शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
2
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
3
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
4
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
5
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
6
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
7
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
8
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
10
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
11
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
12
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
13
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
14
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
15
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
16
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
17
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
18
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
19
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
20
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला

श्रीगणेशा तर झाला

By admin | Updated: December 15, 2015 03:47 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या अपेक्षेने ‘स्वर्ण भारत’ या नावाने ‘गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम’ची घोषणा केली होती. भारतीय स्त्रियांकडे सौभाग्य अलंकारांच्या रुपात आणि देशातील

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोठ्या अपेक्षेने ‘स्वर्ण भारत’ या नावाने ‘गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम’ची घोषणा केली होती. भारतीय स्त्रियांकडे सौभाग्य अलंकारांच्या रुपात आणि देशातील विविध मंदिरांकडे प्रचंड मोठा सुवर्ण साठा पडून आहे. काही वर्षांपूर्वी दक्षिणेतील पद्मनाभ स्वामी मंदिराच्या खजिन्याची मोजदाद झाली, तेव्हा समोर आलेल्या माहितीने प्रत्येकाचेच डोळे दिपले होते. मोदींनी ‘स्वर्ण भारत’ची घोषणा केली तेव्हा त्यांची नजर या दोन्ही प्रकारच्या सुवर्ण साठ्यांंवर होती. निरुपयोगी स्वरुपात पडून असलेले हे सुवर्ण भंडार देशाच्या कामी यावे, ही त्यांची अपेक्षा होती. त्यांच्या आणि देशाच्याही दुर्दैवाने ही अपेक्षा आतापर्यंत तरी पूर्ण झालेली नाही. त्याला सोन्याबाबतची वैशिष्ट्यपूर्ण भारतीय मानसिकताच कारणीभूत आहे. परंतु आता साक्षात गणरायाच मोदी आणि सरकारच्या मदतीला धावून आला आहे. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराने आपल्या खजिन्यातील एकूण १६५ किलो सोन्यापैकी ४० किलो सोने मोदींच्या योजनेत गुंतविण्याचा निर्णय घेतला आहे. या मंदिराने पुढाकार घेतल्याने आता इतर श्रीमंत देवस्थानांनाही प्रेरणा मिळेल आणि तीदेखील मोदींच्या सहाय्याला धावतील अशी अपेक्षा बाळगता येऊ शकते. जगातील सर्वात श्रीमंत हिंदू देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या तिरुपती बालाजी मंदिरानेही या सरकारी योजनेत सोने गुंतविण्याचे सूतोवाच केले आहे. पण तिरुपती देवस्थानच्या खालोखालच श्रीमंत असलेल्या शिर्डीच्या साईबाबा मंदिर देवस्थानने मात्र अद्याप तसा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट करुन टाकले आहे. एका अंदाजानुसार भारतीयांकडे सुमारे १७ हजार टन, तर विविध मंदिरांकडे सुमारे तीन हजार टन सुवर्ण साठा पडून आहे. जगातील विविध देशांच्या सरकारांकडील अधिकृत सुवर्ण साठ्यांपैकी सर्वात मोठा, म्हणजे ८,१३३ टन साठा अमेरिकेकडे आहे. यावरून भारतीय लोक आणि हिंदू देवस्थाने किती श्रीमंत आहेत, याची कल्पना यावी. भारतीयांचा सोन्याचा हव्यास पूर्ण करण्यासाठी दरवर्षी सुमारे एक हजार टन सोने आयात करावे लागते. देवस्थानांनी मोदींच्या योजनेस चांगला प्रतिसाद दिल्यास ही आयात सुमारे एक-चतुर्थांश कमी होऊ शकते आणि मोठ्या प्रमाणात परकीय चलन वाचू शकते. सिद्धिविनायक मंदिराने श्रीगणेशा तर उत्तम केला आहे, शेवटही उत्तमच होईल अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही.