शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election Result 2024 : सब का साथ, सब की सरकार!

By संजय आवटे | Updated: June 8, 2024 10:12 IST

Lok Sabha Election Result 2024 : एकेकाळी ‘विरोधकांच्या मनातले पंतप्रधान’ असलेले नितीश आणि बऱ्याच सरकारांना पाणी पाजलेले नायडूंच्या सोबतीने सरकार चालवण्याचा प्रवास ‘अग्निपथा’वरचाच असेल!

- संजय आवटे(संपादक, लोकमत, पुणे)

सत्तेच्या परिघापासून कोसो दूर असलेल्या भारतीय जनसंघाला सत्तेची चव सर्वप्रथम चाखवली ती समाजवाद्यांनी. काँग्रेस आणि त्यातही इंदिरा गांधींना विरोध हेच एकमेव सूत्र असलेल्या विरोधकांनी तेव्हा कोणताच विधिनिषेध बाळगला नाही. १९६२ नंतर बिगर काँग्रेसवादाचा सिद्धांत राममनोहर लोहियांनी मांडला आणि त्याचा प्रमुख लाभार्थी पुढे भाजपच ठरला.  त्यामुळेच भारतीय जनसंघाला पहिल्यांदा सत्ता मिळू शकली. जनता पक्षाचे आघाडी सरकार १९७७ मध्ये स्थापन झाले.

मोरारजीभाई देसाई पंतप्रधान झाले. मात्र, जनता सरकार कोसळले. जनता पक्ष संपल्यात जमा झाला. मग तेच नाव घेऊन उभा राहिलेला भारतीय जनता पक्ष सर्वदूर पसरत गेला. डाव्यांची शकले होत रोज नवा पक्ष स्थापन होत गेला! महाराष्ट्रात आघाडीचा पहिला प्रयोग रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस यांनी १९७८मध्ये एकत्र येऊन केला खरा; पण त्याच वर्षी ‘समाजवादी’ शरद पवारांच्या पुलोदने जनसंघाला पहिल्यांदा मंत्रालय दाखवले. नंतरच्या भाजपने मग तिथे मुक्कामच ठोकायची तयारी केली, तेव्हा पवारांनीच त्यांना तिथून बाहेर काढले. 

१९७७ मध्ये सत्तेची ऊब अनुभवल्यानंतर जनसंघ स्वस्थ बसला नाही. त्याच्या नव्या अवताराने, अर्थात भारतीय जनता पक्षाने त्यानंतर राजकारणाच्या मुख्य प्रवाहाची जागा बळकावली. १९८४ मध्ये दोन जागांवरून २०१९ मध्ये ३०३ जागा मिळेपर्यंत भाजपची मजल गेली. २०२४ च्या निवडणुकीत मात्र भाजपला २४० जागांवर थांबावे लागले. २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने स्वबळावर सत्ता तर मिळवलीच, पण विरोधकांची दाणादाण करून टाकली. दहा वर्षांनंतर ही अशी पहिली लोकसभा असेल की जिथे विरोधी पक्षनेता असेल. आघाडीमधील घटक पक्षांना विश्वासात घेतल्याशिवाय सरकार स्थापन करता येणार नाही आणि चालवताही येणार नाही. 

 या निवडणुकीत एनडीए आघाडी चर्चेत नव्हती. मुद्दा भाजपचा, खरे तर मोदींचा होता. विरोधकांनी ‘इंडिया’ आघाडी स्थापली. ‘इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स’ अशी ही आघाडी तिच्या नावामुळेच चर्चेत आली. संपूर्ण देश सत्तेच्या विरोधात लढतो आहे, असे वातावरण विरोधकांनी तयार केले. ‘इंडिया विरुद्ध मोदी’ असाच हा सामना होता.  प्रचारसभांमध्ये मोदींनी स्वतःचे नाव ७५८ वेळा घेतले, पण ‘एनडीए’चा उल्लेख अपवादानेच झाला. निकाल लागला आणि मग मात्र ‘एनडीए विरुद्ध इंडिया’ असे आकडे येऊ लागले. १९८४ला राजीव गांधींना ४१४ जागा मिळाल्या. त्यानंतर तीन दशके पुरेसे राजकीय भांडवल कोणालाच मिळाले नव्हते. २०१४ मध्ये भाजपने ते मिळवले आणि आता आघाडी सरकारचा काळ इतिहासजमा झाल्याचे अभ्यासकही सांगू लागले. मात्र, आता ते पर्व पुन्हा आले आहे. 

नितीशकुमार, चंद्राबाबू आणि एकनाथ शिंदे यांना सोबत घेतल्याशिवाय भाजपला बहुमत सिद्ध करता येणार नाही. हे तीनही शिलेदार वेगवेगळ्या धारणांचे आणि प्रदेशांचे आहेत. नितीशकुमारांना समान नागरी कायदा नको असेल अथवा जातनिहाय जनगणना आणि आरक्षणावर त्यांचा पक्ष ठाम असेल. हिंदी पट्ट्यातील राष्ट्रवादाला चंद्राबाबूंचा विरोध असेल. मुंबईला स्वतंत्र दर्जा द्यायचा मुद्दा उद्या पुढे आलाच तर शिंदेंचा त्याला आक्रमक विरोध असेल. एखादा पक्ष ‘अग्निपथ’ला विरोध करून हे सरकार चालवणे हाच ‘अग्निपथ’ असल्याची जाणीव भाजपला करून देईल. त्यामुळे, विरोधक सोडाच, घटक पक्षांना पटवून दिल्याशिवाय कोणताही निर्णय भाजपला घेता येणार नाही. 

२००४ मध्ये डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान झाल्यावर, भारत-अमेरिका आण्विक कराराच्या मुद्द्यावरून तेव्हा डाव्यांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला तरी सरकार तरले आणि सलग दहा वर्षांत या सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले. मनरेगा, माहिती अधिकार, शिक्षण हक्क कायदा, आधार, आण्विक करार, अर्थकारणाला गती हे सारे त्याच काळातले. अर्थमंत्री असताना ज्या दूरगामी आर्थिक सुधारणा मनमोहन सिंगांनी केल्या, ते १९९१ मधील पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील सरकार हेही आघाडीचेच. स्वबळावर सरकार चालवणे हे कॉंग्रेसचे जन्मजात वैशिष्ट्य. त्याला विरोध म्हणून आघाडीचे प्रयोग भारतीय राजकारणात झाले. १९९९ चा अपवाद वगळता, आघाडी सरकारांचे प्रयोग यशस्वी केले काँग्रेसनेच. 

१९९९ मध्ये अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले खरे, पण त्यापूर्वी त्यांची दोन सरकारे अल्पावधीत कोसळली. १९७७ चा विरोधकांचा प्रयोग तर सपशेल अपयशी ठरला होताच, पण त्यानंतर १९८९ मधील व्ही. पी. सिंग, १९९० मध्ये चंद्रशेखर; तर देवेगौडांचे १९९६ मधील, इंद्रकुमार गुजरालांचे १९९७ मधील असे सगळे आघाडी प्रयोग अल्पजीवी ठरले. या खेळांमध्ये पारंगत  नितीश आणि नायडू आता २०२४ च्या नव्या खेळात सहभागी झाले आहेत. ज्या मंडल-कमंडल राजकारणाने भारतात आघाड्यांचे पर्व सुरू झाले, त्याचा  दुसरा सिझन सुरू झाला आहे. एकेकाळी ‘विरोधकांच्या मनातले पंतप्रधान’ असलेले नितीश आणि बऱ्याच सरकारांना पाणी पाजलेले नायडू यांना सोबत घेऊन सरकार चालवताना मोदींना आपले ‘मोदीपण’ विसरावे लागणार आहे!

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपा