शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
5
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
6
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
7
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
8
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
9
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
10
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
11
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
12
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
13
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
14
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
15
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
16
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
17
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
18
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
19
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
20
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!

श्रीगणेशा तर झाला

By admin | Updated: December 15, 2015 03:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या अपेक्षेने ‘स्वर्ण भारत’ या नावाने ‘गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम’ची घोषणा केली होती. भारतीय स्त्रियांकडे सौभाग्य अलंकारांच्या रुपात आणि देशातील

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या अपेक्षेने ‘स्वर्ण भारत’ या नावाने ‘गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम’ची घोषणा केली होती. भारतीय स्त्रियांकडे सौभाग्य अलंकारांच्या रुपात आणि देशातील विविध मंदिरांकडे प्रचंड मोठा सुवर्ण साठा पडून आहे. काही वर्षांपूर्वी दक्षिणेतील पद्मनाभ स्वामी मंदिराच्या खजिन्याची मोजदाद झाली, तेव्हा समोर आलेल्या माहितीने प्रत्येकाचेच डोळे दिपले होते. मोदींनी ‘स्वर्ण भारत’ची घोषणा केली तेव्हा त्यांची नजर या दोन्ही प्रकारच्या सुवर्ण साठ्यांंवर होती. निरुपयोगी स्वरुपात पडून असलेले हे सुवर्ण भंडार देशाच्या कामी यावे, ही त्यांची अपेक्षा होती. त्यांच्या आणि देशाच्याही दुर्दैवाने ही अपेक्षा आतापर्यंत तरी पूर्ण झालेली नाही. त्याला सोन्याबाबतची वैशिष्ट्यपूर्ण भारतीय मानसिकताच कारणीभूत आहे. परंतु आता साक्षात गणरायाच मोदी आणि सरकारच्या मदतीला धावून आला आहे. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराने आपल्या खजिन्यातील एकूण १६५ किलो सोन्यापैकी ४० किलो सोने मोदींच्या योजनेत गुंतविण्याचा निर्णय घेतला आहे. या मंदिराने पुढाकार घेतल्याने आता इतर श्रीमंत देवस्थानांनाही प्रेरणा मिळेल आणि तीदेखील मोदींच्या सहाय्याला धावतील अशी अपेक्षा बाळगता येऊ शकते. जगातील सर्वात श्रीमंत हिंदू देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरानेही या सरकारी योजनेत सोने गुंतविण्याचे सूतोवाच केले आहे. पण तिरुपती देवस्थानच्या खालोखालच श्रीमंत असलेल्या शिर्डीच्या साईबाबा मंदिर देवस्थानने मात्र अद्याप तसा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट करुन टाकले आहे. एका अंदाजानुसार भारतीयांकडे सुमारे १७ हजार टन, तर विविध मंदिरांकडे सुमारे तीन हजार टन सुवर्ण साठा पडून आहे. जगातील विविध देशांच्या सरकारांकडील अधिकृत सुवर्ण साठ्यांपैकी सर्वात मोठा, म्हणजे ८,१३३ टन साठा अमेरिकेकडे आहे. यावरून भारतीय लोक आणि हिंदू देवस्थाने किती श्रीमंत आहेत, याची कल्पना यावी. भारतीयांचा सोन्याचा हव्यास पूर्ण करण्यासाठी दरवर्षी सुमारे एक हजार टन सोने आयात करावे लागते. देवस्थानांनी मोदींच्या योजनेस चांगला प्रतिसाद दिल्यास ही आयात सुमारे एक-चतुर्थांश कमी होऊ शकते आणि मोठ्या प्रमाणात परकीय चलन वाचू शकते. सिद्धिविनायक मंदिराने श्रीगणेशा तर उत्तम केला आहे, शेवटही उत्तमच होईल अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही.