शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

‘देवाची करणी’?

By admin | Updated: April 2, 2016 03:52 IST

धनपिपासू लोक किती संवेदनाहीन, निष्ठुर आणि उलट्या काळजाचे असतात याचे यापरते अन्य उदाहरण ते काय असू शकते? पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता शहराच्या उत्तरेकडील

धनपिपासू लोक किती संवेदनाहीन, निष्ठुर आणि उलट्या काळजाचे असतात याचे यापरते अन्य उदाहरण ते काय असू शकते? पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता शहराच्या उत्तरेकडील भागात अपूर्णावस्थेत असलेला एक उड्डाण पूल गुरुवारी भर माध्यान्ही कोसळला आणि त्यात जबर मनुष्य तसेच वित्त हानी झाली. अत्यंत गजबजलेल्या भागात या पुलाचे काम सुरु असल्याने पुलाच्या कोसळलेल्या बांधकामाच्या ढिगाऱ्याखाली काही बसगाड्या, मोटारी आणि मालमोटारी दबल्या गेल्या व काही लोक अक्षरश: चिरडले जाऊन अनेकजण जखमी झाले. परिणामी दोन्ही प्रकारच्या हानीचा निश्चित अंदाज लगेचच येऊ शकलेला नाही. २००९साली सुरु झालेले या पुलाचे बांधकाम सात वर्षे झाली तरी अजून अपूर्णच असावे हे त्या राज्यातील आधीच्या डाव्या आघाडीच्या आणि नंतर सत्तेत आलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस सरकारच्या कार्यक्षमतेचे द्योतकच मानले पाहिजे. आंध्र प्रदेशातील कोणा बांधकाम कंपनीला या पुलाचे काम देण्यात आले होते. साहजिकच अर्धवट अवस्थेतील पूल कोसळणे ही प्राय: त्याच कंपनीची जबाबदारी असताना तिने तत्काळ आपली जबाबदारी झटकून टाकताना जे काही घडले ते ‘अ‍ॅक्ट आॅफ गॉड’ म्हणजे देवाची करणी असल्याचे निर्लज्जपणे सांगून टाकले. ‘ओ माय गॉड’ या सिनेमामधून संबंधित ठेकेदार इतके बरीक शिकून गेला! पण केवळ या ठेकेदाराला एकट्याला तरी दोष का द्यायचा? या दुर्घटनेवरुन लगेच जी राजकीय सुंदोपसुंदी सुरु झाली ती तरी कोणती संवदनशीलतेचा प्रत्यय आणून देणारी आहे? ममतांच्या कारकिर्दीत पूल कोसळल्यामुळे डाव्या आघाडीने ममता सरकारच्या विरोधात तोफा डागल्या आणि लगेचच पुलाचे काम डाव्या आघाडीच्या सत्ताकाळात मंजूर केले गेले म्हणून तेच जबाबदार असा प्रत्त्यारोप ममतांनी केला. याबाबत त्यांनी केलेले प्रतिपादन तर मोठे औरच म्हणावे लागेल. संबंधित ठेकेदाराला सरकारने वारंवार स्मरणपत्रे देऊनदेखील त्याने शेवटपर्यंत पुलाचा आराखडा सादर केला नाही. सरकारला आणि विशेषत: ममतांनाही जो जुमानायला तयार नाही त्याला इतके दिवस त्यांनी जे सहन केले त्याची किंमत अकारण काही निष्पापांना मात्र चुकवावी लागली.