शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

कायदा झाला म्हणजे डॉक्टरांवरचे हल्ले थांबतील, हा गैरसमज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2024 07:27 IST

डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातला ‘अविश्वास’ हे या प्रश्नाचे मूळ कारण असल्याचे ज्येष्ठ डॉक्टरच सांगतात. हा अविश्वास संपविण्यासाठीचे मार्ग शोधले पाहिजेत..

आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थांत शिवीगाळ किंवा शारीरिक हल्ले झाल्याच्या बातम्या देशाच्या या ना त्या भागातून सातत्याने येत असतात. कधी कधी तर संतप्त जमाव इस्पितळाच्या जाळपोळीवर उतरतो, महागड्या उपकरणांची मोडतोड करतो. अशा घटनांची नेमकी आकडेवारी उपलब्ध नसली तरी वर्षभरात हजारो घटना घडतात. सरकारी आणि खासगी दवाखान्यांतूनही अशा घटना घडत असतात. काही ठिकाणी डॉक्टर जिवानिशी जातात. बऱ्याचदा मालमत्तेचे नुकसान होते. 

ही हिंसा रोखण्यासाठी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, केरळ, पंजाब आणि दिल्लीसह २९ राज्यांनी गेल्या काही वर्षांत कायदेशीर पावले टाकली. डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी, वैद्यकीय आणि निमवैद्यकीय कर्मचारी तसेच या संस्थांत काम करणारे अन्य कर्मचारी यांना हा कायदा संरक्षण देतो. गुन्हेगाराला तुरुंगवास तसेच मोठ्या दंडाची तरतूद त्यात आहे. मात्र, या कायद्याला हल्लेखोरांनी भीक घातलेली दिसत नाही. मेडिको लिगल कृती गटाचे डॉक्टर नीरज नागपाल यांच्या मते  राज्यांच्या कायद्याच्या धर्तीवर केंद्राने कायदा केला तरी भारतीय दंडविधान संहितेत बदल केल्याशिवाय अपेक्षित परिणाम दिसणार नाहीत.  

इस्पितळात असे प्रकार घडू नयेत, यासाठी काय करता येईल, यासाठीच्या प्रयत्नात वैद्यकीय अधीक्षकांच्या मदतीने आम्ही काही निरीक्षणे नोंदवली. अत्यवस्थ रुग्णांना उपचार दिले जात असताना रुग्णाचा मृत्यू झाल्यास स्थिती चिघळते, हे लक्षात घेऊन अशा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, रुग्णाच्या दोनपेक्षा जास्त नातेवाइकांना येऊ देऊ नये, गरज पडल्यास स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी, असे सुचविण्यात आले. अंमलबजावणीतून परिस्थिती बरीच सुधारली. वैद्यकीय उपचारांसाठी इस्पितळात कैदी दाखल असणे, ही एक आव्हानात्मक परिस्थिती आहे. वैद्यकीय शिक्षण खात्यात सल्लागार म्हणून काम करताना, मी  जिल्हा न्यायालयांना जोडणाऱ्या व्हिडीओ लिंक तुरुंगात उपलब्ध करून दिल्या.  टेली मेडिसिन सुविधा उपलब्ध झाली. प्रत्येक तुरुंगात डॉक्टर असावा, अशी तरतूद आहे. अत्यावश्यक असेल तेव्हा बाहेरील तज्ज्ञ डाॅक्टर आणि कैद्यांची व्हिडीओंद्वारे गाठ घालून देण्यात आली. महाराष्ट्रातील सर्व कारागृहात २०२० पर्यंत ही पद्धत परिणामकारकरीत्या राबवली गेली. 

उपद्रवाचे दुसरे कारण म्हणजे मृताचे शवविच्छेदन न करण्याची नातेवाइकांची मागणी. (विविध यांत्रिक तपासण्यांच्या मदतीने) डिजिटल शवविच्छेदन केल्यास यातला तणाव टाळता येऊ शकतो. दिल्लीत एम्समध्ये तसे केले जाते. प्रगत देशातही तीच पद्धत आहे. त्यात गैरप्रकारांना वाव राहत नाही. खासगी इस्पितळात मृत रुग्णाचे नातेवाईक स्थानिक लोकप्रतिनिधीला मध्यस्थी घालून डॉक्टरवर  कारवाईसाठी दबाव आणतात. रुग्णाची हेळसांड झाली, भारंभार चाचण्या करायला लावल्या, मृतदेह ताब्यात दिला नाही, अशा त्यांच्या तक्रारी असतात. या स्थितीचा सामना करण्यासाठी अनेक डॉक्टरांनी शस्त्र परवान्याची मागणी केली आहे. या मार्गाने ही प्रकरणे हाताळणे सोपे नाही. तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळीच त्यात सुधारणा कराव्यात. प्रवेश तसेच बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र दरवाजे असावेत. तंत्रज्ञ, डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र दरवाजे ठेवावेत. तत्काळ संवादासाठी सुविधा सज्ज ठेवाव्यात.   

डॉक्टर आणि रुग्ण, त्यांच्यातला ‘अविश्वास’ हे या प्रश्नाचे मूळ कारण असल्याचे पुण्यातले ख्यातनाम ऑर्थोपेडिक डॉ. संचेती सांगतात. रुग्ण आणि त्याच्या नातेवाइकांना प्रत्येक टप्प्यावर योग्य ती माहिती दिल्याने गेल्या ५० वर्षांत अशा प्रकारचा एकही प्रसंग त्यांनी स्वत: अनुभवलेला नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांकडे रुग्णाप्रति सहानुभाव असला पाहिजे, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे यांचे मत आहे.

तालुका पातळीवर आणीबाणी व्यवस्थापन समिती स्थापन करण्याची सूचना इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे. डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, वकील, राजकीय नेते, पत्रकार यांचा समावेश समितीत असेल. आवश्यक तेथे समिती पोलिसांची मदत घेईल. अशा घटनांना अनावश्यक प्रसिद्धी टाळली जाईल. कायदा झाला म्हणजे हिंसा थांबेल अशी हमी देता येणार नाही. सर्व संबंधितांनी याबाबत सजग असले पाहिजे. डॉक्टरांनी रुग्णाबद्दल अधिक सहानुभाव दाखवून परिस्थिती योग्य प्रकारे समजावून सांगितली, तर विपरीत घटना टाळता येतील.

प्रवीण दीक्षित

निवृत्त पोलिस महासंचालक, महाराष्ट्र

टॅग्स :doctorडॉक्टर