शहरं
Join us  
Trending Stories
1
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
2
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
3
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
4
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
5
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
6
मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये
7
धक्कादायक! उत्तर प्रदेशातील 'ब्लू ड्रम'नंतर आता उत्तराखंडमध्ये पत्नीने पेट्रोल ओतून पतीला जाळले
8
“उद्धव ठाकरे महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का?”; युती चर्चांवर मनसे नेत्याचा थेट सवाल
9
ट्रम्प टॅरिफचा पहिला धक्का! 'ही' दिग्गज कंपनी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढणार
10
सर्वोच्च न्यायालयाचा अपमान, निशिकांत दुबे अडचणीत; कारवाई होणार? भाजपने हात झटकले...
11
झांबियामध्ये १९ कोटी रुपये अन् ४ कोटींचे सोने घेऊन जाताना भारतीयाला पकडले; दुबईला जाण्याच्या तयारीत होता
12
घरगुती मीटरवर इलेक्ट्रीक कार चार्ज केली; केला २५००० चा दंड, कार मालक रडकुंडीला आला...
13
IPL 2025 : सतरावं वरीस मोक्याचं! युवा क्रिकेटरच्या 'विरार टू चेन्नई व्हाया मुंबई' प्रवासाची गोष्ट
14
मुकेश अंबानींच्या रिलायन्सपासून ते टाटा ग्रुपपर्यंत, या १० कंपन्यांनी फक्त ३ दिवसांत कमावला मोठा नफा
15
वैजापूरमध्ये पहाटे थरार! चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक...खातेदारांच्या पैशांचे काय होणार?
16
वैभव सूर्यवंशीच्या धडाकेबाज खेळाने गुगलचे सीईओही भारावले, सुंदर पिचाई कौतुक करत म्हणाले, "वयाच्या १४ व्या वर्षी…’’  
17
पंचग्रही योगात नववर्षाचे पहिले पंचक: ५ दिवस प्रतिकूल, अशुभ; ५ कामे टाळा, नेमके काय करू नये?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
19
पुण्यात कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, वॉटर पार्कमध्ये झिपलायनिंग करताना...
20
भीषण अपघात! लग्नावरून परतणाऱ्या तरुणांची कार गॅस टँकरला धडकली, २ जणांचा मृत्यू ,एक जखमी

धर्म अन् राजकारण यांची सरमिसळ उदारमतवादाला अमान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 10:26 IST

उदारमतवादी विचाराने आधुनिक समाजाचा पाया घातला आहे. पण अलीकडे इंग्लंड, युरोप, अमेरिका, चीन, मुस्लीम राष्ट्रे आणि भारत यातील सामाजिक आणि राजकीय चित्र उदारमतवादी विचारांच्या विरुद्ध असल्याचे दिसून येते.

- दत्ता दामोदर नायक

उदारमतवादी विचाराने (ज्याला इंग्रजीत Liberal thought असे म्हटले जाते) आधुनिक समाजाचा पाया घातला आहे. पण अलीकडे इंग्लंड, युरोप, अमेरिका, चीन, मुस्लीम राष्ट्रे आणि भारत यातील सामाजिक आणि राजकीय चित्र उदारमतवादी विचारांच्या विरुद्ध असल्याचे दिसून येते. अशावेळी उदारमतवादी विचारसरणी म्हणजे नेमके काय याचा ऊहापोह करणे गरजेचे ठरते.

उदारमतवादी विचारसरणी स्वातंत्र्य हे सर्वोच्च मानवी मूल्य मानते. त्यामुळे कुठल्याही व्यक्तीला वैयक्तिक जीवनात हवे ते निर्णय घेण्याचे निर्णय स्वातंत्र्य, नागरी जीवनातले नागरी स्वातंत्र्य, राजकीय जीवनातले राजकीय स्वातंत्र्य, सांस्कृतिक जीवनातले अभिव्यक्ती स्वातंत्र्य याला उदारमतवादी विचार प्राधान्य देतो. याचमुळे राजकारणात हुकूमशाही, फॅसिस्ट राजवटीचा उदारमतवादी विचारसरणी तिरस्कार करते आणि सत्तेचे विकेंद्रीकरण करणाऱ्या लोकशाही राजवटीचे स्वागत करते. स्वातंत्र्याखालोखाल मानवी हक्क (human rights) आणि मानवी प्रतिष्ठा ((human dignity) ही मूल्ये उदारमतवादाला महत्त्वाची वाटतात.

समता हे मूल्य मानवांना उदारमतवाद, त्यात दर्जाची समता (equality of status) आणि संधीची समता (equality of opportunity) यांचा समावेश करते. विषम समाजाला संधीची समता उपलब्ध करण्यासाठी शिक्षणात आणि रोजगारात आरक्षणाचे तत्त्व उदारमतवादाने पुरस्कृत केलेले आहे. अमेरिकेत त्याला  Affirmative action असे म्हणतात.

उदारमतवादी तत्त्वज्ञान समाजातल्या कोणत्याही प्रतिगामी, मूलतत्त्ववादी (fundamentalist), जातीयवादी, अंधश्रद्धा, धर्मवादी विचारांच्या विरोधात असते. या तत्त्वज्ञानाचा पाया विज्ञाननिष्ठ, विवेकी व शास्त्रशुद्ध असतो. तो पुरोगामी व प्रगमनशील असतो. भूतकाळाच्या स्मृतिरंजनात हे तत्त्वज्ञान अडकून पडत नाही, त्याची दृष्टी मानवी समाजाच्या भविष्यकालीन क्षितिजाचा वेध घेते.उदारमतवादी विचार सरकारी हुकूमशाहीकडे झुकणाऱ्या अति डाव्या आणि सरकारी हस्तक्षेपाला गैर मानणाऱ्या अति उजव्या अशा दोन्ही टोकांच्या आर्थिक तत्त्वज्ञानापासून दूर राहाते. अर्थव्यवस्थेत सरकारने कमीतकमी हस्तक्षेप करावा असे उदारमतवादी तत्त्वज्ञानाला वाटते.

उदारमतवादी आर्थिक तत्त्वज्ञानाला नागरिकांच्या खासगी मालमत्तेचा हक्क अबाधित राहावा असे वाटते. ग्राहकाला बाजारात निवडीचे स्वातंत्र्य असावे. त्यामुळे कोणत्याही ग्राहकोपयोगी वस्तूंवर अवास्तव सरकारी बंधने व कर असू नयेत.

आर्थिक, सामाजिक व राजकीय प्रश्र्न हे हिंसेतून, युद्धांतून किंवा क्रांतीतून सोडविले जाऊ नयेत तर ते संवादांतून, चर्चेतून, सुधारणांतून, प्रागतिक कायद्यांतून व प्रबोधनांतून सोडविले जावेत, असे उदारमतवादाला वाटते. उदारमतवाद व्यक्तीचे धार्मिक स्वातंत्र्य मान्य करतो. पण धर्म आणि राजकारण यांची सरमिसळ उदारमतवादाला मान्य नाही. त्या दृष्टीने उदारमतवादी तत्त्वज्ञान ईहवादी (सेम्पलर) आहे.धर्मावर आधारलेले राजकारण जसे उदारमतवादी विचाराला पसंत नाही तसेच जात, पंथ, भाषा, अस्मिता या भावनिक प्रश्र्नावर राजकारण केले जाऊ नये असे उदारमतवादाला वाटते. राजकीय पथांनी विशेषत: निवडणुकांत प्रामुख्याने आर्थिक प्रश्र्नच हाताळले पाहिजेत, असे उदारमतवादी विचार मानतो.

एखाद्या देशात, प्रदेशात किंवा आस्थापनात कणखर नेतृत्व असले म्हणून त्या देशाची किंवा आस्थापनाची प्रगती होत नाही. त्या देशातील नागरिक किंवा त्या आस्थापनातील कर्मचारी किती कार्यक्षम आहेत त्यावर त्या देशाचे भवितव्य अधिक अवलंबून असते, असे उदारमतवाद मानतो.

उदारमतवादी विचार प्रागतिक करप्रणालीचा पुरस्कार करतो. उदाहरणार्थ जमिनीवर कर असावेत असे त्याला वाटते. म्हणजे जमिनी विकसित होतील. भूखंडावर घरे बांधली जातील. घरांची समस्या कमी होईल याचप्रमाणे वारसाहक्काने मिळणाऱ्या संपत्तीवर व मालमत्तेवर कर (इस्टेट ड्युटी) असावा, असे उदारमतवादाला वाटते.

मानवी बुद्धिमत्ता, कल्पकता, उद्योजकता, सामूहिक पुरुषार्थ यांच्या बळावर जागतिक प्रश्र्न सोडविणे कठीण नाही असा आशावाद उदारमतवादी विचार जोपासतो. 

टॅग्स :IndiaभारतchinaचीनAmericaअमेरिका