शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

‘देवाची करणी’?

By admin | Updated: April 2, 2016 03:52 IST

धनपिपासू लोक किती संवेदनाहीन, निष्ठुर आणि उलट्या काळजाचे असतात याचे यापरते अन्य उदाहरण ते काय असू शकते? पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता शहराच्या उत्तरेकडील

धनपिपासू लोक किती संवेदनाहीन, निष्ठुर आणि उलट्या काळजाचे असतात याचे यापरते अन्य उदाहरण ते काय असू शकते? पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता शहराच्या उत्तरेकडील भागात अपूर्णावस्थेत असलेला एक उड्डाण पूल गुरुवारी भर माध्यान्ही कोसळला आणि त्यात जबर मनुष्य तसेच वित्त हानी झाली. अत्यंत गजबजलेल्या भागात या पुलाचे काम सुरु असल्याने पुलाच्या कोसळलेल्या बांधकामाच्या ढिगाऱ्याखाली काही बसगाड्या, मोटारी आणि मालमोटारी दबल्या गेल्या व काही लोक अक्षरश: चिरडले जाऊन अनेकजण जखमी झाले. परिणामी दोन्ही प्रकारच्या हानीचा निश्चित अंदाज लगेचच येऊ शकलेला नाही. २००९साली सुरु झालेले या पुलाचे बांधकाम सात वर्षे झाली तरी अजून अपूर्णच असावे हे त्या राज्यातील आधीच्या डाव्या आघाडीच्या आणि नंतर सत्तेत आलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस सरकारच्या कार्यक्षमतेचे द्योतकच मानले पाहिजे. आंध्र प्रदेशातील कोणा बांधकाम कंपनीला या पुलाचे काम देण्यात आले होते. साहजिकच अर्धवट अवस्थेतील पूल कोसळणे ही प्राय: त्याच कंपनीची जबाबदारी असताना तिने तत्काळ आपली जबाबदारी झटकून टाकताना जे काही घडले ते ‘अ‍ॅक्ट आॅफ गॉड’ म्हणजे देवाची करणी असल्याचे निर्लज्जपणे सांगून टाकले. ‘ओ माय गॉड’ या सिनेमामधून संबंधित ठेकेदार इतके बरीक शिकून गेला! पण केवळ या ठेकेदाराला एकट्याला तरी दोष का द्यायचा? या दुर्घटनेवरुन लगेच जी राजकीय सुंदोपसुंदी सुरु झाली ती तरी कोणती संवदनशीलतेचा प्रत्यय आणून देणारी आहे? ममतांच्या कारकिर्दीत पूल कोसळल्यामुळे डाव्या आघाडीने ममता सरकारच्या विरोधात तोफा डागल्या आणि लगेचच पुलाचे काम डाव्या आघाडीच्या सत्ताकाळात मंजूर केले गेले म्हणून तेच जबाबदार असा प्रत्त्यारोप ममतांनी केला. याबाबत त्यांनी केलेले प्रतिपादन तर मोठे औरच म्हणावे लागेल. संबंधित ठेकेदाराला सरकारने वारंवार स्मरणपत्रे देऊनदेखील त्याने शेवटपर्यंत पुलाचा आराखडा सादर केला नाही. सरकारला आणि विशेषत: ममतांनाही जो जुमानायला तयार नाही त्याला इतके दिवस त्यांनी जे सहन केले त्याची किंमत अकारण काही निष्पापांना मात्र चुकवावी लागली.