शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
3
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
4
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
5
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
6
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
7
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
8
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
9
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
10
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
11
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
12
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
13
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
14
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
15
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
16
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
17
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
18
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
19
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
20
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

नरेंद्र मोदी-उद्धव ठाकरे यांच्या भेटीचा अन्वयार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 4:54 AM

आदित्यला मायेने जवळ घेऊन मोदींनी दिलेले संकेत महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाची भगवी दिशा ठरवणारे आहेत

- विकास झाडे, संपादक, लोकमत दिल्लीमुख्यमंत्री झाल्यानंतरची उद्धव ठाकरे यांची पहिलीच दिल्ली भेट ही महाविकास आघाडीमध्ये अस्थिरता निर्माण करणारी ठरली. ‘छोटा भाई-मोटा भाई’ करीत पंतप्रधान नरेद्र मोदी-ठाकरेंनी विधानसभेची एकत्र लढलेली निवडणूक आणि त्यानंतर खुर्चीसाठी दोघांचीही उफाळलेली परमोच्च भावना ही भाजप-सेनेला विभक्त करणारी ठरली. उद्धव ठाकरे टोकाची भूमिका घेऊन आपल्यापासून विभक्त होऊ शकतात, असे मोदी-शहांना स्वप्नातही वाटत नव्हते. परंतु शरद पवारांची संपूर्ण शक्ती पाठीशी असल्याने ठाकरेंना भाजपच्या विरोधात दंड थोपटता आले.

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार बसले. परंतु या तिन्ही पक्षांतील मंत्री एकही दिवस स्वस्थ झोपू शकले नाहीत. त्यांना म्हणे सरकार गडगडल्याची स्वप्ने पडतात. त्यांच्यात स्वस्थता तरी कशी असेल? शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीची विचारधाराच भिन्न आहे. शिवसेना प्रखर हिंदुत्ववादी आहे. वेगळे झाले असले तरी भाजप आणि शिवसेनेचे अद्यापही ३६ गुण जुळतात. किमान समान कार्यक्रमाअंतर्गत आमचे ३६ गुण जुळल्याचे भासवून महाविकास आघाडीने कसेबसे तीन महिने काढले आहेत. महाविकास आघाडीची ‘पत्रिका’ बनविणारे पंडित शरद पवार यांना या काळात ठाकरेंच्या काही निर्णयांवर नाराजी व्यक्त करावी लागली. सीएए, एनपीआरला पाठिंबा देणे पवारांना आवडले नाही. काँग्रेसही यावरून ठिणग्या उडवित असते. असे असले तरी महाविकास आघाडीचे सरकार संपूर्ण पाच वर्षे चालेल अशा बातम्या पवारांना द्याव्या लागतात. ओढूनताणून तयार करण्यात आलेली पत्रिका खोटी ठरू नये याचा प्रयत्न पवारांना करावाच लागेल. दुसरीकडे सर्वज्ञात असेही आहे की, पवार जे बोलतात, वास्तवात तसे होत नाही. यावरूनच महाविकास आघाडीच्या लग्नाची गोष्ट ही एक दंतकथा बनण्याच्या मार्गावर दिसते.
महिनाभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बरेच बदललेले दिसतात. केंद्राच्या काही धोरणांचे मुक्तपणे स्वागत करण्याचा त्यांचा आत्मविश्वास चिंतनीय आहे. शरद पवारांची जागा मोदी-शहांनी तर घेतली नाही ना, असेही ठाकरेंच्या कृतीवरून दिसून येते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला डोळे दाखविले तरी आपल्या खुर्चीला जराही धोका नाही याची खात्री त्यांना असावी. किमान समान कार्यक्रमाचा विषय नसलेल्या सीएएसारख्या बाबींची ते दिल्लीत पत्रकारांपुढे जोरकसपणे बाजू मांडतांना दिसतात. उलट शाहीनबागचे आंदोलन भडकविणाऱ्यांनी सीएएचा आधी अभ्यास करावा, असेही सूचवतात. खरे तर नाव न घेता त्यांनी काँग्रेसच्या मुस्काटात हाणण्याची हिंमत दाखवली. त्यांच्यात हे बळ आले कुठून? शुक्रवारी मोदींसोबत भेट झाल्यानंतरचे गुपित यात दडले नसेल कशावरून?
मुख्यमंत्री झाल्यानंतर मोदी हे ठाकरेंना पहिल्यांदाच ठरवून भेटले. मोदींनीही त्यांना तब्बल एक तास दिला. आदित्य ठाकरेही सोबत होते. या भेटीचे फोटो शिवसेनेने जारी केले आहेत. त्यात आदित्यला मोदींनी मायेने जवळ घेतले आहे. पंतप्रधान झाल्यापासून एकाही विरोधकास मोदींनी इतक्या प्रेमाने जवळ घेतल्याचे याआधी एकही छायाचित्र पुढे आले नाही. उद्धव ठाकरेंनी आपल्याला फटका मारला याचे जराही शल्य मोदींच्या चेहऱ्यावर नव्हते किंवा ठाकरे पिता-पुत्रास आपण मोदींपासून दूर आहोत असे त्यांच्या देहबोलीवरून जाणवले नाही. तासाभराच्या बैठकीत काय झाले? पत्रकारांच्या या प्रश्नांना उद्धव ठाकरेंनी बगल दिली. मोदींची भेट झाल्यानंतर त्यांना लगेच सोनिया गांधी यांना भेटायचे होेते. दोन्ही नेत्यांची भेट झाल्यानंतर ते पत्रकार परिषद घेऊ शकले असते. दोन्ही नेत्यांचे झालेले हितगुज त्यांना कथन करता आले असते. ठाकरेंनी मात्र ते टाळले. उलट सोनिया गांधी यांच्याकडे जाण्यापूर्वी, सीएएला विरोध करण्यापूर्वी अभ्यास करा, असा इशाराच काँग्रेसला दिला.
ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांची जराही पर्वा न करता मोदींचे कौतुक करण्याचा जो धडक कार्यक्रम सुरू केला आहे, यातच बरेच काही दडलेले दिसते. आता भाजपही सौम्य झाली आहे. शिवसेनेला सापत्न वागणूक दिली होती याचा साक्षात्कारही त्यांना झाला आहे. दोन्ही नेत्यांच्या धमन्यांमध्ये भगवी राष्ट्रभक्ती ठासून भरली आहे. अशात महाराष्ट्रासारखे मोठे राज्य दूर ठेवणे मोदी-शहांनाही परवडणारे नाही. उद्धव ठाकरेंच्या खुर्चीला जराही धक्का न लावता दिवंगत बाळासाहेब ठाकरेंचा सन्मान केल्याचे पुण्य भाजप पदरी पाडून घेऊ शकते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही मोदी-ठाकरे दीर्घ भेटीचा अन्वयार्थ लक्षात घ्यावा. आदित्यला मायेने जवळ घेऊन मोदींनी दिलेले संकेत महाराष्ट्राच्या पुढच्या राजकारणाची भगवी दिशा ठरवणारी आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीAditya Thackreyआदित्य ठाकरेcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNational Register of CitizensएनआरसीNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधी