शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

आश्वासक मोदींनी दाखवलेलं विकासचित्र प्रत्यक्षात आणण्याची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 05:40 IST

प्रचारकाळात गढूळ झालेल्या राजकीय वातावरणाची पडछाया पडू न देता नरेंद्र मोदी यांनी नवे आश्वासक चित्र एनडीएच्या बैठकीत रंगविले.

प्रचारकाळात गढूळ झालेल्या राजकीय वातावरणाची पडछाया पडू न देता नरेंद्र मोदी यांनी नवे आश्वासक चित्र एनडीएच्या बैठकीत रंगविले. सर्व वर्गांना विश्वास देण्याचे त्यांचे वक्तव्य ही त्यांच्या पुढील वाटचालीची चुणूक मानायला हवी.‘सब का साथ, सब का विकास’ या घोषणेला ‘सब का विश्वास’ अशी नवी जोड देणारे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीतील भाषण आजवरच्या पठडीपेक्षा वेगळे, नव्या भारताची दिशा दाखवणारे होते. भाजपसह एनडीएला ज्यांनी मते दिली, त्यांचे आभार मानतानाच ज्यांनी ती दिलेली नाहीत, त्यांचाही विश्वास जिंकण्याचे त्यांचे आवाहन लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात गढूळ झालेल्या राजकीय वातावरणात दिलासा देणारे आहे. या विजयाने जबाबदारी वाढली आहे, असे सांगताना मतांसाठी- राजकीय स्वार्थासाठी जात, पात, पंथ या आधारे समाजात फूट पाडणाऱ्यांना त्यांनी दिलेला इशारा हा केवळ विरोधकांनाच नव्हे, तर भावनेच्या भरात उन्माद निर्माण करणाºया प्रत्येकालाच होता. त्यामुळेच अल्पसंख्याक अणि गरिबांच्या नावे राजकारण करून त्या वर्गाचा मतपेढी म्हणून वापर करणाऱ्यांनाही त्यांनी जाताजाता सहजपणे कानपिचक्या दिल्या. या सोहळ््यात निवडणुकीतील विजयाचे उन्मादी दर्शन न घडवता, पक्षातील ज्येष्ठांचा मान राखण्याचे दाखविलेले औचित्य अनेकांना सुखावणारे ठरले. या निवडणुकीत भाजपसोबत असलेल्या घटक पक्षांना व्यासपीठावर मानाचे स्थान देत सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे, आदराचे आणि नम्रतेचे दर्शनही या वेळी घडले. वस्तुत: विरोधी पक्षांची उडालेली दाणादाण, प्रभावी विरोधक न उरणे आणि एका अर्थाने संपूर्ण देशपातळीवरील पक्ष अशी भाजपला मिळालेली मान्यता अशी पार्श्वभूमी असूनही विरोधकांवर टीकेची झोड न उठवता उलट सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या राजकारणाचा नवा मंत्र त्यांनी या वेळी दिला. तुमच्या प्रत्येक निर्णयाचा समाजाच्या शेवटच्या घटकावर काय परिणाम होईल याचा विचार करा; मग तुमचे राजकारण समाजकारण होईल, त्याला सेवाभावी वृत्तीची जोड मिळेल, या आशयाच्या महात्मा गांधींच्या विचारांचा उल्लेख असो, की संविधानाचा गौरव असो त्यातून आपली पुढील वाटचाल नेमकी कशी असेल याची चुणूक नरेंद्र मोदींनी दाखवली. नवमतदार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या महिला मतदारांनी भाजपसह एनडीएला भरभरून मते दिली आहेत त्यांचे प्रतिबिंब मोदींच्या भाषणात न पडते, तरच नवल. विकासात त्या वर्गाला केंद्रस्थानी ठेवण्याचे त्यांचे आश्वासन सुखावणारे आहे.

देशातील मतदार सत्ताभाव नव्हे, तर सेवाभाव स्वीकारतो, हे सांगताना त्यांनी गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या साधेपणाचा संदर्भ दिला. यंदाचे सरकार गरिबांनी निवडून दिले आहे. त्यामुळे व्हीआयपी संस्कृती टाळण्याचा संदेश नव्या खासदारांना देताना त्यांना प्रसिद्धीच्या मोहापासून दूर राहण्याचे खडे बोलही सुनावले. त्यासाठी व्यासपीठावर बसलेले ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांच्या शिकवणुकीचा दाखला दिला. भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांनी, वेगवेगळ््या पक्षांतील किमान चार पिढ्यांनी जी कष्टांची पेरणी केली; त्यातूनच सध्याचे यश आपण पाहतो आहोत. त्यामुळे या यशाचा अहंकार बाळगू नका, हा त्यांचा सल्ला पूर्वीपासून पक्षासाठी झटणाºया, घटक पक्ष जोडण्यासाठी प्रयत्न करणाºया नेत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा होता. निवडणुकीतील यशामागचे सूत्र उलगडणारा होता. हे यश सहजसाध्य नव्हते हे बिंबवणारा होता. त्याची जाण ठेवण्याचे आवाहनही त्यांनी नव्याने निवडून आलेल्या खासदारांना केले.
मंत्रिमंडळातील सहभागावरून खुसखुशीत शैलीत दिलेल्या कानपिचक्या असोत, सत्तेभोवती गोळा होणाºया दलालांना बाजूला ठेवण्याचा मंत्र असो, की नवा भारत घडविण्याच्या स्वप्नाचा पट असो; असे अनेक कंगोरे मोदींच्या या भाषणाला होते. आधीच्या आक्रमकतेला मुरड घालत सर्वसमावेशकतेवर दिलेला भर हे त्यांच्या भाषणाचे सार म्हणावे लागेल. प्रचारादरम्यानची राजकीय कटुता दूर सारत त्यांनी येत्या पाच वर्षांसाठी देशाला दाखविलेल्या आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या चित्राचे रंग या बैठकीत भरले. हे विकासचित्र प्रत्यक्षात आणण्याची कास एनडीएच्या खासदारांनी धरली, तर देश नक्कीच विकासाच्या नव्या वळणावर येऊ शकेल, असे आश्वासक वातावरण यातून निर्माण झाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी