शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मानवतेला काळीमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 1:03 PM

मिलिंद कुलकर्णीपुरोगामी महाराष्टÑाला काळीमा फासणारी घटना जळगाव जिल्ह्यातील वाकडी या गावात घडली. विहिरीत पोहले या क्षुल्लक कारणावरुन मातंग समाजातील दोन तरुणांना नग्न करुन बेदम मारहाणीसह गावातून धिंड काढण्याचा अघोरी प्रकार करण्यात आला. या घटनेमुळे महाराष्टÑाच्या ग्रामीण भागात अद्यापही जातीपातीचे विष, आर्थिक स्थिती, शेतजमीन, विहिरींची मालकी यासंबंधी वर्चस्वाची भावना किती खोलवर ...

मिलिंद कुलकर्णीपुरोगामी महाराष्टÑाला काळीमा फासणारी घटना जळगाव जिल्ह्यातील वाकडी या गावात घडली. विहिरीत पोहले या क्षुल्लक कारणावरुन मातंग समाजातील दोन तरुणांना नग्न करुन बेदम मारहाणीसह गावातून धिंड काढण्याचा अघोरी प्रकार करण्यात आला. या घटनेमुळे महाराष्टÑाच्या ग्रामीण भागात अद्यापही जातीपातीचे विष, आर्थिक स्थिती, शेतजमीन, विहिरींची मालकी यासंबंधी वर्चस्वाची भावना किती खोलवर रुजलेली आहे, हे अधोरेखित होते. जग एकविसाव्या शतकात पोहोचले आहे; माहिती-तंत्रज्ञानाने क्रांती केली आहे, असे म्हणत असताना आमच्या मनातून जात, श्रेष्ठ-कनिष्ठतेचे भेद जात नाही. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांना आदर्श मानणाऱ्या आणि संविधानानुसार चालणाºया या देशात अशा घटनांचे प्रमाण वाढणे सामाजिकदृष्टया निरोगी नसल्याचे लक्षण आहे. ‘सबका साथ सबका विकास’ हा मूलमंत्र जपून सरकार काम करीत असेल तर त्याचे परिणाम ग्रामीण भागात असे का दिसतात, याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. समाजातील शोषित, पीडित, वंचित घटकांना विकासाची समान संधी मिळत असल्याचा दावा शासन आणि प्रशासन करीत असले तरी ग्रामीण महाराष्टÑातील भयावह स्थितीचे दर्शन या घटनेने घडविले आहे. स्पृश्यास्पृश्यतेचा भेद मिटविण्यासाठी महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी यांच्यासारख्या महात्म्यांनी प्रयत्न केले. देशाला समतेचा संदेश देण्यात महाराष्टÑ अग्रभागी असल्याचा अभिमान आम्ही बाळगत असताना अशा घटना ही काळाची चक्र उलटे फिरविण्याचा काही शक्तींचा प्रयत्न असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. वाकडीसारख्या छोट्या गावात भयंकर प्रकार घडूनही तीन दिवस त्याची वाच्यता होऊ नये, यावरुन त्याठिकाणी किती दहशतीत पीडित कुटुंब राहत असेल त्याची कल्पना येते. विहिरीत पोहण्यास मज्जाव केल्यानंतरही ते पोहल्याबद्दल जाब विचारताना त्यांना नग्न करुन मारहाण केली जात असताना त्याचा व्हीडिओ बनविणे, त्यात या तरुणांना हीन लेखणारी उद्दाम भाषा वापरणे यावरुन ही प्रवृत्ती किती बेमुर्वतखोर, आढ्यताखोर, वर्चस्ववादी आहे हे ठळकपणे जाणवते. अशा प्रवृत्तींना कठोर शिक्षा व्हायला हवी, तरच अशा प्रकारांना पायबंद बसू शकेल. मंत्री, शासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या आलेल्या प्रतिक्रियांमधून या घटनेविषयी संताप व्यक्त झाला. तो रास्त आहे. पण केवळ तेथे न थांबता अशी हिंमत समाजातील कुठलाही घटक करणार नाही, अशा पध्दतीने गावपातळीवर प्रशासकीय यंत्रणा मजबूत करण्याची आवश्यकता आहे. रविवारी घटना घडल्यानंतर तेथील पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी या शासकीय घटकांनी तीन दिवस ही घटना दडपून ठेवली, असाच याचा अर्थ आहे. हे कच्चे दुवे हेरुन ते मजबूत करण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Crimeगुन्हाJalgaonजळगाव