शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

लोकसभा २०२४ विशेष लेख:  निवडणुकीच्या धामधुमीतून हरवला तरुण मतदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 09:03 IST

ज्यांचे भविष्य निवडणुकीत सर्वांत जास्त गुंतलेले आहे त्या तरुणांनी मतदानात रस दाखवला नाही, याचे कारण काय असावे?

धुर्जती मुखर्जी, सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक

सक्षम आणि सर्वांना बरोबर घेणाऱ्या अर्थव्यवस्थेच्या काळातील, म्हणजेच अमृतकाळातील ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे, असे भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनी अलीकडेच एका आघाडीच्या राष्ट्रीय दैनिकात लिहिले आहे. याचा अर्थ कदाचित विद्यमान सरकारला माहीत असेल; परंतु या अमृतकाळाचा परिणाम म्हणावा तेवढा दिसत नसल्याने तरुणांना कदाचित तो अर्थ पुरेसा उमगणार नाही; तरुण हा लोकसंख्येतला एक अत्यंत गतिशील आणि चैतन्यपूर्ण घटक असूनही सरकारला त्यांच्या प्रश्नांच्या विविध बाजू दुर्दैवाने समजलेल्या नाहीत, असे युवकांचे नेते आणि सामाजिक विश्लेषणकर्त्यांना वाटते आहे. जगात  तरुणांची जास्त संख्या सध्या भारतात आहे. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार १५ ते  २९ वर्षे वयोगटातील तरुणांची संख्या लोकसंख्येच्या २७.२ टक्के इतकी आहे. वर्ष २०३६ पर्यंत ती २२.७ टक्के इतकी कमी होईल; तरीही ३४.५ कोटी हा आकडा मोठाच आहे.निवडणूक प्रक्रियेत सर्वसाधारण तरुणांना फारसे स्वारस्य नाही, ही दुर्भाग्याची गोष्ट होय. जीडीपी वाढीचे अंदाज काहीही असले तरी ग्रामीण युवकांना शेती किफायतशीर वाटत नाही आणि त्या भागात छोटे रोजगार फारसे उपलब्ध नाहीत. नव्या पिढीत त्यामुळे भ्रमनिरास आणि नैराश्याची स्थिती आहे. खरे तर चालू निवडणुकीत यावर चर्चा होऊ शकली असती; पण नवे सरकार या प्रश्नात लक्ष घालील असे या पिढीला वाटत नाही. भारतातील बेरोजगारीवर आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या ताज्या अहवालात देशातल्या एकूण बेरोजगारात ८३ टक्के तरुण असल्याचे दाखवले आहे. ६६ टक्के शिक्षित तरुण बेरोजगार आहेत. भारतात बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक आहे. २३ टक्के या सर्वाधिक प्रमाणात भारत येमेन, इराण, लेबनॉन आणि इतर अशा देशांबरोबर गणला जातो. ज्यांचे भविष्य निवडणुकीत सर्वांत जास्त गुंतलेले आहे त्या तरुणांनी मतदानात रस दाखवला नाही. प्रमुख राजकीय पक्षांकडे पुरेसे तरुण नेतृत्व नाही. भावी पिढीचे प्रश्न हे पक्ष प्रामाणिकपणे हाताळत नाहीत. यातून ही उदासीनता आली आहे. राजकीय पक्ष देत असलेली हमी किंवा आश्वासने तरुणांना आकृष्ट करू शकली नाहीत. या आश्वासनांमागचे हेतूही प्रामाणिक नाहीत. तरुणांसाठी रोजगारनिर्मिती करण्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी यांनी मौन राखले असा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला.‘लॅन्सेट’च्या एका लेखातील आकडेवारीनुसार आत्महत्येच्या मार्गाने जीवन संपाविणाऱ्यांत ७५ टक्के पुरुष असतात. त्यातही आर्थिकदृष्ट्या विपन्नावस्थेत असलेले तरुण अधिक. १९७८ मध्ये आत्महत्यांचे प्रमाण  ६.३ टक्के इतके होते. मागच्या जनगणनेत शहरांची ४४ टक्के वाढ झालेली दिसत असताना हे प्रमाण १२.४ टक्क्यांवर गेले. ग्रामीण भागातील आत्महत्या सहसा नोंदल्याही जात नाहीत.राज्यांनी तसेच केंद्राने पुरस्कारलेल्या योजना ग्रामीण युवकांना आकर्षक वाटत नाहीत, सगळ्या सारख्याच वाटतात. सत्तारूढ पक्ष श्रीमंतांना धार्जिणा आहे, असे काँग्रेसला वाटते. त्यामुळे देशातील संपत्ती नेमकी कोणाकडे किती आहे, याचे सर्वेक्षण करून पुनर्वाटप करण्याचे आश्वासन पक्षाने दिले. तरुण याचे स्वागत करतील की नाही, हे अनिश्चित आहे. दुसरीकडे कंपन्या अधिकाधिक यंत्रनिर्भर होत असून, नोकर कपातीच्या मागे लागल्या आहेत.देशातील गुणवान  तरुणवर्ग मतदानाचा हक्क बजावण्यास नाखूश का आहे, याचा विचार राजकीय पक्षांना करावाच लागेल. समतोल सामाजिक, आर्थिक विकासात भावी पिढीला सामील करणे महत्त्वाचे असल्याने त्यांच्यावर प्रभाव पडेल, त्यांना प्रेरणा मिळेल, असे धोरण हेच यावरचे उत्तर आहे. काही अर्थतज्ज्ञांनी सुचविल्याप्रमाणे बेरोजगारी भत्ता सुरू करण्याचीही गरज आहे. अशा प्रकारचा भत्ता सुरू करण्यासाठी श्रीमंतांवर एखादा टक्का कर लावला तरी चालेल. प्रगत देश होण्याकडे वाटचाल करताना तरुणांच्या हिताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान