शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

बौद्धिक दिवाळखोर

By admin | Updated: October 18, 2015 23:27 IST

संसदेने आणि देशातील निम्म्याहून अधिक राज्यांनी सर्वसंमतीने मंजूर केलेले आणि राष्ट्रपतींची मोहोर उमटलेले विधेयकही आम्ही घटनाबाह्य ठरवून खारीज करू शकतो

संसदेने आणि देशातील निम्म्याहून अधिक राज्यांनी सर्वसंमतीने मंजूर केलेले आणि राष्ट्रपतींची मोहोर उमटलेले विधेयकही आम्ही घटनाबाह्य ठरवून खारीज करू शकतो, हा सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी जाहीर केलेला निवाडा म्हणजे संसद आणि न्यायपालिका यांच्यातील श्रेष्ठत्वाच्या मुद्द्यावर न्यायालयाने स्वत:च स्वत:ला श्रेष्ठत्व बहाल करण्याचा एकतर्फी निवाडा असून, संसदेचे मोल जाणणाऱ्यांनी तरी किमान हा विषय गांभीर्याने आणि पक्षभेदाच्या पलीकडे जाऊन करणे अपेक्षित होते आणि आहे. पण काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांनी त्यातही राजकारण पाहताना विद्यमान केन्द्र सरकारवर तोंडसुख घेण्याची हौस भागवून घेऊन आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे दर्शन घडविले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्या मते न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अणि स्वायत्तता सर्वपरी असून, तिची जपणूक केली पाहिजे व गेल्या १७ महिन्यांच्या केन्द्र सरकारचा कारभार पाहता न्यायालयाचा या सरकारवर विश्वास नाही हेच यातून स्पष्ट होते. सुरजेवाला काँग्रेसचे प्रवक्ते असल्याने हे मत त्यांचे खासगी नसावे अशी अपेक्षा आहे. प्रचलित कॉलेजियमच्या रचनेच्या जागी न्यायिक नियुक्ती आयोग निर्माण करण्याचा प्रस्ताव डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना म्हणजे काँग्रेसच्या सत्ताकाळातच संसदेपुढे आला होता. तेव्हा भाजपाने आपली बौद्धिक दिवाळखोरी दाखवीत विरोध केला होता. (म्हणजे सारे एकाच माळेचे मणी.) सुरजेवाला म्हणतात त्याप्रमाणे आयोगाची निर्मिती हा न्यायव्यवस्थेवरील आघात असेल तर त्याचा प्रारंभ त्यांच्याच पक्षाने सुरू केला याचे त्यांना विस्मरण झालेले दिसते. मुळात सर्वोच्च न्यायालय प्रथमपासूनच आयोगाच्या विरोधात होते. त्यात मोदी सरकारवरील विश्वास वा अविश्वासाचा काहीएक प्रश्न नाही. आणि समजा ते गृहीत धरले तर सर्वोच्च न्यायालयाने व्यक्तिगत आवडनिवड नजरेसमोर ठेवून निवाडा जाहीर केला असे मान्य करावे लागेल. याला गर्भित आरोप म्हणतात, जो काँग्रेस पक्षाला मान्य आहे? ‘आप’ दिल्लीच्या नावावर गल्लीतले राजकारण करीत असून, या पक्षाला सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्यात मोदी सरकारला लगावलेली थप्पड दिसते. दिल्लीत खुट्ट जरी वाजले तरी मोदी आणि नायब राज्यपाल नजीब जंग यांच्या नावाने शंख करणे हा आप आणि अरविंद केजरीवाल यांचा आवडता कार्यक्रम झाला आहे. तुलनेत डाव्यांची प्रतिक्रिया खूपच प्रगल्भ आहे. वस्तुत: डावे पक्ष मोदी आणि भाजपाचे कठोर टीकाकार समजले जातात. पण डी. राजा यांनी अत्यंत संयमित प्रतिक्रिया व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाच्या ‘जैसे थे’ कायम करण्याच्या निवाड्यावर चिंता व्यक्त करताना न्यायाधीशांच्या नियुक्त्यांसाठी राष्ट्रीय विधी आयोग निर्माण करण्याच्या दृष्टीने संसदेने विचार करण्याच्या आवश्यकतेवर भर दिला आहे.