शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणूक निकाल 2019: विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळवणारा कौल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 17:06 IST

ज्या राज्यात सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसला बहुमत मिळाले होते त्या राज्यातही काँग्रेस स्वत:ची पत राखू शकली नाही.

- आ. डॉ. नीलम गोऱ्हेउद्धव ठाकरे जो निर्णय घेतात त्याला सर्व शिवसैनिक मनापासून साथ देतात, हे निकालातून स्पष्ट झाले. ज्या राज्यात सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसला बहुमत मिळाले होते त्या राज्यातही काँग्रेस स्वत:ची पत राखू शकली नाही.सतराव्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणेच आहेत. भारतात रालोआ व महाराष्ट्रात शिवसेना-भाजपच्या जागा चांगल्या संख्येने निवडून येतील, हा आमचा आत्मविश्वास होता. सरकारचे घटक म्हणून आम्ही शेतकरी कर्जमुक्ती व्हावी, भूसंपादनाचे विधेयक लोकाभिमुख व्हावे, जीएसटीचा परतावा महापालिकांना थेट अगोदरच मिळावा, महाराष्ट्र अखंड राहावा, नाणार प्रकल्प रद्द व्हावा यासाठी जाहीर भूमिका सर्व सदनांत घेतली. त्यासाठी शिवसेनेने केंद्र सरकार व राज्य सरकारमध्ये पाठपुरावा केला. आमच्या वैचारिक मतभेदांना काहींनी भांडण हे नाव दिले. परंतु शिवसेनेची भूमिका पोटात एक व ओठात एक कधीच नसते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जनतेच्या प्रश्नांवरचे मतभेद सर्व व्यासपीठांवर व प्रत्यक्ष संवादातून मांडत होते, परंतु त्यांनी युतीत मतभेद झाले तरी मनभेद होऊ दिले नाहीत.

शिवसेनेने प्रश्न उपस्थित केले होते, पण त्याचबरोबर प्रत्यक्षात थेट मदत व सेवा करण्यातही शिवसेना जनतेसोबत राहिली. दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या ज्वलंत प्रश्नांसाठी शिवसेनेने अनेक सेवाभावी योजना केल्या. उदा. शिवजलक्रांती योजना, बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना, गुरांसाठी पशुखाद्य यासोबतच आमदार-खासदारांनी महिन्याचे मानधनही दुष्काळ मदतसेवेसाठी दिले. याबाबत समाजात सकारात्मक भूमिका दिसून आली व शिवसेनेची विश्वासार्हता वाढली होती. त्याचा परिणाम म्हणजे सरकारमधील दोन्ही घटकांची परत एकदा युती झाली, हे मतदारांनी स्वीकारले.
उद्धव ठाकरे जो निर्णय घेतात त्याला सर्व शिवसैनिक मनापासून साथ देतात, हे निकालातून स्पष्ट झाले. ज्या राज्यात सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसला बहुमत मिळाले होते त्या राज्यातही काँग्रेस स्वत:ची पत राखू शकली नाही. महाराष्ट्रात तर काँग्रेसची दयनीय अवस्था झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने कशाबशा दोन जागा राखल्या व दोन जागा फोडाफोडीने निवडून आणल्या. धाराशिव, परभणी, मुंबईच्या तीन जागा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रामटेक, यवतमाळ, बुलडाणा, मावळ, नाशिक यासोबतच कोल्हापूर, हातकणंगले व पालघर या नव्या जागा मिळविल्या. एका अर्थाने कोल्हापूरच्या अंबाबाई व तुळजापूरच्या आदिशक्तीने हा आशीर्वादच दिला, असे मला वाटते. विचार म्हणून देशहित, महाराष्ट्र विकास, राजकीय विश्वासार्हता, कार्यकर्त्यांचे परिश्रम या घटकांचा एकत्रित परिणाम निवडणुकीत दिसून आला. जनतेचा हा विश्वास व प्रेम पाहिले तर विधानसभेतही युती राहील असे वाटते. देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आता परत मिळलेल्या या संधीतून जनतेला अधिक विश्वास व न्याय देण्याचा संकल्प आजच करणे योग्य राहील.(लेखिका शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या आहेत) 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019congressकाँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे