शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

काश्मीरमधील बहुभाषा संमेलनाचे औचित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 06:31 IST

88 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३, ४, ५ एप्रिल २०१५ रोजी घुमान (पंजाब) येथे झाले.

88 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३, ४, ५ एप्रिल २०१५ रोजी घुमान (पंजाब) येथे झाले. त्या काळात ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त पंजाबी लेखक कवी स्व. गुरुदयाळ सिंग यांनी मराठी संमेलन पंजाबमध्ये होणे ही तर देश जोडण्याची पुन्हा सुरू झालेली प्रक्रिया आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली होती. हा देश अनेक भाषा, संस्कृती, तसेच जातीधर्मामध्ये विभागला गेला आहे़ त्याच्या विविधतेतील एकता हिच त्याची शक्ती आहे. म्हणूनच भाषा वाचविणे आणि भाषांचा समन्वय निर्माण करणे, ही भूमिका वेळोवेळी अनेक थोरामोठ्यांनी मांडली आहे. साने गुरुजींनी तर आंतरभारतीचे स्वप्न पाहिले होते तेही महाराष्टÑातून. त्यानंतरही गुलजार यांच्यापासून अनेक मान्यवरांनी बहुभाषा संमेलनाची कल्पना मांडली, त्यातूनच प्रतिवर्षी बहुभाषा संमेलन घेण्याचा निर्णय झाला. भाषा वाचवा याच्याऐवजी ती वाढवा, अशी भूमिका घेऊन भाषांचा परिघ अधिक विस्तारित नेण्याच्या उद्देशाने संस्थेकडून घुमान बहुभाषा संमेलन घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

मराठी भाषेचा पंजाबी आणि काश्मिरी भाषांच्या सहकार्याने भारतीय भाषांसाठी पुढाकार अशी या संमेलनाची संकल्पना आहे. प्रत्येकाने आपल्या भाषाचा अभिमान बाळगून इतर भाषांचा सन्मान केला पाहिजे. कारण आजही भारताला जोडणारी एकच अशी प्रभावी भाषा नाही. आपल्याला पुन्हा-पुन्हा इंग्रजीचाच आधार घ्यावा लागतो. या पार्श्वभूमीवर इंग्रजीला विरोध न करता, भारतीय भाषांची जोडणी होणे मात्र आवश्यक आहे. या भावनेतून यंदाचे संमेलन निसर्गाने लटलेल्या कवी, लेखक आणि कलाकारांना नेहमीच भुरळ घालणाऱ्या काश्मीरमध्ये होत आहे.

पहिले घुमान बहुभाषा संमेलन पंजाबमध्ये झाले. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. ‘कधी-कधी छोट्या वनस्पतीला टिकविण्यासाठी संपूर्ण जंगल टिकण्याची आवश्यकता असते.’ ही भूमिका भाषातज्ज्ञ डॉ.गणेश देवी मांडत असतात. त्यांनी २०१० साली ‘भाषासंगम’ या नावाने अशाच धर्तीवर एक संमेलन बडोदा येथे घेतले होते़ भाषा टिकल्या तरच देशही सामर्थ्यवान, हाच विचार या संमेलनामागचाही असल्यामुळे भाषांच्या संदर्भात भरीव काम ज्या डॉ.गणेश देवी यांनी केले आहे, त्यांनाच या संमेलनाचे अध्यक्ष होण्याची विनंती केली आणि त्यांनी ती मान्यही केली. त्यांच्याच नेतृत्वाखाली ही वारी पुढे निघाली आहे. आता पुढचे संमेलन काश्मीरमध्ये होत आहे. ज्या काश्मीरने कधी काळी भारताचे बौद्धिक नेतृत्व केले होते, तो आज मात्र दहशतवादाने होरपळत आहे. अशा काळात सरहद संस्थेने हे बहुभाषा संमेलन काश्मीरमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्येष्ठ साहित्यिक राजन खान, प्रशांत तळणीकर, संजय सोनवणी, नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते अरुण नेवासकर, तसेच काश्मीरमधील अनेक महत्त्वाच्या साहित्यिकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. सत्यव्रत शास्त्री, प्रोफेसर रहमान राही, तसेच पद्मश्री सुरजित पाथर, नसीम शफाई यासारखे अनेक साहित्यिक, महत्त्वाचे प्रकाशक आणि नामवंत कवी, तसेच कलावंत या संमेलनात सहभागी होणार आहेत. जम्मू-काश्मीर कल्चरल अकादमी आणि सांस्कृतिक परिषद यांसारख्या संस्थांनाही यात निमंत्रित केले आहे. विविध भाषांतील ३०० ते ४०० लोक यात सहभागी होतील. डॉ. गणेश देवी, तसेच प्राणकिशोर कौल यांच्या मार्गदर्शनासाठी या काश्मीरमधील संमेलनाचे नियोजन सुरू आहे. काश्मीरमध्ये पर्यटकही जात नसताना अथवा दररोज हिंसाचाराच्या घटना घडत असताना या संमेलनाचे प्रयोजन काय, असाही प्रश्न विचारला गेला. यापूर्वीही दोन वेळा येथील हिंसाचाराच्या घटनांमुळे हे संमेलन रद्द करण्यात आले होते. मात्र, महाराष्टÑातून आलेल्या लेखक आणि साहित्यिकांनी व्यक्त केली. म्हणूनच या देशाच्या भाषिक ऐक्याची चळवळ आपण विद्येची देवता असे जिचे वर्णन करतो, त्या सरस्वती शारदापीठापासून संस्कृत भाषेचे व्याकरणकार पाणिनी ऋषी, इतिहासकार पंडित कल्हण, तसेच आचार्य अभिनव गुप्त यांच्यामार्फत, संत कवयित्री कल्लेश्वरी, हब्बा खातून आणि गुलाम सय्यद अहमद महजून हे मोतीलाल साकी आणि दिनानाथ साकी यांच्यापर्यंत, काश्मीरची स्वत:ची मोठी अशी साहित्यिक आणि भाषिक परंपरा आहे, जी ऋषिमुनींची आणि पार्वतीची भूमी आहे, असा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये सापडतो, त्या काश्मीरमध्ये हे बहुभाषा संमेलन होणे म्हणजे, महाराष्टÑ आणि काश्मीरच्या ऐतिहासिक संबंधांना उजाळा मिळण्यासारखेच आहे.फाळणीच्या काळात देश धार्मिक विद्वेषामध्ये जळत असताना, काश्मीर खोऱ्यात मात्र एकही दंगल अथवा हत्याकांड झाले नाही. तेव्हा महात्मा गांधीना अंधारामध्ये आशेचा किरण केवळ काश्मीरमध्येच दिसत होता. दुर्दैवाने भविष्यात शत्रूच्या डावपेचांना यश मिळाले आणि याच काश्मीर दहशवादाच्या गर्तेत सापडले आहे. अशा काळात तेथील अंधार दूर करण्यासाठी देशभरातील विविध भाषांच्या लोकांनी तिथे यावे, काश्मिरी भाषा, तिचे उर्वरित भारताशी संबंध, काश्मीरच्या प्राचीन परंपरा याबरोबरच भारतीय भाषांच्या भवितव्यावर चर्चा व्हावी, हा संमेलनाचा उद्देश आहे. दारा शुकोह ज्या ठिकाणी विविध धर्म आणि विचारांच्या लोकांना बोलावून संवाद साधत असत, त्या परिमहलमध्ये काश्मिरी साहित्यिक आणि उर्वरित भारतातील साहित्यिकांचा संगम कदाचित काश्मीरमधील भविष्यातील शांततेत नांदी ठरावी, अशी आशा.- संजय नहार,संस्थापक अध्यक्ष सरहद.