या. धाराशिव, परभणी, मुंबईच्या तीन जागा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रामटेक, यवतमाळ, बुलडाणा, मावळ, नाशिक यासोबतच कोल्हापूर, हातकणंगले व पालघर या नव्या जागा मिळविल्या. एका अर्थाने कोल्हापूरच्या अंबाबाई व तुळजापूरच्या आदिशक्तीने हा आशीर्वादच दिला, असे मला वाटते. विचार म्हणून देशहित, महाराष्ट्र विकास, राजकीय विश्वासार्हता, कार्यकर्त्यांचे परिश्रम या घटकांचा एकत्रित परिणाम निवडणुकीत दिसून आला. जनतेचा हा विश्वास व प्रेम पाहिले तर विधानसभेतही युती राहील असे वाटते. देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आता परत मिळलेल्या या संधीतून जनतेला अधिक विश्वास व न्याय देण्याचा संकल्प आजच करणे योग्य राहील.(लेखिका शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या आहेत) 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019congressकाँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे