शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

आश्वासक मोदींनी दाखवलेलं विकासचित्र प्रत्यक्षात आणण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 05:40 IST

प्रचारकाळात गढूळ झालेल्या राजकीय वातावरणाची पडछाया पडू न देता नरेंद्र मोदी यांनी नवे आश्वासक चित्र एनडीएच्या बैठकीत रंगविले.

प्रचारकाळात गढूळ झालेल्या राजकीय वातावरणाची पडछाया पडू न देता नरेंद्र मोदी यांनी नवे आश्वासक चित्र एनडीएच्या बैठकीत रंगविले. सर्व वर्गांना विश्वास देण्याचे त्यांचे वक्तव्य ही त्यांच्या पुढील वाटचालीची चुणूक मानायला हवी.‘सब का साथ, सब का विकास’ या घोषणेला ‘सब का विश्वास’ अशी नवी जोड देणारे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीतील भाषण आजवरच्या पठडीपेक्षा वेगळे, नव्या भारताची दिशा दाखवणारे होते. भाजपसह एनडीएला ज्यांनी मते दिली, त्यांचे आभार मानतानाच ज्यांनी ती दिलेली नाहीत, त्यांचाही विश्वास जिंकण्याचे त्यांचे आवाहन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात गढूळ झालेल्या राजकीय वातावरणात दिलासा देणारे आहे. या विजयाने जबाबदारी वाढली आहे, असे सांगताना मतांसाठी- राजकीय स्वार्थासाठी जात, पात, पंथ या आधारे समाजात फूट पाडणाऱ्यांना त्यांनी दिलेला इशारा हा केवळ विरोधकांनाच नव्हे, तर भावनेच्या भरात उन्माद निर्माण करणाºया प्रत्येकालाच होता. त्यामुळेच अल्पसंख्याक अणि गरिबांच्या नावे राजकारण करून त्या वर्गाचा मतपेढी म्हणून वापर करणाऱ्यांनाही त्यांनी जाताजाता सहजपणे कानपिचक्या दिल्या. या सोहळ््यात निवडणुकीतील विजयाचे उन्मादी दर्शन न घडवता, पक्षातील ज्येष्ठांचा मान राखण्याचे दाखविलेले औचित्य अनेकांना सुखावणारे ठरले. या निवडणुकीत भाजपसोबत असलेल्या घटक पक्षांना व्यासपीठावर मानाचे स्थान देत सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे, आदराचे आणि नम्रतेचे दर्शनही या वेळी घडले. वस्तुत: विरोधी पक्षांची उडालेली दाणादाण, प्रभावी विरोधक न उरणे आणि एका अर्थाने संपूर्ण देशपातळीवरील पक्ष अशी भाजपला मिळालेली मान्यता अशी पार्श्वभूमी असूनही विरोधकांवर टीकेची झोड न उठवता उलट सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या राजकारणाचा नवा मंत्र त्यांनी या वेळी दिला. तुमच्या प्रत्येक निर्णयाचा समाजाच्या शेवटच्या घटकावर काय परिणाम होईल याचा विचार करा; मग तुमचे राजकारण समाजकारण होईल, त्याला सेवाभावी वृत्तीची जोड मिळेल, या आशयाच्या महात्मा गांधींच्या विचारांचा उल्लेख असो, की संविधानाचा गौरव असो त्यातून आपली पुढील वाटचाल नेमकी कशी असेल याची चुणूक नरेंद्र मोदींनी दाखवली. नवमतदार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या महिला मतदारांनी भाजपसह एनडीएला भरभरून मते दिली आहेत त्यांचे प्रतिबिंब मोदींच्या भाषणात न पडते, तरच नवल. विकासात त्या वर्गाला केंद्रस्थानी ठेवण्याचे त्यांचे आश्वासन सुखावणारे आहे.

देशातील मतदार सत्ताभाव नव्हे, तर सेवाभाव स्वीकारतो, हे सांगताना त्यांनी गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या साधेपणाचा संदर्भ दिला. यंदाचे सरकार गरिबांनी निवडून दिले आहे. त्यामुळे व्हीआयपी संस्कृती टाळण्याचा संदेश नव्या खासदारांना देताना त्यांना प्रसिद्धीच्या मोहापासून दूर राहण्याचे खडे बोलही सुनावले. त्यासाठी व्यासपीठावर बसलेले ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्या शिकवणुकीचा दाखला दिला. भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांनी, वेगवेगळ््या पक्षांतील किमान चार पिढ्यांनी जी कष्टांची पेरणी केली; त्यातूनच सध्याचे यश आपण पाहतो आहोत. त्यामुळे या यशाचा अहंकार बाळगू नका, हा त्यांचा सल्ला पूर्वीपासून पक्षासाठी झटणाºया, घटक पक्ष जोडण्यासाठी प्रयत्न करणाºया नेत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा होता. निवडणुकीतील यशामागचे सूत्र उलगडणारा होता. हे यश सहजसाध्य नव्हते हे बिंबवणारा होता. त्याची जाण ठेवण्याचे आवाहनही त्यांनी नव्याने निवडून आलेल्या खासदारांना केले.
मंत्रिमंडळातील सहभागावरून खुसखुशीत शैलीत दिलेल्या कानपिचक्या असोत, सत्तेभोवती गोळा होणाºया दलालांना बाजूला ठेवण्याचा मंत्र असो, की नवा भारत घडविण्याच्या स्वप्नाचा पट असो; असे अनेक कंगोरे मोदींच्या या भाषणाला होते. आधीच्या आक्रमकतेला मुरड घालत सर्वसमावेशकतेवर दिलेला भर हे त्यांच्या भाषणाचे सार म्हणावे लागेल. प्रचारादरम्यानची राजकीय कटुता दूर सारत त्यांनी येत्या पाच वर्षांसाठी देशाला दाखविलेल्या आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या चित्राचे रंग या बैठकीत भरले. हे विकासचित्र प्रत्यक्षात आणण्याची कास एनडीएच्या खासदारांनी धरली, तर देश नक्कीच विकासाच्या नव्या वळणावर येऊ शकेल, असे आश्वासक वातावरण यातून निर्माण झाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी