शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
3
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
4
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
5
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
6
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
7
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
8
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
9
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
10
सावधान! 'ही' ५ उपकरणे एक्सटेंशन बोर्डमध्ये लावाल तर होऊ शकतो मोठा स्फोट; जाणून घ्या
11
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
12
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
13
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
14
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
15
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
16
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
17
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
18
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
19
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
20
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

लोकसभा निवडणूक निकाल 2019: विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळवणारा कौल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 17:06 IST

ज्या राज्यात सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसला बहुमत मिळाले होते त्या राज्यातही काँग्रेस स्वत:ची पत राखू शकली नाही.

- आ. डॉ. नीलम गोऱ्हेउद्धव ठाकरे जो निर्णय घेतात त्याला सर्व शिवसैनिक मनापासून साथ देतात, हे निकालातून स्पष्ट झाले. ज्या राज्यात सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसला बहुमत मिळाले होते त्या राज्यातही काँग्रेस स्वत:ची पत राखू शकली नाही.सतराव्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणेच आहेत. भारतात रालोआ व महाराष्ट्रात शिवसेना-भाजपच्या जागा चांगल्या संख्येने निवडून येतील, हा आमचा आत्मविश्वास होता. सरकारचे घटक म्हणून आम्ही शेतकरी कर्जमुक्ती व्हावी, भूसंपादनाचे विधेयक लोकाभिमुख व्हावे, जीएसटीचा परतावा महापालिकांना थेट अगोदरच मिळावा, महाराष्ट्र अखंड राहावा, नाणार प्रकल्प रद्द व्हावा यासाठी जाहीर भूमिका सर्व सदनांत घेतली. त्यासाठी शिवसेनेने केंद्र सरकार व राज्य सरकारमध्ये पाठपुरावा केला. आमच्या वैचारिक मतभेदांना काहींनी भांडण हे नाव दिले. परंतु शिवसेनेची भूमिका पोटात एक व ओठात एक कधीच नसते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे जनतेच्या प्रश्नांवरचे मतभेद सर्व व्यासपीठांवर व प्रत्यक्ष संवादातून मांडत होते, परंतु त्यांनी युतीत मतभेद झाले तरी मनभेद होऊ दिले नाहीत.

शिवसेनेने प्रश्न उपस्थित केले होते, पण त्याचबरोबर प्रत्यक्षात थेट मदत व सेवा करण्यातही शिवसेना जनतेसोबत राहिली. दुष्काळ व शेतकरी आत्महत्या या ज्वलंत प्रश्नांसाठी शिवसेनेने अनेक सेवाभावी योजना केल्या. उदा. शिवजलक्रांती योजना, बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना, गुरांसाठी पशुखाद्य यासोबतच आमदार-खासदारांनी महिन्याचे मानधनही दुष्काळ मदतसेवेसाठी दिले. याबाबत समाजात सकारात्मक भूमिका दिसून आली व शिवसेनेची विश्वासार्हता वाढली होती. त्याचा परिणाम म्हणजे सरकारमधील दोन्ही घटकांची परत एकदा युती झाली, हे मतदारांनी स्वीकारले.
उद्धव ठाकरे जो निर्णय घेतात त्याला सर्व शिवसैनिक मनापासून साथ देतात, हे निकालातून स्पष्ट झाले. ज्या राज्यात सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसला बहुमत मिळाले होते त्या राज्यातही काँग्रेस स्वत:ची पत राखू शकली नाही. महाराष्ट्रात तर काँग्रेसची दयनीय अवस्था झाली. राष्ट्रवादी काँग्रेसने कशाबशा दोन जागा राखल्या व दोन जागा फोडाफोडीने निवडून आणल्या. धाराशिव, परभणी, मुंबईच्या तीन जागा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रामटेक, यवतमाळ, बुलडाणा, मावळ, नाशिक यासोबतच कोल्हापूर, हातकणंगले व पालघर या नव्या जागा मिळविल्या. एका अर्थाने कोल्हापूरच्या अंबाबाई व तुळजापूरच्या आदिशक्तीने हा आशीर्वादच दिला, असे मला वाटते. विचार म्हणून देशहित, महाराष्ट्र विकास, राजकीय विश्वासार्हता, कार्यकर्त्यांचे परिश्रम या घटकांचा एकत्रित परिणाम निवडणुकीत दिसून आला. जनतेचा हा विश्वास व प्रेम पाहिले तर विधानसभेतही युती राहील असे वाटते. देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आता परत मिळलेल्या या संधीतून जनतेला अधिक विश्वास व न्याय देण्याचा संकल्प आजच करणे योग्य राहील.(लेखिका शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि उपनेत्या आहेत) 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019congressकाँग्रेसBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरे