शहरं
Join us  
Trending Stories
1
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
2
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
3
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
4
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
5
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
6
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
7
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
8
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
9
VIDEO: कुछ तुफानी हो जाए ! टायरच्या ढिगावर उभा राहिला तरुण, फुल स्पीडमध्ये आली कार अन्...
10
मीडिया, कला आणि खेळाचा त्रिवेणी संगम: 'जय हिंद'च्या ‘कॉन्स्टीलेशन २५-२६’ ला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
11
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
12
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
13
Marnus Labuschagne : पिंक बॉल टेस्टमधील बेस्ट बॅटर! मार्नस लाबुशेनची विश्वविक्रमी कामगिरी
14
Bigg Boss 19: बॉलिवूड अभिनेत्रीचा प्रणित मोरेला जाहीर पाठिंबा; नेटकरी म्हणाले, 'मराठी कार्ड...'
15
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
16
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
17
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
18
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
19
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
20
शत्रूच्या घरात घुसून हेरगिरी करण्याचे मिशन, रणवीर सिंहचा 'धुरंधर' नक्की कसा आहे? वाचा रिव्ह्यू
Daily Top 2Weekly Top 5

केवळ अन्यायातून झालीत का बंड ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 16:49 IST

मिलिंद कुलकर्णी महाराष्टÑातील विधानसभा निवडणुकीत सर्वत्र बंडखोरांचे पेव फुटले आहे. अन्यायाचे गाणे गात इच्छुक उमेदवारांनी बंडाचे झेंडे उभारले आहेत. ...

मिलिंद कुलकर्णीमहाराष्टÑातील विधानसभा निवडणुकीत सर्वत्र बंडखोरांचे पेव फुटले आहे. अन्यायाचे गाणे गात इच्छुक उमेदवारांनी बंडाचे झेंडे उभारले आहेत. पण खरोखरच अन्याय झालेला आहे का? पक्षाने यापूर्वी संधी दिलेली नव्हती का? पक्षहित लक्षात घेऊन दोन पावले मागे घेण्याची मानसिकता का उरलेली नाही? अगदी विचारसरणीच्या विरुध्द जाऊन दुसऱ्या पक्षाचा झेंडा हाती घेतल्याचे प्रकारही घडले आहेत. काही ठिकाणी पक्षशिस्त, श्रेष्ठींचे आदेश, आश्वासन यावर भिस्त ठेवत निष्ठावंतांनी माघार घेतल्याची उदाहरणेदेखील आहेत. पण यंदा बंडखोरीचा विक्रम झाला, असेच म्हणावे लागेल. इतिहासात डोकावून पाहिले तर बंड अनेकदा झाले. ते गाजलेसुध्दा. पण यंदा त्याचे पेव फुटले, त्यामागील कारणांविषयी चर्चा करायला हवी. पहिले कारण जे जाणवते ते म्हणजे, २०१४ मध्ये सर्वच राजकीय पक्ष हे स्वबळावर निवडणूक लढवत होते. त्यामुळे उमेदवारीसाठी अनेकांना संधी मिळाली. त्यापैकी मोजके निवडून आले, पण पराभूतांमागे विधानसभा निवडणूक लढविण्याचा अनुभव जमा झाला. पाच वर्षे भाजप-शिवसेना युतीची सत्ता असल्याने युतीतील पराभूत आणि अन्य कार्यकर्त्यांनाही ‘आमदारकी’चे वेध लागले. लोकसभा निवडणुकीत काही उमेदवार अल्पतयारीवर जिंकून आले. त्यामुळे काही उमेदवारांच्या आशा जागृत झाल्या.दुसरे कारण म्हणजे, राजकीय पक्षांना सत्ता संपादनासाठी दुसºया पक्षातील तुल्यबळ उमेदवार ‘आपलासा’ करुन हमखास विजय हवा आहे. त्यामुळे गेला महिनाभर ‘आयाराम-गयाराम’ नाटक गाजले. स्वाभाविकपणे पाच वर्षे मतदारसंघाची मशागत करणाºया इच्छुक उमेदवारांच्या इच्छेवर पाणी फिरले. त्याला बंडखोरीसाठी पर्याय उरला नाही. पाच वर्षे कुणीही थांबायला तयार नाही. त्यामुळे ‘श्रध्दा, सबुरी’ ही तत्त्वे कागदावर राहिली.खान्देशातील बंडखोरीचा विचार केला तर सर्वच पक्षांमध्ये बंडखोरीची लागण झालेली आहे. भाजपचे बंडखोर शिवसेनेच्या उमेदवाराविरुध्द उभे असल्याचा प्रकार चोपडा, जळगाव ग्रामीण, पाचोरा व अक्कलकुवा, भाजपविरुध्द शिवसेनेचे बंडखोर शिंदखेडा आणि मुक्ताईनगर, काँग्रेसविरुध्द राष्टÑवादीचे बंडखोर नवापूर, भाजप विरुध्द भाजप अशी लढत शिरपूर व साक्री, शिवसेना विरुध्द शिवसेना अशी जळगाव ग्रामीण, राष्टÑवादी विरुध्द राष्टÑवादी अशी लढत चोपडा व जळगाव ग्रामीणया मतदारसंघात होत आहे.प्रभाकर सोनवणे (चोपडा), चंद्रशेखर अत्तरदे (जळगाव ग्रामीण), अमोल शिंदे (पाचोरा), नागेश पाडवी (अक्कलकुवा) हे भाजपचे चार बंडखोर शिवसेनेविरुध्द बंडाचे निशाण घेऊन उभे आहेत.शिवसेनेचे शानाभाऊ कोळी (शिंदखेडा) व चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर) यांनी भाजपविरुध्द दंड थोपटले आहेत.राष्टÑवादीला अलिकडे सोडचिठ्ठी दिलेले शरद गावीत यांनी नवापुरात काँग्रेसच्या उमेदवाराला आव्हान दिले आहे.भाजपात अंतर्गत बंडखोरी करणाऱ्यांमध्ये डॉ.जितेंद्र ठाकूर (शिरपूर) व मंजुळा गावीत (साक्री) यांचा समावेश आहे. जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेनेच्या लकी टेलर यांनी सहकार राज्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे.माधुरी किशोर पाटील (चोपडा) व रवी देशमुख (जळगाव ग्रामीण) यांनी राष्टÑवादीच्या अधिकृत उमेदवाराविरुध्द बंड केले आहे.सर्वच पक्षांचे परस्परांविरुध्द आणि अंतर्गत बंडखोरी झाली असल्याने कोण कुणाला बोल लावू शकत नाही. मतदारसंघ निहाय परिस्थिती वेगवेगळी आहे. परंतु, यात चुका पक्ष आणि उमेदवार अशा दोघांच्या आहेत. पाच वर्षे मेहनत करणाºया उमेदवाराला ऐनवेळी उमेदवारी नाकारुन ‘आयारामा’ला संधी देणे चुकीचे आहे. तसेच पक्षाने वेळोवेळी संधी दिली, पदे दिली, मानसन्मान दिला, असे असताना एकदा थांबायला सांगितले तर पक्षादेश मोठ्या मनाने मान्य करायला हरकत काय आहे. प्रथम देश, नंतर पक्ष आणि शेवटी स्वत: असे तत्त्व सगळेच प्रमाण मानतात, असे नाही. त्यामुळे बंड घडून येतात. काही यशस्वी ठरतात तर काही फसतात. फसलेल्यांना उगाच ‘तोतयांचे बंड’असे म्हणून हिणवले जाते, ते वेगळेच. या बंडाचे काय होते, हे २४ तारखेला कळेल. 

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव