शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
3
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
4
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
5
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
6
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
7
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
8
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
9
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
10
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
11
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
12
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
13
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
14
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
15
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
16
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
17
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
18
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
19
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
20
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा

महाविकास आघाडीमधील वैचारिक विसंगती, पोपट मरून पडला आहे हे सांगणार कोण?

By यदू जोशी | Updated: May 28, 2021 06:08 IST

Maharashtra Politics News: आरक्षणासह अनेक संवेदनशील विषयांवर सरकार एका सुरात बोलत नाही. तिन्ही पक्षांमधली वैचारिक विसंगती त्याच्या मुळाशी आहे!

- यदु जोशी(वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत)महाराष्ट्र सध्या सामाजिकदृष्ट्या संवेदनशील झाला आहे. एकीकडे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरू लागला असतानाच मागासवर्गीय शासकीय कर्मचाऱ्यांचं पदोन्नतीतील आरक्षण हिरावल्यानं वातावरण तापलं आहे. त्यामुळे सामाजिक अस्वस्थता आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले तेव्हा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पसरलेला असंतोष हा विषय नक्कीच  चर्चिला गेला असेल. महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक स्थितीचे गेल्या सहा दशकांचे साक्षीदार राहिलेल्या पवारांनी मराठवाडा विद्यापीठ नामांतरापासून अनेक संवेदनशील सामाजिक विषय व्यवस्थित हाताळले. पवार हे ‘चांद्यापासून बांद्यापर्यंत’ची नाडी ओळखणारे निष्णात राजकीय डॉक्टर आहेत. याहीवेळी उद्धव ठाकरेंना त्यांचे मार्गदर्शन मिळेल आणि गुंता सुटेल, अशी अपेक्षा आहे.सरकार चालवण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची असली तरी त्यासाठी आवश्यक  समन्वयाची कमतरता दिसते. त्यातूनच पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा जीआर मंत्रिमंडळ उपसमितीला विश्वासात न घेता निघाला. आरक्षणाविषयीचा ताणतणाव निवळावा, यासाठी सरकारी पातळीवर काही प्रयत्न होतही असतील; पण तिन्ही पक्षांचे एकत्रित राजकीय प्रयत्न दिसत नाहीत. आरक्षणापासून विविध विषयांवर सरकार एका सुरात अन्  धोरणात्मक बोलताना दिसत नाही. तिन्ही पक्षांमधली वैचारिक विसंगती त्याच्या मुळाशी आहे. मराठा मतदारांचा बेस असलेल्या राष्ट्रवादीला मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर पदोन्नतीतील आरक्षणावर काय भूमिका घ्यावी, हे सुचत नसावं. शिवसेनेचा तर आरक्षण या विषयाला अप्रत्यक्ष विरोधच राहिलाय वा कोणतीही भूमिका घ्यायची नाही, ही त्यांची भूमिका दिसते. कोरोनाचा मुकाबला करताना उद्धव ठाकरेंच्या संयमी भूमिकेचे कौतुक होत आहे, पण कसोटी पाहणाऱ्या अशा विषयांबाबत त्यांचा कस लागणार आहे. एखाद्या संवेदनशील सामाजिक मुद्द्याचा फैसला करताना विशिष्ट वर्ग सुखावेल, विशिष्ट वर्ग दुखावेल; पण भूमिकाच घेतली नाही तर कोणीही सुखावणार नाही. पोपट मरून पडला आहे हे सांगणार कोण? काँग्रेस ताणेल; पण तोडणार नाहीपदोन्नतीतील आरक्षण नाकारणाऱ्या जीआरवरून काँग्रेस फारच आक्रमक झाली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आम्हाला गृहीत धरू नका, हा जीआर रद्द करा, असं बजावलं आहे. दलित, आदिवासींच्या प्रश्नांना न्याय द्या, असं पत्र काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गेल्या वर्षी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलं होतं. काँग्रेसची लाईन ठरलेली आहे. त्यामुळेच मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या पाठीशी हा एकच पक्ष सध्या भक्कमपणे उभा आहे. मात्र, या मुद्द्यावर काँग्रेस सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता नाही. ताणतील; पण तुटेल असं होऊ देणार नाहीत.निधी दिला की घेतला?१५ व्या वित्त आयोगातून ग्राम पंचायतींना केंद्र सरकार निधी देते. ८ मे रोजी केंद्रानं ८६१ कोटी रुपये दिले. त्यातील २५ टक्के (२१५ कोटी) निधी हा त्या-त्या ग्राम पंचायतींमध्ये कोरोना उपाययोजना राबविण्यासाठी खर्च करण्याचा राज्य सरकारचा निर्णय अन्यायकारक आहे. स्थानिक विकासकामांना सरकारच्या या निर्णयानं कात्री लागली. वेगळा निधी दिला असता तर सरकारचं औदार्य दिसलं असतं. पण तस झालं नाही. एकीकडे राज्यातील बड्या महापालिका स्वत:च्या पैशानं लस खरेदी करताहेत आणि दुसरीकडे ग्राम पंचायतींचा हक्काचा निधी हिरावून घेतला जात आहे.सुबोधकुमार जयस्वाल रिटर्न्समहाविकास आघाडी सरकारच्या धुरीणांशी मतभेद झाल्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल केंद्रात (सीआयएसएफ) प्रतिनियुक्तीवर गेले. आता ते सीबीआयचे संचालक झाले आहेत. त्यामुळे सीबीआयच्या रडारवर असलेले महाराष्ट्रातील नेते धास्तावले असतील, पण जे जयस्वाल यांना जवळून ओळखणारे आहेत, ते मात्र नक्कीच सांगतील की जयस्वाल असं बदल्याच्या भावनेनं वागणाऱ्यांपैकी नाहीत. असं असलं तरी जयस्वाल यांच्या कार्यकाळात सीबीआय-राज्य सरकारमध्ये तणातणी झालीच समजा, तर त्याचा संबंध पूर्वीच्या कटू प्रसंगांशी जोडला जाईल. महाराष्ट्र केडरचा एक प्रामाणिक अधिकारी सीबीआयचा संचालक झाला. बऱ्याच वर्षांनंतर हा बहुमान महाराष्ट्राच्या आयपीएस अधिकाऱ्यास मिळाला; पण मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांनी अभिनंदनाचं साधं ट्विटही केलं नाही; याचं आश्चर्य वाटलं, हे मात्र खरं!राज्यपालांच्या मनात आहे तरी काय?राज्यपालांकडील विधान परिषदेच्या बारा नावांची यादी आधी हरवली, मग ती सापडली. बरेच महिने झाले, राज्यपाल त्या १२ जणांची नियुक्ती काही करत नाहीत. सरकार बदलाची तर ते वाट पाहत नाहीत ना? परवाच्या चक्रीवादळात राजभवनमधील दोन-एकशे झाडं पडली. असं एखादं चक्रीवादळ सरकारभोवती येईल, असं राज्यपालांना वाटतं का, हे माहिती नाही. आता हायकोर्टानं या मामल्यात उडी घेतली आहे. सरकारला पुरून उरलेले राज्यपाल हायकोर्टालाही कदाचित गुगली देतील, अशीच शक्यता जास्त!

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीPoliticsराजकारण