शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कुलदीप नायर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 6:22 AM

कुलदीप नायर यांच्या वयाच्या ९५ व्या वर्षी झालेल्या निधनाने गेल्या संपूर्ण शतकाचा डोळस साक्षीदार राहिलेला वजनदार व स्वतंत्र वृत्तीचा पत्रकार देशाने गमावला आहे.

कुलदीप नायर यांच्या वयाच्या ९५ व्या वर्षी झालेल्या निधनाने गेल्या संपूर्ण शतकाचा डोळस साक्षीदार राहिलेला वजनदार व स्वतंत्र वृत्तीचा पत्रकार देशाने गमावला आहे. देशातील बहुतेक सर्वच प्रमुख इंग्रजी दैनिकांमध्ये संपादक म्हणून सेवा बजावलेला आणि आपला स्तंभ १४ भाषांतील व अनेक देशातील ८० वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित करणारा त्यांच्या तोडीचा दुसरा यशस्वी पत्रकार आज देशात दुसरा नाही. त्यांच्या नावावर असलेली १५ पुस्तकेही वाचकांना मार्गदर्शक ठरणारी व राजकीय नेत्यांना सदैव दिशा दाखविणारी ठरली आहेत. आज पाकिस्तानात असलेल्या सियालकोटमध्ये जन्माला आलेले कुलदीप नायर फाळणीनंतर भारतात आले. इंग्लंडमध्ये पत्रकारितेचे शिक्षण घेऊन त्यांनी तब्बल १० वर्षे भारत सरकारच्या गृहमंत्रालयात त्याचे प्रवक्तेपण व जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले. परिणामी प्रशासन व मंत्रालय यांच्या कारभाराची त्यांना जवळून पाहणी करता आली. त्यातूनच त्यांना अतिशय गुंतागुंतीच्या व गूढ बातम्या मिळत राहिल्या. सर्वच राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांशी निकटचे व विश्वासाचे संबंध असणारे नायर विचाराने डावे व समाजातील उपेक्षितांच्या वर्गाचे प्रवक्ते होते. शिवाय लोकशाही मूल्यांवर निष्ठा राखणारे पत्रकार म्हणून त्या मूल्यांवर आघात करणाºयांशी त्यांनी दरवेळी लढतही दिली. त्याचसाठी १९७५ च्या आणीबाणीत त्यांना तुरुंगवास पत्करावा लागला. पं. नेहरू व त्यांचे अंतर्गत व आंतरराष्टÑीय धोरण यावर त्यांचे टीकास्त्र अखंड सुरू राहिले. त्यासाठी त्यांचे व त्यांच्या सुविद्य पत्नीचे मतभेदही होत राहिले. तरीही त्यांनी नेहरूंशी चांगले संबंध राखले. अगदी अलीकडे त्यांनी नरेंद्र मोदींवरही कठोर टीका केली. मात्र मोदींनीही त्यांच्याशी कधी वैर केले नाही. लोकशाहीसाठी वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य व मतभिन्नता राखण्याचा अधिकार मोलाचा आहे असे मानणारे नायर सध्याच्या राजवटीत त्या दोहोंचाही होत असलेला संकोच व त्यात माध्यमांची होणारी गळचेपी यावर संतप्त होते. त्यांच्या दुर्दैवाने आजचे राजकीय वातावरणही त्यांच्या खुल्या पत्रकारितेला अनुकूल राहिले नव्हते. भूमिकांवर ठाम राहणारे आणि भूमिकांची किंमत मोजणारे पत्रकार व कार्यकर्ते यांना त्यांच्या स्वतंत्र असण्याची फार मोठी किंमत चुकवावी लागते. ती नायर यांनी चुकविली. त्याचसाठी त्यांना एक्स्प्रेससारख्या दैनिकाचे संपादकपद सोडावे लागले. अनेक पुरस्कारांकडे पाठ फिरवावी लागली आणि अनेक मोठ्या सन्मानांना मुकावे लागले. मात्र खºया व प्रामाणिक विचारवंतांची दखल समाजाला आज ना उद्या घ्यावी लागते. नायर यांना यथाकाळ सरकारने राज्यसभेवर घेतले. त्यांची इंग्लंडच्या हायकमिश्नर पदावर नियुक्तीही सरकारने केली. कुलदीप नायर हे भारत व पाकिस्तान यांच्यातील स्नेहसंबंधांचे पुरस्कर्ते होते. त्यांच्यातील संवाद व सौहार्द कायम राखण्यावर त्यांचा भर होता. त्याचसाठी दि. १४ आॅगस्टला, पाकिस्तानच्या स्थापनेच्या दिवशी व दि. १५ आॅगस्टला भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर पंजाबातील अमृतसर जवळच्या बाघा सीमेवर जाऊन दोन्ही देशांच्या प्रतिमांचे पूजन करण्याचा वसा त्यांनी घेतला होता. या देशातील वैर संपावे व त्यांच्यात स्नेहाचे संबंध कायम राहावे हा त्यांचा ध्यास अखेरपर्यंत कायम राहिला. त्यासाठी या दोन्ही देशातील कडव्या भूमिकावाल्यांचाही त्यांच्यावर राग राहिला. राजकारण्यांचा राग, कडव्या भूमिका घेणाºयांचा विरोध, पत्रकारांचे स्वातंत्र्य दडपून टाकणाºया मालकशाहीचा रोष आणि समाजातील गरीब व उपेक्षितांची बाजू घेतल्याने धनवंत उद्योगपतींचाही विरोध या साºयांना तोंड देऊनही कुलदीप नायर पत्रकारितेच्या क्षेत्रातील त्यांची उंची कायम राखत अखेरपर्यंत जगले. त्यांच्यावर टीका झाली. आरोप झाले, काहींनी त्यांच्यावर पाकधार्जिणेपणाचाही ठपका ठेवला पण नायर यांची प्रतिमा त्यामुळे कधी डागाळली नाही. ते अखेरपर्यंत ताठ मानेने व सरळ मनाने जगले. जगाचा निरोपही त्यांनी तसाच घेतला. त्यांची स्मृती वृत्तपत्रांच्या क्षेत्रात दीर्घकाळपर्यंत प्रेरणा व मार्गदर्शन देणारी राहील यात शंका नाही.

टॅग्स :Kuldeep Nayyarकुलदीप नय्यरDeathमृत्यूJournalistपत्रकार